शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

भुयारी गटार योजनेमुळे वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 22:06 IST

शहरात मागील दोन-तीन महिन्यांपासून भुयारी गटार योजनेकरिता सुस्थितीतील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही आपने दिला आहे.

ठळक मुद्देकामाचा दर्जाही निकृष्ट : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरात मागील दोन-तीन महिन्यांपासून भुयारी गटार योजनेकरिता सुस्थितीतील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही आपने दिला आहे.भुयारी गटार योजनेच्या कामाकरिता शहरातील असा एकही रस्ता व गल्लीबोळ शिल्लक नाही की, जी खोदलेली नाही. परिणामी, रहदारीला अडथळा निर्माण होत असून दररोज किरकोळ अपघात होत आहे. मात्र, याकडे लक्ष द्यायला संबंधित नगरसेवक, लोकप्रतिनिधींकडे वेळ नाही. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. योजनेला अल्पावधीतच ग्रहण लागले असून बिडकर वॉर्डात पंधरवड्यापूर्वी बांधण्यात आलेले चेंबर फुटून मोठा खड्डा तयार झालेला आहे. त्यामुळे योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. चेंबर फुटून खड्डा तयार झाल्याने यात कुणी पडून अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदार कोण असेल, असा प्रश्नही ‘आप’ने केला आहे. शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत असून बांधकामाची सखोल चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी आपने निवेदनातून केली आहे.या प्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मुख्यधिकाºयांना निवेदन देताना प्रफुल्ल क्षीरसागर, भाऊराव कोटकर, जयंत लोहकरे, संदेश वासेकर, निसार, विनोद कुंभारे आदी उपस्थित होते.हिंगणघाटातही योजना वादातवर्ध्यातही नियोजनाच्या अभावात भुयारी गटार योजना राबविण्यात आली. नुकतेच बांधलेले सिमेंट रस्ते फोडण्यात आले. यामुळे विरोधी पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रारंभीपासूनच विरोध दर्शविला. आता हिंगणघाटातही या योजनेवरून काहूर माजले आहे.नियोजनाचा अभाव असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ही भुयारी गटार योजना फसण्याचीच अधिक शक्यता नागरिकांतून वर्तविली जात आहे.मजबूत रस्ते या योजनेकरिता फोडल्यामुळे शासनाचे दुहेरी नुकसान होण्याची शक्यता आहे.भुयारी गटार योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणीभुयारी गटार योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या नगरपालिकेत ही योजना राबविली जात आहे. त्या ठिकाणी या योजनेची बोंबाबोंबच आहे. या योजनेचे काम करतांना कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोपही होत आहे. अल्पावधीतच या कामाला तडे गेल्याने कोट्यवधीच्या निधीचा चुराडा होत असल्याची ओरड होत आहे.पण, नगरपालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.