शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीचा होतो खोळंबा

By admin | Updated: June 1, 2016 02:39 IST

शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गालगत तसेच बाजारपेठेतील रस्त्यांवर व्यावसायिकांकडून अवैधरित्या दुकानातील साहित्य ठेवले जात असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.

वाहतूक शाखेचे दुर्लक्ष : प्रमुख मार्गासह, बाजारपेठेतील रस्ते झाले अरूंदवर्धा : शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गालगत तसेच बाजारपेठेतील रस्त्यांवर व्यावसायिकांकडून अवैधरित्या दुकानातील साहित्य ठेवले जात असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. साहित्यामुळे रस्ते अरुंद झाल्याचे चित्र आहे. याकडे वाहतूक शाखा कानाडोळा करीत आहे. परिणामी, नागरिकांना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात मागील काही वर्षांपासून वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातून जाणारा एक प्रमुख मार्ग असून या मार्गाला इतर लहान मोठे असंख्य रस्ते जोडलेले आहेत. वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मात्र, रस्ते आहे तसे आणि तेवढेच आहेत. यातच मागील काही वर्षांपासून रस्त्यांवर अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मुख्य मार्गावर अनेक व्यावसायिकांनी दुकानातील कूलर, कपाट, सोफा तर मिठाई विक्रेत्यांनी गॅसभट्टी, कढाई, हॉटेलचालकांकडून खुर्च्या, टेबल आदी साहित्य ठेवून जागा गिळंकृत करणे सुरू केले आहे. बाजारपेठेत तर व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. अनेक मोठमोठ्या इमारतीचे बाजारपेठेसह अन्य ठिकाणी बांधकाम करण्यात आले; मात्र वाहनतळाचा कुठेच विचार करण्यात आला नाही. बाजारपेठेत चारचाकी वाहन तर सोडा; दुचाकी वाहन ठेवण्यासही जागा असत नाही. वर्षभरापूर्वी अतिक्रमणकर्त्या व्यावसायिकांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने न्यायालयीन दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानंतर काही दिवस व्यावसायिकांनी रस्त्यावर साहित्य ठेवणे बंद केले; मात्र वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताच व्यावसायिकांकडून अर्ध्या रस्त्यापर्यंत दुकानातील साहित्य ठेवले जात असून मुजोरीचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. रस्त्यावर साहित्य ठेवण्यामुळे रस्ते तर अरुंद झालेच पण बाजारपेठेसह इतर वाहतुकीची नित्याने कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला असताना पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे. वाहनतळाकरिता जागा अधिग्रहित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाही. सराफा ओळ, पत्रावळी चौक, गोल बाजार परिसर वाहनांच्या गर्दीने सदैव गजबजलेला दिसतो. या रस्त्यांची वाट काढताना चालकांची अक्षरश: दमछाक होते. विमा कार्यालयासमोरही अवैधरित्या, बेशिस्तपणे नित्याने वाहने उभी दिसतात. मात्र वाहतुकीला वळण लावण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडूनही विशेष प्रयतं होताना दिसत नाही. रस्त्यावर साहित्य ठेवण्यासोबतच बाजारपेठेत व प्रमुख मार्गालगतच्या अनेक व्यावसायिकांनी दुकानाचे शेड अतिरिक्त बाहेर काढून अतिक्रमण केल्याचे दिसून येते. वाहतुक सुरक्षित होण्याच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)