शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीचा होतो खोळंबा

By admin | Updated: June 1, 2016 02:39 IST

शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गालगत तसेच बाजारपेठेतील रस्त्यांवर व्यावसायिकांकडून अवैधरित्या दुकानातील साहित्य ठेवले जात असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.

वाहतूक शाखेचे दुर्लक्ष : प्रमुख मार्गासह, बाजारपेठेतील रस्ते झाले अरूंदवर्धा : शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गालगत तसेच बाजारपेठेतील रस्त्यांवर व्यावसायिकांकडून अवैधरित्या दुकानातील साहित्य ठेवले जात असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. साहित्यामुळे रस्ते अरुंद झाल्याचे चित्र आहे. याकडे वाहतूक शाखा कानाडोळा करीत आहे. परिणामी, नागरिकांना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात मागील काही वर्षांपासून वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातून जाणारा एक प्रमुख मार्ग असून या मार्गाला इतर लहान मोठे असंख्य रस्ते जोडलेले आहेत. वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मात्र, रस्ते आहे तसे आणि तेवढेच आहेत. यातच मागील काही वर्षांपासून रस्त्यांवर अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मुख्य मार्गावर अनेक व्यावसायिकांनी दुकानातील कूलर, कपाट, सोफा तर मिठाई विक्रेत्यांनी गॅसभट्टी, कढाई, हॉटेलचालकांकडून खुर्च्या, टेबल आदी साहित्य ठेवून जागा गिळंकृत करणे सुरू केले आहे. बाजारपेठेत तर व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. अनेक मोठमोठ्या इमारतीचे बाजारपेठेसह अन्य ठिकाणी बांधकाम करण्यात आले; मात्र वाहनतळाचा कुठेच विचार करण्यात आला नाही. बाजारपेठेत चारचाकी वाहन तर सोडा; दुचाकी वाहन ठेवण्यासही जागा असत नाही. वर्षभरापूर्वी अतिक्रमणकर्त्या व्यावसायिकांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने न्यायालयीन दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानंतर काही दिवस व्यावसायिकांनी रस्त्यावर साहित्य ठेवणे बंद केले; मात्र वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताच व्यावसायिकांकडून अर्ध्या रस्त्यापर्यंत दुकानातील साहित्य ठेवले जात असून मुजोरीचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. रस्त्यावर साहित्य ठेवण्यामुळे रस्ते तर अरुंद झालेच पण बाजारपेठेसह इतर वाहतुकीची नित्याने कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला असताना पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे. वाहनतळाकरिता जागा अधिग्रहित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाही. सराफा ओळ, पत्रावळी चौक, गोल बाजार परिसर वाहनांच्या गर्दीने सदैव गजबजलेला दिसतो. या रस्त्यांची वाट काढताना चालकांची अक्षरश: दमछाक होते. विमा कार्यालयासमोरही अवैधरित्या, बेशिस्तपणे नित्याने वाहने उभी दिसतात. मात्र वाहतुकीला वळण लावण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडूनही विशेष प्रयतं होताना दिसत नाही. रस्त्यावर साहित्य ठेवण्यासोबतच बाजारपेठेत व प्रमुख मार्गालगतच्या अनेक व्यावसायिकांनी दुकानाचे शेड अतिरिक्त बाहेर काढून अतिक्रमण केल्याचे दिसून येते. वाहतुक सुरक्षित होण्याच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)