शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

संततधार पावसामुळे शेतीच्या निंदन खर्चात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:03 IST

जून महिण्यात पावसाने दडी मारली त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयाला जुलै अखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिण्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. कपाशी व सोयाबीन पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले असून त्याच्या निंदणाचा खर्च वाढत चालला आहे.

ठळक मुद्देमजुराच्या वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिण्यात पावसाने दडी मारली त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयाला जुलै अखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिण्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. कपाशी व सोयाबीन पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले असून त्याच्या निंदणाचा खर्च वाढत चालला आहे. प्रत्येक गावात महिला मजुरांना निंदण कामासाठी शेतकºयांना मॅनेज करावे लागत आहे. महिला मजुरांची मजुरी २०० रूपयाच्या वर गेली असून गावापासून शेतापर्यंत मजुरांच्या वाहतुकीचा खर्चही शेतकºयालाच करावा लागत आहे. महिला मजुरांची टंचाई असल्याने १० ते १५ महिलांचा जत्था तयार करून त्यांना शेती कामासाठी उपलब्ध करून देणाºया दलाल (मेट) याला प्रति महिला मजुरामागे २० ते ५० रूपये मिळत आहे.वर्धा जिल्ह्यात आठही तालुक्यात सोयाबीन ,कपाशी व तुर हे तीन पिक खरीपात घेतले जातात. यावर्षी सुरूवातील पावसामुळे लागवड उशिरा करण्यात आली. त्यात पावसाने जून महिण्यात दगा दिला. त्यानंतर जुलै महिण्यात पाऊस आला शेतकºयांना दिलासा मिळाला मात्र जुलैच्या मध्यापासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन व कपाशी या दोन्ही पिकांत तण वाढले आहे.तणाची काढणी (निंदन) करण्यासाठी खर्चही वाढत आहे. त्यामुळे महिला मजुरांना मोठी डिमांड निर्माण झाली आहे. सकाळी ८.३० वाजतापासून महिला मजूर शेती कामावर निघत आहे. पुर्वी गावातून पायी शेतापर्यंत मजूर जात होते. मात्र गेल्या दोन वर्षात मजुराच्या वाहतुकीसाठी आॅटो रिक्षा, मालवाहू वाहन आदीची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. ३०० रूपये खर्च प्रति दिवस शेतकºयांवर बसत आहे. सायंकाळी ५.३० पर्यंत काम करण्यात येत असून २०० रूपये रोज महिला मजूरांना द्यावा लागत आहे. एकाच वेळी अनेक शेतकºयांचे निंदनाचे फेर आल्याने महिला मजुरांचे भाव वधारलेले आहे. काही भागात महिलांच्या गटाला घेवून दलाल (मेट) मजूर उपलब्ध करून देत आहे. या दलालाही कमिशन शेतकºयांलाच द्यावे लागत आहे. सध्या पाऊस समाधानकारक असल्याने शेतकरी सुखावला असला तरी निंदनाचा खर्च शेतीचा बजेट वाढविणारा आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती