शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

संततधार पावसामुळे शेतीच्या निंदन खर्चात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:03 IST

जून महिण्यात पावसाने दडी मारली त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयाला जुलै अखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिण्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. कपाशी व सोयाबीन पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले असून त्याच्या निंदणाचा खर्च वाढत चालला आहे.

ठळक मुद्देमजुराच्या वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिण्यात पावसाने दडी मारली त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयाला जुलै अखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिण्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. कपाशी व सोयाबीन पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले असून त्याच्या निंदणाचा खर्च वाढत चालला आहे. प्रत्येक गावात महिला मजुरांना निंदण कामासाठी शेतकºयांना मॅनेज करावे लागत आहे. महिला मजुरांची मजुरी २०० रूपयाच्या वर गेली असून गावापासून शेतापर्यंत मजुरांच्या वाहतुकीचा खर्चही शेतकºयालाच करावा लागत आहे. महिला मजुरांची टंचाई असल्याने १० ते १५ महिलांचा जत्था तयार करून त्यांना शेती कामासाठी उपलब्ध करून देणाºया दलाल (मेट) याला प्रति महिला मजुरामागे २० ते ५० रूपये मिळत आहे.वर्धा जिल्ह्यात आठही तालुक्यात सोयाबीन ,कपाशी व तुर हे तीन पिक खरीपात घेतले जातात. यावर्षी सुरूवातील पावसामुळे लागवड उशिरा करण्यात आली. त्यात पावसाने जून महिण्यात दगा दिला. त्यानंतर जुलै महिण्यात पाऊस आला शेतकºयांना दिलासा मिळाला मात्र जुलैच्या मध्यापासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन व कपाशी या दोन्ही पिकांत तण वाढले आहे.तणाची काढणी (निंदन) करण्यासाठी खर्चही वाढत आहे. त्यामुळे महिला मजुरांना मोठी डिमांड निर्माण झाली आहे. सकाळी ८.३० वाजतापासून महिला मजूर शेती कामावर निघत आहे. पुर्वी गावातून पायी शेतापर्यंत मजूर जात होते. मात्र गेल्या दोन वर्षात मजुराच्या वाहतुकीसाठी आॅटो रिक्षा, मालवाहू वाहन आदीची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. ३०० रूपये खर्च प्रति दिवस शेतकºयांवर बसत आहे. सायंकाळी ५.३० पर्यंत काम करण्यात येत असून २०० रूपये रोज महिला मजूरांना द्यावा लागत आहे. एकाच वेळी अनेक शेतकºयांचे निंदनाचे फेर आल्याने महिला मजुरांचे भाव वधारलेले आहे. काही भागात महिलांच्या गटाला घेवून दलाल (मेट) मजूर उपलब्ध करून देत आहे. या दलालाही कमिशन शेतकºयांलाच द्यावे लागत आहे. सध्या पाऊस समाधानकारक असल्याने शेतकरी सुखावला असला तरी निंदनाचा खर्च शेतीचा बजेट वाढविणारा आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती