शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वाढत्या तापमानाने रूग्णांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: May 25, 2014 23:47 IST

गत काही दिवसांपासून वातावरन सतत तापत आहे. पारा ४५ अंशाच्यावर गेला आहे. त्यामुळे वर्धेकरांना उन्हाच्या तप्त झळांचा तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळे शरीरातील पाणी कमी होणे आणि संसर्गजन्य आजार

वर्धा : गत काही दिवसांपासून वातावरन सतत तापत आहे. पारा ४५ अंशाच्यावर गेला आहे. त्यामुळे वर्धेकरांना उन्हाच्या तप्त झळांचा तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळे शरीरातील पाणी कमी होणे आणि संसर्गजन्य आजार जडण्याचे प्रकार वाढले असून त्याचा विपरित परिणाम आरोग्यावर होत आहे.

गत आठवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गार्मीची लाट पसरली आहे. पाऊस येण्याआधी तापमानामध्ये दरवर्षीच वाढ झाल्याची नोंद केली जाते. मात्र यंदाचा ऋतू बदलाचा काळ वर्धेकरांसाठी जास्तच त्रासदायक ठरत आहे. अशा वातावरणामध्ये विषाणू आणि जीवाणूंची वाढ झपाट्याने होत असते. यामुळे सर्दी, पडसे या आजाराने वर्धेकर त्रस्त झाले आहेत.

सर्दीच्या बरोबरीनेच दवाखान्यामध्ये येणारे १५ ते २0 टक्के रुग्ण हे घशाला संसर्ग झालेले असतात. उन्हाळ्यामुळे बाहेर फिरताना कोल्डड्रिंक, बर्फाचा गोळा, लस्सी असे पदार्थ खाले जातात. त्याचा परिणाम घशावर होतो. घसा खवखवणे, घशाला सूज येणे अशा तक्रारी यामुळे वाढल्या आहेत. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे किंवा बर्फगोळा यासारखे पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

उन्हामध्ये फिरताना खूप घाम येतो. यामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्याचबरोबरीने क्षारही कमी होतात. अशावेळी त्वचेवर घाम राहिल्यामुळे त्वचेचे आजार होतात.

काही जणांना त्वचेवर लाल पुरळ उठते. लहान मुलांना घामोळ्याचा त्रास वाढत आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे. उन्हामध्ये बाहेर पडताना डोळ्यावर गॉगल वापरणे, तसेच डोके आणि त्वचा झाकणे आवश्यक आहे. तसेच लगेच औषधोपचार करणेही गरजेचे झाले आहे. या उपायातूनच उन्हापासून बचाव करता येतो. (शहर प्रतिनिधी )