शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

वाढत्या तापमानाने रूग्णांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: May 25, 2014 23:47 IST

गत काही दिवसांपासून वातावरन सतत तापत आहे. पारा ४५ अंशाच्यावर गेला आहे. त्यामुळे वर्धेकरांना उन्हाच्या तप्त झळांचा तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळे शरीरातील पाणी कमी होणे आणि संसर्गजन्य आजार

वर्धा : गत काही दिवसांपासून वातावरन सतत तापत आहे. पारा ४५ अंशाच्यावर गेला आहे. त्यामुळे वर्धेकरांना उन्हाच्या तप्त झळांचा तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळे शरीरातील पाणी कमी होणे आणि संसर्गजन्य आजार जडण्याचे प्रकार वाढले असून त्याचा विपरित परिणाम आरोग्यावर होत आहे.

गत आठवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गार्मीची लाट पसरली आहे. पाऊस येण्याआधी तापमानामध्ये दरवर्षीच वाढ झाल्याची नोंद केली जाते. मात्र यंदाचा ऋतू बदलाचा काळ वर्धेकरांसाठी जास्तच त्रासदायक ठरत आहे. अशा वातावरणामध्ये विषाणू आणि जीवाणूंची वाढ झपाट्याने होत असते. यामुळे सर्दी, पडसे या आजाराने वर्धेकर त्रस्त झाले आहेत.

सर्दीच्या बरोबरीनेच दवाखान्यामध्ये येणारे १५ ते २0 टक्के रुग्ण हे घशाला संसर्ग झालेले असतात. उन्हाळ्यामुळे बाहेर फिरताना कोल्डड्रिंक, बर्फाचा गोळा, लस्सी असे पदार्थ खाले जातात. त्याचा परिणाम घशावर होतो. घसा खवखवणे, घशाला सूज येणे अशा तक्रारी यामुळे वाढल्या आहेत. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे किंवा बर्फगोळा यासारखे पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

उन्हामध्ये फिरताना खूप घाम येतो. यामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्याचबरोबरीने क्षारही कमी होतात. अशावेळी त्वचेवर घाम राहिल्यामुळे त्वचेचे आजार होतात.

काही जणांना त्वचेवर लाल पुरळ उठते. लहान मुलांना घामोळ्याचा त्रास वाढत आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे. उन्हामध्ये बाहेर पडताना डोळ्यावर गॉगल वापरणे, तसेच डोके आणि त्वचा झाकणे आवश्यक आहे. तसेच लगेच औषधोपचार करणेही गरजेचे झाले आहे. या उपायातूनच उन्हापासून बचाव करता येतो. (शहर प्रतिनिधी )