शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

विविधातील कर्मचाºयांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:01 IST

येथील विविधा केंद्रातून विद्यार्थी व पालक तसेच शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे अनेक कागदपत्रे दिल्या जातात.

ठळक मुद्देकरार संपला : शपथपत्रासह विविध कामे ठप्प;विद्यार्थी, पालक व शेतकºयांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील विविधा केंद्रातून विद्यार्थी व पालक तसेच शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे अनेक कागदपत्रे दिल्या जातात. सदर कार्यालयात कंत्राटीपद्धतीने काही तरुण विविध कामांसाठी कार्यरत आहेत; पण कंत्राटदाराच्या कंत्राटाचा करार नुकताच संपल्याने तेथील कर्मचाºयांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. शुक्रवारी अधिकारच नसल्याने एकाही कर्मचाºयांने कामाला हाथ लावला नाही. त्यामुळे विविध कामानिमित्त येणाºयांना नाहक त्रास सहन करावा लागला.विविधा केंद्रातील कंत्राटीपद्धतीने काम करणाºया तरुणांना कंत्राटदाराकडून अतिशय अल्प मोबदला दिला जातो. अल्प मोबदला मिळत असला तरी अनेक तरुण येथे काम करून आपल्या कुटुंबियांना सहकार्य करतात. या कार्यालयातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखरेखीत चालते. येथे विविध कामासाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी वेळोवेळी कंत्राट काढून तरुणांची भरती केली जाते. सध्या कंत्राटीपद्धतीने सेवा देणारे सुमारे ३५ तरुण कार्यरत आहेत. त्यात एका तरुणीचा समावेश आहे. परंतु, मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट २६ आॅक्टोबरला संपल्याने व तशी माहिती संबंधीताने विविधा केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना सांगण्यात आली. सदर वार्ता कर्मचाºयांना माहिती होताच आपल्याला काम करण्याचा अधिकारच नाही त्यामुळे आपण नागरिकांची कामे कशी करावी असे कारण पुढे करीत नवीन कंत्राटदाराने आम्हाला कामावर सामावून घ्यावे अशी मागणी करीत शुक्रवारी कामाला हाथ लावला नाही. पूर्वी कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना नव्या कंत्राटदाराने कामावर सामावून घ्यावे, या मागणीचे निवेदन विविधामधील कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाºयांनी विविधामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांच्या मागणीवर सकारात्क प्रतिसाद न दिल्याचा आरोप करीत अखेर शुक्रवारी सकाळपासून कर्मचाºयांनी कुठलेही काम करण्यास नकार दिला. त्यामुळे विविध प्रमाणपत्र व शपथपत्र तयार करण्याचे विविधा केंद्रातील कामकाज ठप्प झाले होते.एनएसपी ग्रामदूत कर्मचाºयांना कार्यरत कराएनएसपी फ्युचरटेक ग्रामसेतूमध्ये गत १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाºयांवर करार संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सुमारे ३५ कर्मचाºयांवर बेरोजगारीचे सावट आहे. त्यांना तात्काळ नव्याने देण्यात येणाºया कंत्राटदाराने कामावर सामावून घ्यावे व यासाठी जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी निवेदनातून विविधामधील कर्मचाºयांनी केली आहे.रिकाम्या खुर्च्यां पाहून अनेक जण परतलेनवीन कंत्राटदाराने पूर्वीच्या कर्मचाºयांना कामावर सामावून घ्यावे व यासाठी जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करावी, ही मुख्य मागणी रेटून लावण्यासाठी शुक्रवारी विविधामधील एकाही कर्मचाºयांने कामाला हात लावला नाही. विविधा केंद्रातील रिकाम्या खुर्चा शुक्रवारी दिवस भर कर्मचाºयांची प्रतीक्षाच करीत होत्या. विविध कामानिमित्त विविधा केंद्रात आलेल्या अनेकांना कर्मचारीच खुर्चीवर नसल्याने नाहक त्रास सहन करत आल्यापावली परत जावे लागले.