शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

पाणवठे आटल्यामुळे शिकारीच्या प्रमाणात वाढ

By admin | Updated: April 21, 2017 01:59 IST

जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी तृष्णातृप्तीसाठी गाव शिवाराकडे धाव घेत असल्याचे दिसते. परिणामी,

वन विभागाचे दुर्लक्ष : वन्य प्राण्यांची गावांकडे धावआकोली : जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी तृष्णातृप्तीसाठी गाव शिवाराकडे धाव घेत असल्याचे दिसते. परिणामी, शिकारीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वनविभाग दखल घेऊन शिकारीला आळा घालणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परिसरात खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्र एकमेकाला जुळलेले आहे. दोन्ही वनपरिक्षेत्रात दाट वनराजी असल्याने येथे हरिण, रानडुक्कर, रोही या प्राण्यांसह भोर, रानकोंबडी, लावे, तितर हे पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. उन्हाची काहिली वाढली आहे. तप्त झळांनी वन्य पशु-पक्ष्यांना सळो की पळो करून सोडले आहे. अशात जंगलातील नैसर्गिक पाण्याचे झरे कधीचेच आटले असून पाणवठेही कोरडे पडत आहेत. यामुळे आपली तृष्णा भागविण्यासाठी वन्यजीव गाव शिवाराकडे धाव घेत आहेत. जंगलाकाठी असलेल्या विहिरीवर पाण्याची सोय नाही. गावाशेजारी असणाऱ्या शेतातच शेतकरी चारा, पीक, ऊस, भाजीपाला ही पिके घेतात. यामुळे स्वाभाविकपणे पाणीही गावाशेजारी उपलब्ध होत असल्याने वन्यजीवांनी आपला मोर्चा गावांकडे वळविला आहे. या संधीचा फायदा शिकारी घेत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या झळांमुळे वन कर्मचाऱ्यांची गस्त कमी झाली आहे. यामुळे केलेल्या शिकारीची विल्हेवाट लावणे सोपे झाले आहे. रानडुकराची तर दररोजच शिकार केली जात असल्याचे दिसते. दुचाकीवर मारलेले रानडुक्कर नेताना दिसतात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मोराच्या शिकारीची सुद्धा चर्चा आहे. शिकारीसाठी काही गावे कुख्यात आहेत; पण केलेली शिकार उघड होत नाही. सामान्यांना माहिती असते; पण वनविभागाला ती दिली जात नाही. याकडे लक्ष देणेच गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)