शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

पाणवठे आटल्यामुळे शिकारीच्या प्रमाणात वाढ

By admin | Updated: April 21, 2017 01:59 IST

जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी तृष्णातृप्तीसाठी गाव शिवाराकडे धाव घेत असल्याचे दिसते. परिणामी,

वन विभागाचे दुर्लक्ष : वन्य प्राण्यांची गावांकडे धावआकोली : जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी तृष्णातृप्तीसाठी गाव शिवाराकडे धाव घेत असल्याचे दिसते. परिणामी, शिकारीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वनविभाग दखल घेऊन शिकारीला आळा घालणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परिसरात खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्र एकमेकाला जुळलेले आहे. दोन्ही वनपरिक्षेत्रात दाट वनराजी असल्याने येथे हरिण, रानडुक्कर, रोही या प्राण्यांसह भोर, रानकोंबडी, लावे, तितर हे पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. उन्हाची काहिली वाढली आहे. तप्त झळांनी वन्य पशु-पक्ष्यांना सळो की पळो करून सोडले आहे. अशात जंगलातील नैसर्गिक पाण्याचे झरे कधीचेच आटले असून पाणवठेही कोरडे पडत आहेत. यामुळे आपली तृष्णा भागविण्यासाठी वन्यजीव गाव शिवाराकडे धाव घेत आहेत. जंगलाकाठी असलेल्या विहिरीवर पाण्याची सोय नाही. गावाशेजारी असणाऱ्या शेतातच शेतकरी चारा, पीक, ऊस, भाजीपाला ही पिके घेतात. यामुळे स्वाभाविकपणे पाणीही गावाशेजारी उपलब्ध होत असल्याने वन्यजीवांनी आपला मोर्चा गावांकडे वळविला आहे. या संधीचा फायदा शिकारी घेत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या झळांमुळे वन कर्मचाऱ्यांची गस्त कमी झाली आहे. यामुळे केलेल्या शिकारीची विल्हेवाट लावणे सोपे झाले आहे. रानडुकराची तर दररोजच शिकार केली जात असल्याचे दिसते. दुचाकीवर मारलेले रानडुक्कर नेताना दिसतात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मोराच्या शिकारीची सुद्धा चर्चा आहे. शिकारीसाठी काही गावे कुख्यात आहेत; पण केलेली शिकार उघड होत नाही. सामान्यांना माहिती असते; पण वनविभागाला ती दिली जात नाही. याकडे लक्ष देणेच गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)