शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दहावीत मुलीच ठरल्या भारी; वर्धा जिल्हा विभाग तळाला

By रवींद्र चांदेकर | Updated: May 27, 2024 15:45 IST

९२.०२ टक्के निकाल : आर्वीची साक्षी गांधी प्रथम

वर्धा : बारावीनंतर सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलीच भारी ठरल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.०२ टक्के लागला आहेे. आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची साक्षी मनोज गांधी ९९.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिली आली आहे.

नागपूर विभागात जिल्हा दहावीच्या निकालात तळाला गेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये दहावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यातून १५,८६० विद्यार्थी प्रविष्ट होते. यात मुले ८ हजार ३०३, तर मुली ७ हाजार ५५७ ७ होत्या. प्रत्यक्षात ८ हजार १९६ मुले आणि ७ हजार ५१७ मुली अशा एकूण ११५ हजार ७१३ जणांनी परीक्षा दिली होती. यापैकी १४ हजार हजार ४६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात सात हजार १५१ मुली, तर सात हजार ३०९ मुलांंचा समावेश आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का जास्त आहे. ९५.१३ टक्के मुली, तर ८९.१७ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ८७.९८ टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदा टक्केवारीत ४.०४ टक्के वाढ झाली आहे.

पाच हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत

जिल्ह्यातील पाच हजार १५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत चार हजार ५५०, तर तृतीय श्रेणीत चार हजार ७६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धाResult Dayपरिणाम दिवस