शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: July 29, 2016 02:06 IST

गत एक महिन्यापासून शहरवासीयांना अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे.

 कारंजावासीयांचे आरोग्य धोक्यात : नगरपंचायतीतून तुरटी बेपत्ता कारंजा (घाडगे) : गत एक महिन्यापासून शहरवासीयांना अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारंजा शहर नगरपंचायत होवून बराच कालावधी झाला आहे. असे असताना या शहरात सुविधा वाढण्याऐवजी असुविधाच अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. कारंजा शहराला नियमीत व शुध्द पाणी पुरवठा व्हावा म्हणुन कारंजा ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच शिरीष भांगे यांच्या प्रयत्नाने त्यांच्या कार्यकाळात लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. नव्या टाक्या, नवीन पाईपलाईन टाकण्यात आली; मात्र याचा लाभ शहरवासीयांना होत नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या शुद्धतेकरिता आवश्यक असलेल्या तुरटीचा साठा गत कित्येक दिवसांपासून संपला आहे. अशुध्द पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराला होत असलेल्या अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यापासून नागरिकांची मुक्तता करावी अशी मागणी आहे.(शहर प्रतिनिधी) कारंजा शहरात सर्वत्र अशुध्द पाणी पुरवठा होत असला तरी प्रभाग क्रमांक ३ व ५ याला अपवाद ठरत आहे. या भागातील नागरिकांना शुध्द पाणी मिळत आहे. शहरात सर्वत्र अशुद्ध पाणी मिळत असून या भागातील नळाला शुध्द पाणी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारीही अवाक् झाले आहे. शहरात काही प्रभागात शुद्ध आणि काही भागात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने मलाही आश्चर्य वाटत आहे. शुद्धीकरण केंद्राकरिता असलेला तुरटीचा साठा संपलेला आहे. त्यामुळे कदाचीत पाणी शुध्द येत नसेल. तुरटीचा साठा त्वरीत बोलाविण्यात येईल. - विलास काचोरे, मुख्याधिकारी (प्रभारी), न.प. कारंजा(घा.)