शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: July 29, 2016 02:06 IST

गत एक महिन्यापासून शहरवासीयांना अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे.

 कारंजावासीयांचे आरोग्य धोक्यात : नगरपंचायतीतून तुरटी बेपत्ता कारंजा (घाडगे) : गत एक महिन्यापासून शहरवासीयांना अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारंजा शहर नगरपंचायत होवून बराच कालावधी झाला आहे. असे असताना या शहरात सुविधा वाढण्याऐवजी असुविधाच अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. कारंजा शहराला नियमीत व शुध्द पाणी पुरवठा व्हावा म्हणुन कारंजा ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच शिरीष भांगे यांच्या प्रयत्नाने त्यांच्या कार्यकाळात लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. नव्या टाक्या, नवीन पाईपलाईन टाकण्यात आली; मात्र याचा लाभ शहरवासीयांना होत नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या शुद्धतेकरिता आवश्यक असलेल्या तुरटीचा साठा गत कित्येक दिवसांपासून संपला आहे. अशुध्द पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराला होत असलेल्या अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यापासून नागरिकांची मुक्तता करावी अशी मागणी आहे.(शहर प्रतिनिधी) कारंजा शहरात सर्वत्र अशुध्द पाणी पुरवठा होत असला तरी प्रभाग क्रमांक ३ व ५ याला अपवाद ठरत आहे. या भागातील नागरिकांना शुध्द पाणी मिळत आहे. शहरात सर्वत्र अशुद्ध पाणी मिळत असून या भागातील नळाला शुध्द पाणी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारीही अवाक् झाले आहे. शहरात काही प्रभागात शुद्ध आणि काही भागात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने मलाही आश्चर्य वाटत आहे. शुद्धीकरण केंद्राकरिता असलेला तुरटीचा साठा संपलेला आहे. त्यामुळे कदाचीत पाणी शुध्द येत नसेल. तुरटीचा साठा त्वरीत बोलाविण्यात येईल. - विलास काचोरे, मुख्याधिकारी (प्रभारी), न.प. कारंजा(घा.)