शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
4
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
5
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
6
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
7
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
8
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
9
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
10
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
11
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
12
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
13
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
15
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
16
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
17
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
18
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
19
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
20
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

साखरेप्रमाणे कापसावरही आयात शुल्क लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:30 IST

बाजारात साखरेचे दर पडताच ऊस उत्पादक, साखर कारखानदारांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून केंद्र शासनाने साखरेवर १०० टक्के आयात शुल्क सुरू केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : १५ दिवसांत शेतकऱ्यांकडील सर्व कापूस व्यापाऱ्यांच्या घशात जाणार

आॅनलाईन लोकमतरोहणा : बाजारात साखरेचे दर पडताच ऊस उत्पादक, साखर कारखानदारांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून केंद्र शासनाने साखरेवर १०० टक्के आयात शुल्क सुरू केले. यातून ऊस उत्पादक व साखर कारखानदारांना आर्थिक दिलासा मिळाला; पण पंधरवड्यात कापसाचे भाव प्रती क्विंटल ५०० रुपये घसरत असताना कापसावर आयात कर लादला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. याकडे लक्ष देत कापसावर आयात कर लावण्याची मागणी होत आहे.कापूस गिरणी मालकांना शून्य टक्के आयात शुल्कावर कापूस आयातीची मुभा देण्यात आली आहे. कापूस आयातीवरील शुल्क कधी वाढविणार, हा प्रश्नच आहे. कापूस पूर्णत: व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यावर आयात शुल्क लावणार काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.कापूस गाठींना उठाव नाही, सरकीचे भाव पडले. जिनिंग प्रक्रिये दरम्यान सरकीची भुकटी होते. कापसाच्या रूईची प्रत घसरली, आदी कारणे पूढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी चांगल्या कापसाला ५२०० ते ५३०० रुपये मिळणारा भाव ४८०० रुपयांवर आणला. मागचा कापूस घेण्यास व्यापारी नकारच देत आहे. मागच्या कापसाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल वेचाईसाठी शेतकऱ्याने खर्ची घातले. हा कापूस घरी साठविणे आरोग्यास हानीकारक असल्याचे अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. अशावेळी व्यापारीही कापूस खरेदीस उदासिनता दाखवित आहे. असे असताना केंद्र शासनाने कापूस आयातीवर कोणतेही शुल्क न आकारता आयातीस मुभा देणे कापूस उत्पादकांच्या दृष्टीने अनाकलनीय आहे.शेतकऱ्यांचा सर्व कापूस व्यापारी वर्गाकडे गेल्यानंतर आयातीवर आयात शुल्क लावण्यापेक्षा केंद्र शासनाने त्वरित आयात शुल्क लावून कापूस उत्पादकांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.कृषी मूल्य आयोगालाही अद्याप यश नाहीकापूस आयातीवर आयात शुल्क लावण्याची गरज आहे, हे केंद्र शासनाला पटवून देण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात आहे; पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आल्याचे दिसत नाही. आणखी १५ दिवस हे चित्र कायम राहिल्यास शेतकऱ्यांचा सर्व कापूस व्यापाऱ्यांच्या गोदामात जमा होणार आहे. यानंतर केंद्र शासनाने कापसावरील आयात शुल्क वाढविले तर ते व्यापाऱ्यांनाच अधिक फायद्याचे ठरणार आहे. शासन मात्र आम्ही कापूस उत्पादकांची मागणी पूर्ण केल्याचे छाती ठोकून सांगणार आहे, हे निश्चित. ही बाब टाळून व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांना फायदा करून देण्यासाठी कापसावर त्वरित आयात शुल्क लावणे गरजेचे झाले आहे.