शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना पटवून दिले जलसंवर्धनाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:49 IST

पाणी फाऊनडेशनच्यावतीने आयोजित सत्येमय जयते वाटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय कार्यशाळा येथील विद्या भारती महाविद्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

ठळक मुद्देवॉटर कपची तालुकास्तरीय कार्यशाळा : तहसीलदारांसह मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : पाणी फाऊनडेशनच्यावतीने आयोजित सत्येमय जयते वाटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय कार्यशाळा येथील विद्या भारती महाविद्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेंद्र सोनुने, गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, डॉ. उल्लास जाजू, दौलत, डॉ. प्रा. संजय कानोडे, भरत घेर, अशोक सूर्यवंशी, अमीत दळवी आदींची उपस्थिती होती.मार्गदर्शन करताना तहसीलदार सोनुने यांनी पाणी फाऊनडेशन अंतर्गत सत्येमय जयते वाटर कप -३ स्पर्धेमुळे तालुक्यातील गावांना पाणीदार करण्याची संधी चालुन आलेली आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत तालुक्यातील ७६ गावांनी सहभाग नोंदविला आहे. ही प्रक्रिया अधीक गतिमान करण्यासाठी गावातील लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. या प्रक्रिये दरम्यान गावात झालेल्या कामाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाची जोड देता येईल. त्यातून गावाची प्रगती नक्कीच साधता येईल. आपण सर्व मिळून एक व्यापक पाण्याची लोक चळवळ बनवू या, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.डॉ. उल्लास जाजू म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु, सध्या त्याने सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. रासायनिक शेती शेतकºयांची उडचण वाढविणारीच ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सेंद्रीय शेती करणाºयांना प्रोत्साहनही देणे गरजेचे आहे. शेतकरी समृद्ध होण्यासाठी त्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविणे गरजेचे आहे. संपूर्ण परिसर पाणीदार बनविण्याची संधी ग्रामस्थांपर्यंत चालून आली आहे. त्याचा लाभ घेतला पाहिजे. पाणी फाऊनटेशनच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांनी सांगितले की, दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी हा उपक्रम फायद्याचा ठरणारा आहे. या प्रक्रियेतून आपल्याला दुष्काळाकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग नक्कीच मिळेल. सरकारी पातळीवरून आपल्याला योग्य अशी मदत मिळेल. शोष खड्डे, रोपवाटिका, शेततळे आदी कामे आपण श्रमदानातून केली पाहिजे. तेव्हाच हा उपक्रम एक लोकचळवळ म्हणून पुढे येईल आणि आपले गाव पाणीदार बनेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी काकडदरा येथील वाटर हिरोज दौलतभाऊ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अशोक सूर्यवंशी यांनी केले. संचालन भरत घेर यांनी केले तर आभार किरण यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य आदींची उपस्थिती होती.