शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

नागरिकांना पटवून दिले जलसंवर्धनाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:49 IST

पाणी फाऊनडेशनच्यावतीने आयोजित सत्येमय जयते वाटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय कार्यशाळा येथील विद्या भारती महाविद्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

ठळक मुद्देवॉटर कपची तालुकास्तरीय कार्यशाळा : तहसीलदारांसह मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : पाणी फाऊनडेशनच्यावतीने आयोजित सत्येमय जयते वाटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय कार्यशाळा येथील विद्या भारती महाविद्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेंद्र सोनुने, गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, डॉ. उल्लास जाजू, दौलत, डॉ. प्रा. संजय कानोडे, भरत घेर, अशोक सूर्यवंशी, अमीत दळवी आदींची उपस्थिती होती.मार्गदर्शन करताना तहसीलदार सोनुने यांनी पाणी फाऊनडेशन अंतर्गत सत्येमय जयते वाटर कप -३ स्पर्धेमुळे तालुक्यातील गावांना पाणीदार करण्याची संधी चालुन आलेली आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत तालुक्यातील ७६ गावांनी सहभाग नोंदविला आहे. ही प्रक्रिया अधीक गतिमान करण्यासाठी गावातील लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. या प्रक्रिये दरम्यान गावात झालेल्या कामाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाची जोड देता येईल. त्यातून गावाची प्रगती नक्कीच साधता येईल. आपण सर्व मिळून एक व्यापक पाण्याची लोक चळवळ बनवू या, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.डॉ. उल्लास जाजू म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु, सध्या त्याने सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. रासायनिक शेती शेतकºयांची उडचण वाढविणारीच ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सेंद्रीय शेती करणाºयांना प्रोत्साहनही देणे गरजेचे आहे. शेतकरी समृद्ध होण्यासाठी त्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविणे गरजेचे आहे. संपूर्ण परिसर पाणीदार बनविण्याची संधी ग्रामस्थांपर्यंत चालून आली आहे. त्याचा लाभ घेतला पाहिजे. पाणी फाऊनटेशनच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांनी सांगितले की, दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी हा उपक्रम फायद्याचा ठरणारा आहे. या प्रक्रियेतून आपल्याला दुष्काळाकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग नक्कीच मिळेल. सरकारी पातळीवरून आपल्याला योग्य अशी मदत मिळेल. शोष खड्डे, रोपवाटिका, शेततळे आदी कामे आपण श्रमदानातून केली पाहिजे. तेव्हाच हा उपक्रम एक लोकचळवळ म्हणून पुढे येईल आणि आपले गाव पाणीदार बनेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी काकडदरा येथील वाटर हिरोज दौलतभाऊ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अशोक सूर्यवंशी यांनी केले. संचालन भरत घेर यांनी केले तर आभार किरण यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य आदींची उपस्थिती होती.