शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कृषी योजना व शेतकरी बचतगटांचे वैरच

By admin | Updated: June 13, 2014 00:24 IST

शेती उत्पादनात वाढ व्हावी, शेतीवर आधारित उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी जिल्ह्यात ‘आत्मा’ अंतर्गत पुरुषांच्या शेतकरी बतचगटाची स्थापना केली गेली; पण बचतगटातील सदस्यांना

देवळी : शेती उत्पादनात वाढ व्हावी, शेतीवर आधारित उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी जिल्ह्यात ‘आत्मा’ अंतर्गत पुरुषांच्या शेतकरी बतचगटाची स्थापना केली गेली; पण बचतगटातील सदस्यांना प्रशिक्षण दिले जात नसल्याने ही योजना कागदोपत्रीच राबविली जाते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कृषी विभागांतर्गत परिसरातील शेतकऱ्यांच्या बचतगटांची नोंदणी करण्यात आली़ तालुका कृषी कार्यालयात आत्मांतर्गत यासाठी कर्मचारी नेमून दिला आहे. त्यांच्याकडे शेतकरी बचतगटांची नोंद असून अध्यक्ष, सचिवांचे भ्रमणध्वनी क्रमांक व गावांचे पत्ते आहेत; पण तालुका कृषी कार्यालयाद्वारे शेतकऱ्यांशी कुठलाही संपर्क केला जात नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाला एखाद्या योजनेबाबत माहिती विचारल्यास तुम्ही कोणती शेती करू शकता, त्याची रितसर माहिती द्या, प्रशिक्षणाच्या वेळी तुम्हाला बोलविले जाईल, असे उत्तर दिले जाते. शेतकरी हुशार असता तर त्यांना कृषी विभागावर अवलंबून राहावे लागले असते काय, हा प्रश्नच आहे़ शेतकऱ्यांना संपर्क करणे आमचे काम नाही. शेतकऱ्यांनी माहिती आम्हाला विचारावी, अशी बेजबाबदार उत्तरे कृषी विभागाकडून दिली जात आहेत़ गत दोन वर्षांपासून बचतगटांसोबत कृषी विभागाचा संपर्कच नाही. केवळ नागपूर येथे विज्ञान प्रदर्शनाकरिता शेतकऱ्यांना ५० रुपये भरून नेण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांतर्गत आत्मा या उपक्रमात खर्च केला जात आहे़

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकरिता जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी चालविलेले प्रयोग, फळबाग, शेती लागवड, भरपूर प्रमाणात घेतलेले उत्पन्न अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घडवून आणणे, त्यांनी नियोजन कसे केले याबाबत माहिती देणे आदी कामे करणे अपेक्षित आहे; पण कृषी विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनच केले नाही. उलट या विभागाशी संपर्क साधला असता तुम्हाला कशाची आवश्यकता आहे, कोणते प्रशिक्षण घ्यायचे आहे, रेमीम, फळबाग, दुग्ध व्यवसाय याबाबत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कृषी विभागात संपर्क साधावा, असे सूचविले जाते़ यावरून कृषी विभाग शेतकऱ्यांच्या हिताकरिता किती तत्पर आहे, हे दिसून येते़ जिल्ह्यात बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. या बियाण्यांबद्दलही कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गजरेचे आहे. कृषी विभागाच्या योजना पुरुष बचतगटापर्यंत कशा पोहोचतील व आत्मांतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ होईल, याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे़(प्रतिनिधी)