शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

पत्नीचे नावे घर, कायद्याची अंमलबजावणी करा

By admin | Updated: August 14, 2016 00:29 IST

महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर २००३ ला शासन निर्णय काढून, ग्रामीण भागातील विवाहित महिलांमध्ये, सुरक्षिततेची भावना ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संघटनांचा धरणे आंदोलनाचा इशारा वर्धा : महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर २००३ ला शासन निर्णय काढून, ग्रामीण भागातील विवाहित महिलांमध्ये, सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी, त्यांना पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क देणे ही मुलभूत गरज मानली. त्या अनुषंगाने, घर ही प्राप्त संपत्ती दोघांची असल्याचे मानुन व स्त्रीयांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी, पतीच्या नावे असलेल्या घराची नोंद, पती आणि पत्नी या दोघांच्याही संयुक्त नावे करण्यासाठी शासन आदेश काढला. पण तेरा वर्षात याची योग्य अंमलबजावणीच झालेली नाही. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी एका निवेदनातून विविध संघटनांनी केली आहे.े अनेक महिलांना त्यांचा कादेशीर अधिकार असतानासुद्धा आपल्या हक्काच्या घराला मुकावे लागले. यापुढे ते होवू नये, ग्रामपंचायत क्षेत्रामधल्या प्रत्येक पुरुषांच्या घरावर त्यांच्या पत्नीच्या नावाची नोंद व्हावी, यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी निवेदनात म्हटले आहे. निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना सादर केलेल्या निवेदनात, पत्नीचे नावे घर या शासन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश, सर्व महिला व बालविकास विभाग, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच यांना दिले. भारतीय राज्यघटना, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले पत्नीच्या बाबतीत पतीच्या संपत्तीत दिलेले अधिकार आणि पतीने, कुठलीही व्यसनाधिनतेने किंवा मतभेदामधून, पत्नीला तिच्या राहत्या घराबाहेर हाकलून देवू नये, किंवा पत्नीच्या सहमतीशिवाय, तिचे राहते घर विकून, तिला घराबाहेर जाण्यास भाग पाडू नये, हा त्या मागील हेतू होता. या धरणे आंदोलनाला महात्मा फुले समता परिषद, किसान अधिकार अभियान, राष्ट्रवादी किसान सभा, वर्धा जिल्हा काँग्रेस कमेटी,वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी महिला काँगे्रस, जिल्हा महिला काँग्रेस यांनीसुद्धा पाठींबा दिलेला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)