शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

अपंग कायद्याची अंमलबजावणी करा

By admin | Updated: December 7, 2014 22:56 IST

पुरोगामी राज्यात सर्वात शेवटचा घटक म्हणून गणना होत असलेल्या अपंग व्यक्ती आजही त्यांच्या हक्कापासून वंचित आहे. या व्यक्तींना न्यायापासून शासन वंचित ठेवण्याचे कारस्थान राज्यकर्त्यांनी केले आहे.

वर्धा : पुरोगामी राज्यात सर्वात शेवटचा घटक म्हणून गणना होत असलेल्या अपंग व्यक्ती आजही त्यांच्या हक्कापासून वंचित आहे. या व्यक्तींना न्यायापासून शासन वंचित ठेवण्याचे कारस्थान राज्यकर्त्यांनी केले आहे. अपंग व्यक्ती कायदा १९९५ हा १९९६ सालापासून अंमलात आला असताना प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे. याबाबीची गंबीर दखल घेत कायद्याची अंमलबजावणी करुन अपंगांकरिता असलेल्या योजना लागू कराव्या, अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने केले आहे.या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. निवेदनानुसार, २००१ साली अपंगाची गणना झाली. तेव्हापासून अपंगाची गणना केली नाही. २००१ मध्ये महाराष्ट्रात १७ लाख अपंगाची नोंद केली होती. स्वतंत्र पाहणीनुसार ही आकडेवारी आता कोट्यवधीवर पोहचली आहे. १ करोड ५७ हजार अपंग मतदारांची संख्या महाराष्ट्रात राज्यात असताना अपंगासाठी राखीव मतदार संघ नाही. विधान परिषदेत कलाकार, शिक्षक यांना प्रतिनिधीत्त्व दिले जाते मग अपंग बांधवावर हा अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. घटनेने नागरिकांना समान अधिकार दिले असताना अपंगांना मात्र हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार होत आहे. अपगांचे वेतन ६०० रुपयांपासून वाढविण्याची गरज आहे. बी.पी.एल. चा लाभार्थी असताना त्याला बी.पी.एल. कार्ड दिले जात नाही. संजय गांधी निराधार वेतन योजनेसाठी अपंग बांधवाला बी.पी.एल. कशाला पाहिजे अशी विचारणा शासकीय कर्मचारी करतात. प्रत्यक्षात बी.पी.एल. कार्डाची अट असल्यामुळे अपंग लाभार्थी पात्र असतानाही या योजनेपासून वंचित आहे. अंत्योदयाचा योजनेचा लाभ अपंग बांधवाला मिळाला अशी तरतुद केली जावी. याबाबत शासन निर्णय असताना अधिकारीऱ्यांमुळे अपंग व्यक्ती यापासून वंचित आहेत. याप्रमाणे अनेक योजना आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हेकेकोरपणामुळे अपंगांना लाभ मिळत नाही. अपंगांना रोजगार मिळण्यासाठी शासनाने परिपत्रक काढून अपंगाना २०० स्के.फिट जागा देण्याची मागणी केली. अपंग समाजाला त्रास देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, समाजातील अन्य घटकावर कारवाईचे शासन परिपत्रक काढावे. या निवेदनाची दखल घेत तातडीने निर्णय घेत कार्यवाही व अंमलबजावणीचे आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी मारोती महाकाळकर, उमेश नेवारे, राजेश पंपनवार, सुरेश ढोकपांडे यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)