शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आयात शुल्कवाढीत कापसाला सापत्न वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:01 IST

केंद्र शासनाने शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा कमी होऊ नये म्हणून साखर, वाटाणा व चणा या शेतमालाच्या आयात शुल्कात वाढ करीत भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला; पण कापसाच्या आयात शुल्कात कुठलीही वाढ केली नाही.

ठळक मुद्देकेंद्र शासनाचेही दुर्लक्ष : भाव पडल्याने शेतकºयांना तोटा

ऑनलाईन लोकमतरोहणा : केंद्र शासनाने शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा कमी होऊ नये म्हणून साखर, वाटाणा व चणा या शेतमालाच्या आयात शुल्कात वाढ करीत भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला; पण कापसाच्या आयात शुल्कात कुठलीही वाढ केली नाही. यातून कापसाला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. शिवाय केंद्र शासन कुणाच्या दबावाखाली कापूस उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे, हा प्रश्नही शेतकºयांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.साखरेचे खुल्या बाजारातील मूल्य घसरताच शासनाने साखरेवर ९० टक्के आयात शुल्क लावून ऊस उत्पादकांना आर्थिक संरक्षण दिले. वाटाण्याचे भाव घसरताच आयात शुल्क ३० टक्के करून भावातील घसरण थांबविण्याचा प्रयत्न केला. चणा या शेतमालाचे हमीभाव ४ हजार ४०० रुपये असताना बाजारात खासगी व्यापारी शेतकºयांचा चणा ३,३०० ते ३,५०० रुपये प्रती क्विंटलने खरेदी करतात. शासनाने चण्यावरील आयात शुल्क ६० टक्के करून भावातील घसरण थांबविण्यास हातभार लावला; पण बाजारातील कापसाचे भाव मागील एक ते दीड महिन्यांपासून घसरलेले आहेत. याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.सुतगिरणी मालक शून्य टक्क्यावर कापसाची आयात करीत आहेत. गिरण्यांना आवश्यक असलेल्या कापसाचा साठा करून पूढील वर्षी कापसाचा पेरा घटणार हा अंदाज घेत पूढील हंगामासाठीदेखील कापसाचा साठा करून ठेवण्यासाठी गिरणी मालक शून्य आयात शुल्काचा फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.पहिल्या वेचातील कापसाचा ५,२०० ते ५,३०० रुपयांपर्यंत गेलेला भाव ४,४०० ते ४,२०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. शेवटचा कापूस तर व्यापारी खरेदी करायलाच तयार नाहीत. बोंडअळीग्रस्त कापूस आरोग्याच्या दृष्टीने शेतकरी घरी साठवून ठेवू शकत नाही. या परिस्थितीमुळे कापूस उत्पादकांची आर्थिक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.राज्यातील कापूस उत्पादक कापसाचे आयात शुल्क वाढवा म्हणून ओरड करीत आहे. शेतकºयांच्या मागणीचा विचार करून राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्र शासनाकडे कापसाचे आयात शुल्क त्वरित वाढविणे गरजेचे असल्यची बाब शासनाला पटवून दिल्याची माहिती आहे; पण राज्यात व केंद्रात सत्त असलेले भाजप सरकार राज्यातील आपल्याच पक्षाच्या शिफारसीकडे दुर्लक्ष करीत आहे. ही बाब केंद्र शासनावर दक्षिण भारतातील सुतगिरणी मालकांचा राजकीय दबाव असल्याचे सिद्ध करणारीच ठरत आहे. शासनाने याकडे लक्ष देत कापसाचे आयात शुल्क वाढवावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.काँगे्रसच्या काळातही उपेक्षाच होतीकाँग्रेस शासनाच्या काळात कापसाबाबत तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारण यांनी सुतगिरणी मालकांकडून निवडणूक निधी मिळविण्याच्या प्रयत्नात कापूस उत्पादकांवर अन्याय केला होता. यावर्षी देशातील कापसाचे उत्पन्न ३५ टक्क्यांनी घटले आहे. पीक भरपूर असताना भाव पडून उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो. मग, पीक निम्म्यावर असताना भाववाढीचा शेतकºयांना फायदा मिळत असेल तर त्यात आयातीचे धोरण स्वीकारुन आर्थिक लाभापासून शेतकºयांना वंचित ठेवणे हे गिरणी मालकांचे व शासनाचे षडयंत्र आहे. याबाबत कापूस उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :cottonकापूस