शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

सनातन संस्थेवर तत्काळ बंदी आणा

By admin | Updated: October 6, 2015 02:55 IST

धर्मजागृतीच्या नावावर देशात विद्वेष निर्माण करणाऱ्या आणि आतंकवाद स्थापित करू पाहणाऱ्या संस्थेवर सरकारने

वर्धा : धर्मजागृतीच्या नावावर देशात विद्वेष निर्माण करणाऱ्या आणि आतंकवाद स्थापित करू पाहणाऱ्या संस्थेवर सरकारने तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी जिल्ह्यातील सामाजिक, परिवर्तनवादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे. देशातील विवेकवादी विचारांची आणि विचारवंतांची हत्या इथल्या सनातनी विचारांनीच केली आहे. धर्मांधतेचा कट्टर पुरस्कर्ता असणाऱ्या आणि साधकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणाऱ्या सनातन संस्थेच्या एका साधकाला गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असा आरोप निवेदनातून केला आहे. या प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी आणि समाजाची दिशाभूल करण्यासाठी सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी मुंबई येथे आयोजित पत्रपरिषदेत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या प्रा. श्याम मानव यांनी केली अशी वल्गना करीत नवा वादंग निर्माण केला आहे, असा आरोप करीत सनातनच्या या वक्तव्यांचा जाहीर निषेधही निवेदनाद्वारे सर्व परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्यावतीने यावेळी करण्यात आला. सामाजिक संघटनांच्या संयुक्त मागणीचे सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक मडावी यांनी स्वीकारले. संघटनांद्वारे प्राप्त निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यावेळी सांगितले. शिष्टमंडळात अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सल्लागार संजय इंगळे तिगावकर, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या नुतन माळवी, किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, शेतकरी एकता मंचचे बाबाराव किटे, अ.भा. अंनिसचे जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, प्रा. किशोर वानखडे, सुरेश राहाटे, पंकज वंजारे, प्रा. एकनाथ मुरकुटे, गुणवंत डकरे, सुधीर पांगुळ, राजा वानखेडे, सुधीर गिऱ्हे, राजू थूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, डॉ. चंदू पोपटकर, प्रा. अरुण हर्षबोधी, किशोर ढाले, प्रशांत रोकडे, अल्का वानखेडे, रोहिणी देशकरी, संजय भगत, शारदा झामरे, राजा खडसे, प्रल्हाद इंगळे, दिवाकर इंगळे, रमेश चौधरी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी) वक्तव्याचा निषेध४नरेंद्र दाभोळकर, गोवोंद पानसरे, कलबुर्गी या परिवर्तनवादी ज्येष्ठ विचारवंतांची या दोन वर्षात हत्या झाली आहे. दाभोळकरांच्या हत्येचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या एका साधकाला अटक केली. परंतु समाजाची दिशाभूल करण्यासाठी सनातनने श्याम मानव यांच्यावर आरोप केल्याने सनातनच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला.