शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

सनातन संस्थेवर तत्काळ बंदी आणा

By admin | Updated: October 6, 2015 02:55 IST

धर्मजागृतीच्या नावावर देशात विद्वेष निर्माण करणाऱ्या आणि आतंकवाद स्थापित करू पाहणाऱ्या संस्थेवर सरकारने

वर्धा : धर्मजागृतीच्या नावावर देशात विद्वेष निर्माण करणाऱ्या आणि आतंकवाद स्थापित करू पाहणाऱ्या संस्थेवर सरकारने तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी जिल्ह्यातील सामाजिक, परिवर्तनवादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे. देशातील विवेकवादी विचारांची आणि विचारवंतांची हत्या इथल्या सनातनी विचारांनीच केली आहे. धर्मांधतेचा कट्टर पुरस्कर्ता असणाऱ्या आणि साधकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणाऱ्या सनातन संस्थेच्या एका साधकाला गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असा आरोप निवेदनातून केला आहे. या प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी आणि समाजाची दिशाभूल करण्यासाठी सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी मुंबई येथे आयोजित पत्रपरिषदेत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या प्रा. श्याम मानव यांनी केली अशी वल्गना करीत नवा वादंग निर्माण केला आहे, असा आरोप करीत सनातनच्या या वक्तव्यांचा जाहीर निषेधही निवेदनाद्वारे सर्व परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्यावतीने यावेळी करण्यात आला. सामाजिक संघटनांच्या संयुक्त मागणीचे सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक मडावी यांनी स्वीकारले. संघटनांद्वारे प्राप्त निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यावेळी सांगितले. शिष्टमंडळात अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सल्लागार संजय इंगळे तिगावकर, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या नुतन माळवी, किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, शेतकरी एकता मंचचे बाबाराव किटे, अ.भा. अंनिसचे जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, प्रा. किशोर वानखडे, सुरेश राहाटे, पंकज वंजारे, प्रा. एकनाथ मुरकुटे, गुणवंत डकरे, सुधीर पांगुळ, राजा वानखेडे, सुधीर गिऱ्हे, राजू थूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, डॉ. चंदू पोपटकर, प्रा. अरुण हर्षबोधी, किशोर ढाले, प्रशांत रोकडे, अल्का वानखेडे, रोहिणी देशकरी, संजय भगत, शारदा झामरे, राजा खडसे, प्रल्हाद इंगळे, दिवाकर इंगळे, रमेश चौधरी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी) वक्तव्याचा निषेध४नरेंद्र दाभोळकर, गोवोंद पानसरे, कलबुर्गी या परिवर्तनवादी ज्येष्ठ विचारवंतांची या दोन वर्षात हत्या झाली आहे. दाभोळकरांच्या हत्येचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या एका साधकाला अटक केली. परंतु समाजाची दिशाभूल करण्यासाठी सनातनने श्याम मानव यांच्यावर आरोप केल्याने सनातनच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला.