शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘कास्तकारायना’तून शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे चित्रण

By admin | Updated: September 26, 2015 02:13 IST

जगाचा पोशींदा असलेला शेतकरी, आज उपाशी आहे. इतरांची लाज राखताना आज तोच उघडा झाला आहे.

कारंजा (घा.) : जगाचा पोशींदा असलेला शेतकरी, आज उपाशी आहे. इतरांची लाज राखताना आज तोच उघडा झाला आहे. सर्व आघाड्यांवर त्याची पिछेहाट होत असून आत्महत्या करण्यास कसा प्रवृत्त होत आहे. हे हृदयविदारक सत्य काव्यरूपाने प्रा. डॉ. सुनील पखाले यांनी ‘कास्तकारायन’ या वऱ्हाडी काव्यसग्रहांतून प्रभावीपणे मांडले आहे, असे मत मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमाकांत कोलते यांनी व्यक्त केले.‘कास्तकारायन’ या वऱ्हाडी काव्यसग्रहाचे उद्घाटन येथील चरडे सभागृहात बुधवारी पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रसिध्द गझलकार प्रा. सिध्दार्थ भगत, प्राचार्य डॉ. संजय धनवटे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्यांचा सत्कार केला. यात प्रा.डॉ. महेंद्र गावंडे, प्रा.डॉ. गायत्री कडवे, कृषक सहकारी संस्था अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल प्रा. अविनाश कदम यांचा सत्कार केला. तसेच प्रा. डॉ. सुनील पखाले व प्रा. माया पखाले यांना सन्मानित केले. या कार्यक्रमात स्व. नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज येथील विविध मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विज्ञान अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गणेश मोहोड यांनी केले तर संचालन राणी भांगे हिने केले. कविता संग्रहाचे लेखक प्रा. सुनील पखाले यांनी शेतकऱ्यांची स्थिती ६१ कवितामधून मांडली. वऱ्हाडी भाषेतून प्रकाश टाकला, असा अभिप्राय मान्यवरांनी दिला. मंचावर प्रा. डॉ. गावंडे, डॉ. राठोड, प्रा. अजहर हुसेन उपस्थित होते. आभार प्रा. राठोड यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)