शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वृक्षांची अवैध कत्तल पर्यावरणाच्या मूळावर

By admin | Updated: April 21, 2017 01:55 IST

शासनाकडून वृक्ष लागवडीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे; पण वृक्ष संवर्धन, संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

लाकूड चोर सक्रिय : वन व बांधकाम विभागाचे दुर्लक्षवर्धा : शासनाकडून वृक्ष लागवडीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे; पण वृक्ष संवर्धन, संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. वन व बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाकूड चोर कंत्राटदारांचे फावत असल्याचे दिसते.वृक्षतोडीमुळे पर्यावरणास धोका होण्याची भीती आहे. वैध व अवैधरित्या वृक्ष कापल्यानंतर तेथे नवीन वृक्ष लावण्याची तसदी घेतली जात नाही. मोठ-मोठी वृक्ष कापली गेल्याने वनाचा मोठा भाग ओसाड होत आहे. परिपक्व न झालेली वृक्षेही अवैधरित्या कापली जात आहेत. एवढेच नव्हे तर मौल्यवान सागवान लाकडाचा वापर जलतरणासाठी केला जात आहे. या बाबीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने तस्कर आणि इतर वापरांसाठी वृक्ष तोडणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसते. विशेषत: वनपरिक्षेत्रात येणारा जंगलव्याप्त भाग तस्करांनी लक्ष्य केल्याचे दिसते. शिवाय अतिक्रमितांनी वृक्ष जाळून भुईसपाट करण्याचा सपाटा लावला आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याबबात गंभीर नसल्याचे दिसते. सागवान वृक्ष तोडून आवश्यक तसा माल तयार करून विकला जात आहे. मागील काही महिन्यांपासून वाढलेल्या या प्रकारावरून परिसरात सागवान चोरट्यांची टोळी सक्रीय झाली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. नवीन बांधकामासाठी दारे खिडक्या तयार करण्याकरिता स्वस्तात मिळत असलेले लाकूड खरेदी केले जात आहे. फर्निचर तयार करणाऱ्यांची वनअधिकारी व कर्मचाऱ्यांशी जवळीक असल्याने त्यांचाही व्यवसाय तेजीत आहे. या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)उमरी (मेघे) परिसरात विनापरवानगी वृक्षांची कत्तलशहरालगतच्या उमरी (मेघे) परिसरातील शिव मंदिराच्या मागील परिसरातील रविवारी वृक्षांची कत्तल करण्यात आली. हा प्रकार भर उन्हात केवळ दोन ते तीन तासांत घडला. या वृक्षकटाईकरिता कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकार वृक्ष लागवडीसाठी सातत्याने झटत आहे. यावर्षी राज्यात दोन कोटी वृक्षरोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यानुसार शासनातील सर्व विभागांनी पुढाकार घेत वृक्षरोपांची लागवड केली. एकीकडे वृक्षरोपे लावण्याला प्राधान्य दिले जात असताना काही ठिकाणी वृक्षांची अवैधरित्या कत्तल केली जात आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वृक्ष लागवडीवरील खर्च व्यर्थ ठरत असल्याचे दिसते.