शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून रखडलेल्या कामांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 11, 2015 02:50 IST

दोन वर्षांपूर्वी आलेल्या वादळात हिंगणी येथील विजेचे खांब तुटून तारा रस्त्यावर विखुरल्या होत्या.

महावितरणाचा भोंगळ कारभार : विजेचे खांब उचलले; पण पथदिवे बंदावस्थेतचबोरधरण : दोन वर्षांपूर्वी आलेल्या वादळात हिंगणी येथील विजेचे खांब तुटून तारा रस्त्यावर विखुरल्या होत्या. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खांब व तारा बाजूला करण्यात आले. खांब तुटल्याने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद झाले. दोन वर्षांचा काळ लोटला; पण खांबांची दुरूस्ती झाली नाही आणि पथदिवेही सुरू झाले नाही. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.हिंगणी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजेचे खांब ५ मे २०१३ रोजी झालेल्या वादळी पावसाने तुटले. यामुळे तारा रस्त्यावर पसरल्या होत्या. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही महावितरणने दुरूस्ती केली नाही. यामुळे तत्कालीन ग्रा.पं. सदस्य प्रवीण तोटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर ४ जुलै २०१३ रोजी तुटलेल्या तारा व खांब बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. तुटलेल्या खांबांमुळे सदर मार्गावरील पथदिवे बंद झाले. यामुळे नागरिकांना दोन वर्षांपासून अंधारात ये-जा करावी लागते. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी खांब उभे करण्यात आले; पण तारांची जोडणी अद्याप केलीच नाही. यामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. या मार्गाने शेतात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांना तसेच अंत्यविधीकरिता जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धामणगाव येथील नागरिकांनाही हा मार्ग जवळचा आहे. हिंगणी येथे महावितरणचे केंद्र असून वीज सुरळीत करण्यासाठी कर्मचारी आहेत. काही कर्मचारी बाहेर गावाहून ये-जा करीत असल्याने ते दुपारनंतरच दिसतात. गावातील कर्मचारी कामांकडे दुर्लक्ष करतात. दोन वर्षांपासून सायंकाळी या मार्गाने जाताना अनेकांना जखमी व्हावे लागले. मोठा अपघात झाल्यावरच महावितरण तारांची जोडणी करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)