शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

दोन वर्षांपासून रखडलेल्या कामांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 11, 2015 02:50 IST

दोन वर्षांपूर्वी आलेल्या वादळात हिंगणी येथील विजेचे खांब तुटून तारा रस्त्यावर विखुरल्या होत्या.

महावितरणाचा भोंगळ कारभार : विजेचे खांब उचलले; पण पथदिवे बंदावस्थेतचबोरधरण : दोन वर्षांपूर्वी आलेल्या वादळात हिंगणी येथील विजेचे खांब तुटून तारा रस्त्यावर विखुरल्या होत्या. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खांब व तारा बाजूला करण्यात आले. खांब तुटल्याने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद झाले. दोन वर्षांचा काळ लोटला; पण खांबांची दुरूस्ती झाली नाही आणि पथदिवेही सुरू झाले नाही. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.हिंगणी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजेचे खांब ५ मे २०१३ रोजी झालेल्या वादळी पावसाने तुटले. यामुळे तारा रस्त्यावर पसरल्या होत्या. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही महावितरणने दुरूस्ती केली नाही. यामुळे तत्कालीन ग्रा.पं. सदस्य प्रवीण तोटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर ४ जुलै २०१३ रोजी तुटलेल्या तारा व खांब बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. तुटलेल्या खांबांमुळे सदर मार्गावरील पथदिवे बंद झाले. यामुळे नागरिकांना दोन वर्षांपासून अंधारात ये-जा करावी लागते. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी खांब उभे करण्यात आले; पण तारांची जोडणी अद्याप केलीच नाही. यामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. या मार्गाने शेतात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांना तसेच अंत्यविधीकरिता जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धामणगाव येथील नागरिकांनाही हा मार्ग जवळचा आहे. हिंगणी येथे महावितरणचे केंद्र असून वीज सुरळीत करण्यासाठी कर्मचारी आहेत. काही कर्मचारी बाहेर गावाहून ये-जा करीत असल्याने ते दुपारनंतरच दिसतात. गावातील कर्मचारी कामांकडे दुर्लक्ष करतात. दोन वर्षांपासून सायंकाळी या मार्गाने जाताना अनेकांना जखमी व्हावे लागले. मोठा अपघात झाल्यावरच महावितरण तारांची जोडणी करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)