शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

खरडून गेलेल्या जमिनीच्या अनुदानातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 25, 2014 22:45 IST

जुलै महिन्यात रोहणा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने तब्बल एक वर्षानंतर अनुदान पाठविले. पण अनुदान वाटपात तलाठी

रोहणा : जुलै महिन्यात रोहणा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने तब्बल एक वर्षानंतर अनुदान पाठविले. पण अनुदान वाटपात तलाठी व त्याच्या दलालाने ज्यांची शेती खरडून गेली नाही अशांची व ज्यांच्याजवळ अजिबात जमीन नाही अशांची नावे यादीत घुसडून अनुदान उकळून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. विशेष म्हणजे ज्यांची शेते खरडून गेली अशांची नावे यादीतून वगळून पीडितांवर अन्याय करीत झालेला भ्रष्टाचार दबणार काय? असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांकरिता चर्चेचा विषय ठरत आहे.सविस्तर वृत्त असे की, शासनाने अतिवृष्टीत ज्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या अशांना आर्थिक मदत करण्यासाठी महसूल विभागाकडून सर्व्हे करून यादीनुसार विलंबाने का होईना अनुदान पाठविले. आता शेतकरी ही बाब विसरले आहेत. असे गृहित धरून तलाठ्याने आपल्या एका दलाला मार्फत अनुदान खात्यात जमा झाल्यावर ती रक्कम विड्राल करून आपल्याला आणून देईल अशांची नावे शोधली. मात्र दलालाने ज्यांच्या जमिनी नदीकाठापासून फार लांब अंतरावर आहे व अजिबात नुकसान झाले नाही अशांची नावे यादीत टाकली. बँकेने यादीनुसार रकमा खात्यावर जमा केल्या. सदर दलालाने अर्धे तुम्ही व अर्धे आम्ही हा फंडा वापरत खाडाखोड करून यादीत नाव समाविष्ट झालेल्यांकडून लाखो रुपये जमा केले. सदर बाब जेव्हा अनेक पीडित शेतकऱ्यांची नावे यादीत वगळल्याचे लक्षात येताच चर्चेचा विषय ठरला. याबाबत तहसीलदार आर्वी यांच्याकडे तक्रार सुद्धा झाली. त्यानंतर तहसीलदार आर्वी यांनी पुरवणी यादी तयार करून काही वगळलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले. पण ज्यांच्या जमिनी अजिबात बाधित झाल्याच नाही व ज्यांच्याकडे अजिबात शेतजमिनच नाही अशांनी उचलेले लाखो रुपयांचे अनुदान परत वसुल करण्याचे मोठे आवाहन महसूल प्रशासनासमोर आहे. याबाबत महसूल विभाग चुप्पी साधून आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या तलाठ्यावर कायदेशीर कारवाई करून वसूली करण्याची मागणी होत आहेत. (वार्ताहर)