शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

खरडून गेलेल्या जमिनीच्या अनुदानातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 25, 2014 22:45 IST

जुलै महिन्यात रोहणा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने तब्बल एक वर्षानंतर अनुदान पाठविले. पण अनुदान वाटपात तलाठी

रोहणा : जुलै महिन्यात रोहणा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने तब्बल एक वर्षानंतर अनुदान पाठविले. पण अनुदान वाटपात तलाठी व त्याच्या दलालाने ज्यांची शेती खरडून गेली नाही अशांची व ज्यांच्याजवळ अजिबात जमीन नाही अशांची नावे यादीत घुसडून अनुदान उकळून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. विशेष म्हणजे ज्यांची शेते खरडून गेली अशांची नावे यादीतून वगळून पीडितांवर अन्याय करीत झालेला भ्रष्टाचार दबणार काय? असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांकरिता चर्चेचा विषय ठरत आहे.सविस्तर वृत्त असे की, शासनाने अतिवृष्टीत ज्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या अशांना आर्थिक मदत करण्यासाठी महसूल विभागाकडून सर्व्हे करून यादीनुसार विलंबाने का होईना अनुदान पाठविले. आता शेतकरी ही बाब विसरले आहेत. असे गृहित धरून तलाठ्याने आपल्या एका दलाला मार्फत अनुदान खात्यात जमा झाल्यावर ती रक्कम विड्राल करून आपल्याला आणून देईल अशांची नावे शोधली. मात्र दलालाने ज्यांच्या जमिनी नदीकाठापासून फार लांब अंतरावर आहे व अजिबात नुकसान झाले नाही अशांची नावे यादीत टाकली. बँकेने यादीनुसार रकमा खात्यावर जमा केल्या. सदर दलालाने अर्धे तुम्ही व अर्धे आम्ही हा फंडा वापरत खाडाखोड करून यादीत नाव समाविष्ट झालेल्यांकडून लाखो रुपये जमा केले. सदर बाब जेव्हा अनेक पीडित शेतकऱ्यांची नावे यादीत वगळल्याचे लक्षात येताच चर्चेचा विषय ठरला. याबाबत तहसीलदार आर्वी यांच्याकडे तक्रार सुद्धा झाली. त्यानंतर तहसीलदार आर्वी यांनी पुरवणी यादी तयार करून काही वगळलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले. पण ज्यांच्या जमिनी अजिबात बाधित झाल्याच नाही व ज्यांच्याकडे अजिबात शेतजमिनच नाही अशांनी उचलेले लाखो रुपयांचे अनुदान परत वसुल करण्याचे मोठे आवाहन महसूल प्रशासनासमोर आहे. याबाबत महसूल विभाग चुप्पी साधून आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या तलाठ्यावर कायदेशीर कारवाई करून वसूली करण्याची मागणी होत आहेत. (वार्ताहर)