शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:56 IST

जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागही उदासीन : चोरट्यांवर लक्ष ठेवण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची जबाबदारी बांधकाम विभाग सांभाळतो; पण काही ठिकाणी त्यांच्याच साक्षीने वृक्षांची कत्तल होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेत सबंध जगात वृक्षारोपणाची मोठी मोहीमच राबविली जात आहे. देशातही वृक्ष लागवडीवर भर दिला जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही खर्ची घातला जात आहे. शिवाय संगोपनासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे; पण वृक्षतोडीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ही विदारक स्थिती बदलणे गरजेचे असताना प्रशासन उदासिन दिसून येत आहे. परिणामी, लाकुडतोडे तथा कंत्राटदारांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते. जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं.) तथा सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षतोड होत आहे. ही थांबविणे गरजेचे झाले आहे.सुरगाव ते महाकाळ रस्त्यावरील वृक्षांची अवैध कटाईपर्यावरणाचे संतुलनाकरिता वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी कार्र्यक्रम राबविले जात आहे; पण वृक्ष कटाईवर कुठलाही आळा घातला जात नाही. यामुळे ‘पालथ्या घागरेवर पाणी’ अशीच स्थिती होत आहे. यास प्रशासकीय उदासिनता जबाबदार असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या सेलू तालुक्यातील काही मार्गांवर सर्रास वृक्षतोड होत असल्याचे दिसते.रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. त्या झाडांच्या संवर्र्धनाची जबाबदारी ही बांधकाम विभागाची असते. त्याच वृक्षांवर कुºहाड चालविली जात असल्याचे दिसून येत आहे. शासकीय तसेच खासगी भूखंड हिरवेगार करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. तालुक्यात अनेक रस्त्यांच्या दुतर्फा विविध प्रजातीचे वृक्ष लावले आहेत. हे वृक्ष सध्या लाकूड चोरांसाठी पर्वणी ठरले आहे. सुरगाव ते महाकाळ या मार्गावरील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. याबाबत कंत्राटदारास विचारल्यास बांधकाम विभागाला माहिती आहे, असे सांगितले जाते.याबाबत नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना कळविले; पण कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सेलू ते येळाकेळी रस्त्याने जाणाºया महाकाळ रस्त्याशेजारी तब्बल २० ते २५ बाभळीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हा प्रकार सर्रास सुरू असताना बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.वनविभागाने नुकतीच केली होती कारवाईवन विभागाच्या हद्दीत येणाºया जंगल परिसरातही वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. परवाना नसताना लाकडाची वाहतूक करणारे वाहन वन विभागाने गस्तीदरम्यान जप्त केले होते. ही कारवाई ३० डिसेंबर रोजी रात्री हिंगणी वनक्षेत्रात करण्यात आली. हिंगणी वन परिक्षेत्रातील कर्मचारी पवनार ते सुरगाव मार्गावर गस्त करीत असताना वाहनात आडजात लाकूड नेत असल्याचे दिसून आले. सदर वाहनाची तपासणी केली असता विनापरवाना ते लाकडाची वाहतूक करीत असल्याचे आढळले. यावरून वाहन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात चालकाने शेतमालक तथा कंत्राटदाराचे नावही सांगितले; पण परवाना कुणीही घेतल्याचे दिसून आले नाही. असाच प्रकार जिल्ह्यात सुरू असून सर्रास वृक्षांची कत्तल केली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा तथा वनपरिक्षेत्रातील वृक्षांचीही कटाई केली जात आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभाग, वन विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.