शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

वृक्षांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:56 IST

जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागही उदासीन : चोरट्यांवर लक्ष ठेवण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची जबाबदारी बांधकाम विभाग सांभाळतो; पण काही ठिकाणी त्यांच्याच साक्षीने वृक्षांची कत्तल होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेत सबंध जगात वृक्षारोपणाची मोठी मोहीमच राबविली जात आहे. देशातही वृक्ष लागवडीवर भर दिला जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही खर्ची घातला जात आहे. शिवाय संगोपनासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे; पण वृक्षतोडीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ही विदारक स्थिती बदलणे गरजेचे असताना प्रशासन उदासिन दिसून येत आहे. परिणामी, लाकुडतोडे तथा कंत्राटदारांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते. जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं.) तथा सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षतोड होत आहे. ही थांबविणे गरजेचे झाले आहे.सुरगाव ते महाकाळ रस्त्यावरील वृक्षांची अवैध कटाईपर्यावरणाचे संतुलनाकरिता वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी कार्र्यक्रम राबविले जात आहे; पण वृक्ष कटाईवर कुठलाही आळा घातला जात नाही. यामुळे ‘पालथ्या घागरेवर पाणी’ अशीच स्थिती होत आहे. यास प्रशासकीय उदासिनता जबाबदार असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या सेलू तालुक्यातील काही मार्गांवर सर्रास वृक्षतोड होत असल्याचे दिसते.रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. त्या झाडांच्या संवर्र्धनाची जबाबदारी ही बांधकाम विभागाची असते. त्याच वृक्षांवर कुºहाड चालविली जात असल्याचे दिसून येत आहे. शासकीय तसेच खासगी भूखंड हिरवेगार करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. तालुक्यात अनेक रस्त्यांच्या दुतर्फा विविध प्रजातीचे वृक्ष लावले आहेत. हे वृक्ष सध्या लाकूड चोरांसाठी पर्वणी ठरले आहे. सुरगाव ते महाकाळ या मार्गावरील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. याबाबत कंत्राटदारास विचारल्यास बांधकाम विभागाला माहिती आहे, असे सांगितले जाते.याबाबत नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना कळविले; पण कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सेलू ते येळाकेळी रस्त्याने जाणाºया महाकाळ रस्त्याशेजारी तब्बल २० ते २५ बाभळीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हा प्रकार सर्रास सुरू असताना बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.वनविभागाने नुकतीच केली होती कारवाईवन विभागाच्या हद्दीत येणाºया जंगल परिसरातही वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. परवाना नसताना लाकडाची वाहतूक करणारे वाहन वन विभागाने गस्तीदरम्यान जप्त केले होते. ही कारवाई ३० डिसेंबर रोजी रात्री हिंगणी वनक्षेत्रात करण्यात आली. हिंगणी वन परिक्षेत्रातील कर्मचारी पवनार ते सुरगाव मार्गावर गस्त करीत असताना वाहनात आडजात लाकूड नेत असल्याचे दिसून आले. सदर वाहनाची तपासणी केली असता विनापरवाना ते लाकडाची वाहतूक करीत असल्याचे आढळले. यावरून वाहन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात चालकाने शेतमालक तथा कंत्राटदाराचे नावही सांगितले; पण परवाना कुणीही घेतल्याचे दिसून आले नाही. असाच प्रकार जिल्ह्यात सुरू असून सर्रास वृक्षांची कत्तल केली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा तथा वनपरिक्षेत्रातील वृक्षांचीही कटाई केली जात आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभाग, वन विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.