शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:56 IST

जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागही उदासीन : चोरट्यांवर लक्ष ठेवण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची जबाबदारी बांधकाम विभाग सांभाळतो; पण काही ठिकाणी त्यांच्याच साक्षीने वृक्षांची कत्तल होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेत सबंध जगात वृक्षारोपणाची मोठी मोहीमच राबविली जात आहे. देशातही वृक्ष लागवडीवर भर दिला जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही खर्ची घातला जात आहे. शिवाय संगोपनासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे; पण वृक्षतोडीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ही विदारक स्थिती बदलणे गरजेचे असताना प्रशासन उदासिन दिसून येत आहे. परिणामी, लाकुडतोडे तथा कंत्राटदारांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते. जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं.) तथा सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षतोड होत आहे. ही थांबविणे गरजेचे झाले आहे.सुरगाव ते महाकाळ रस्त्यावरील वृक्षांची अवैध कटाईपर्यावरणाचे संतुलनाकरिता वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी कार्र्यक्रम राबविले जात आहे; पण वृक्ष कटाईवर कुठलाही आळा घातला जात नाही. यामुळे ‘पालथ्या घागरेवर पाणी’ अशीच स्थिती होत आहे. यास प्रशासकीय उदासिनता जबाबदार असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या सेलू तालुक्यातील काही मार्गांवर सर्रास वृक्षतोड होत असल्याचे दिसते.रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. त्या झाडांच्या संवर्र्धनाची जबाबदारी ही बांधकाम विभागाची असते. त्याच वृक्षांवर कुºहाड चालविली जात असल्याचे दिसून येत आहे. शासकीय तसेच खासगी भूखंड हिरवेगार करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. तालुक्यात अनेक रस्त्यांच्या दुतर्फा विविध प्रजातीचे वृक्ष लावले आहेत. हे वृक्ष सध्या लाकूड चोरांसाठी पर्वणी ठरले आहे. सुरगाव ते महाकाळ या मार्गावरील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. याबाबत कंत्राटदारास विचारल्यास बांधकाम विभागाला माहिती आहे, असे सांगितले जाते.याबाबत नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना कळविले; पण कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सेलू ते येळाकेळी रस्त्याने जाणाºया महाकाळ रस्त्याशेजारी तब्बल २० ते २५ बाभळीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हा प्रकार सर्रास सुरू असताना बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.वनविभागाने नुकतीच केली होती कारवाईवन विभागाच्या हद्दीत येणाºया जंगल परिसरातही वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. परवाना नसताना लाकडाची वाहतूक करणारे वाहन वन विभागाने गस्तीदरम्यान जप्त केले होते. ही कारवाई ३० डिसेंबर रोजी रात्री हिंगणी वनक्षेत्रात करण्यात आली. हिंगणी वन परिक्षेत्रातील कर्मचारी पवनार ते सुरगाव मार्गावर गस्त करीत असताना वाहनात आडजात लाकूड नेत असल्याचे दिसून आले. सदर वाहनाची तपासणी केली असता विनापरवाना ते लाकडाची वाहतूक करीत असल्याचे आढळले. यावरून वाहन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात चालकाने शेतमालक तथा कंत्राटदाराचे नावही सांगितले; पण परवाना कुणीही घेतल्याचे दिसून आले नाही. असाच प्रकार जिल्ह्यात सुरू असून सर्रास वृक्षांची कत्तल केली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा तथा वनपरिक्षेत्रातील वृक्षांचीही कटाई केली जात आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभाग, वन विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.