शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

भटक्या विमुक्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 6, 2015 02:10 IST

देशात १५ कोटी तर राज्यात १.२६ कोटीच्या संख्येने विमूक्त व भटक्या जाती-जमाती आहेत. त्यांच्या अनेक समस्या कित्येक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत.

मूलभूत सेवांपासूनही समाज दूर : आयोगाच्या शिफारशींचा शासनाला विसररोहणा : देशात १५ कोटी तर राज्यात १.२६ कोटीच्या संख्येने विमूक्त व भटक्या जाती-जमाती आहेत. त्यांच्या अनेक समस्या कित्येक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. अनेक मूलभूत हक्कांपासून ते आजही वंचित आहेत. शासनाने या समस्यांकडे लक्ष देत त्यांच्या समस्या सोदवाव्या व मागण्या मान्य करून मूलभूत सेवा प्रदान करावा, अशी मागणी वारंवार भटक्या विमुक्त जाती-जमातीकडून होत आहे. मानववंशशास्त्राचे गाढे अभ्यासक डब्ल्यू. कृक यांनी १८८६ पासून तर अलीकडे बाळकृष्ण रेणके यांनी भटक्या विमुक्तांच्या विकासाकरिता सादर केलेल्या अहवालांची अंमलबजावणी अद्याप शासनाने केलेली नाही. त्यामुळे या समाजाची स्थिती बिकट झाली आहे. या जातीतील देवुळवाले व कडकलक्ष्मीवाले नागरिक भटके जीवन जगतात. त्यामुळे त्यांचे गाव कोणते, याबाबत सर्वत्र अनभिज्ञता पहावयास मिळते. त्याचबरोबर त्यांचे आरोग्य, शिक्षण व राहणीमान याबाबत शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. या समाजातील अनेक तरूण मुले आपली जात शोधत फिरत आहेत. १०० वर्षापूर्वीच्या भूमिअधिग्रहण कायद्याचा फटका या भटक्यां जमातींना बसल्यामुळे ते बेघर होऊन विस्तापितांसारखे आपले जीवन जगत आहेत. भटकंतीच्या कारणामुळे या समाजातील अनेकांना रेशनकार्ड, मतदानाचा मूलभूत हक्क व शिक्षण हक्क कायद्याने मिळणाऱ्या अधिकारांपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या जातसमाजावर होत असलेला अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय मिळावा, यासाठी आगामी हिवाळी अधिवेशन काळात १० डिसेंबरला विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या स्माजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत ११ टक्के स्वतंत्र आरक्षण हे राज्यघटनेच्या नवव्या सूचीत समाविष्ट करून त्यांना सुरक्षित करावे यासह अनेक मागण्यांसाठी सदर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात समाजातील बहुसंख्य नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भटक्या विमुक्त संघर्ष परिषदेचे संघटक बाबासाहेब गलाट यांनी समाजबांधवांना केले आहे.(वार्ताहर)