शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

पाणी पुरवठा योजनेतील दोष दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 28, 2016 01:41 IST

नळांना आठ-आठ दिवस पाणी न येणे, आले तरी अपुरे पाणी येणे यासोबतच एखाद्याच्या घरी असलेल्या वैयक्तिक नळाच्या पाईप-लाईनमध्ये

आठ दिवस नसते पाणी : ग्रामस्थांत असंतोषरोहणा : नळांना आठ-आठ दिवस पाणी न येणे, आले तरी अपुरे पाणी येणे यासोबतच एखाद्याच्या घरी असलेल्या वैयक्तिक नळाच्या पाईप-लाईनमध्ये कचरा वा माती अडकून निर्माण होणारा दोष दुरूस्त करण्याबाबत ग्रा.पं. प्रशासन अत्यंत उदासीन आहे. यामुळे नळधारकांना महिना-महिना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. येथील पाणी पुरवठा योजना अत्यंत जीर्ण झाली असून अनेक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे गावातील पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. पावसाळ्यातही सदर योजनेद्वारे ग्रामस्थांना दररोज पाणी मिळू शकत नाही. यातच पाईपलाईनमधून पाणी येताना कचरा वा माती येण्याचे कुठलेच कारण नाही. असे असताना गावातील अनेकांचे वैयक्तिक नळ बुजतात. परिणामी, त्यातून पाणी येत नाही. हे दोष दुरूस्ती करण्याची जबाबदारी ग्रा.पं. प्रशासनावर असते; पण अलीकडे दोष दुरूस्तीबाबत ग्रा.पं. दुर्लक्ष करीत असल्याने नळधारकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाणी पुरवठा योजनेतील दोष दूर करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लावला जातो. कर्मचारी, पदाधिकारी यांना माहिती देऊनही फारशी दखल घेतली जात नाही. एका नळधारकाच्या नळात दोन महिन्यांपूर्वी दोष निर्माण झाला होता. तो दोष दुरूस्त करून एक महिना होत नाही तर पुन्हा दोष निर्माण होऊन पाणी येणे बंद झाले. सदर दोषाबाबत ग्रा.पं. माहिती देऊन एक महिन्याचा काळ लोटत असताना दुरूस्ती झाली नाही. दिवाळीचा सण असताना नळ दुरूस्ती न केल्याने असंतोष पसरला आहे. ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)