शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेतील दोष दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 28, 2016 01:41 IST

नळांना आठ-आठ दिवस पाणी न येणे, आले तरी अपुरे पाणी येणे यासोबतच एखाद्याच्या घरी असलेल्या वैयक्तिक नळाच्या पाईप-लाईनमध्ये

आठ दिवस नसते पाणी : ग्रामस्थांत असंतोषरोहणा : नळांना आठ-आठ दिवस पाणी न येणे, आले तरी अपुरे पाणी येणे यासोबतच एखाद्याच्या घरी असलेल्या वैयक्तिक नळाच्या पाईप-लाईनमध्ये कचरा वा माती अडकून निर्माण होणारा दोष दुरूस्त करण्याबाबत ग्रा.पं. प्रशासन अत्यंत उदासीन आहे. यामुळे नळधारकांना महिना-महिना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. येथील पाणी पुरवठा योजना अत्यंत जीर्ण झाली असून अनेक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे गावातील पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. पावसाळ्यातही सदर योजनेद्वारे ग्रामस्थांना दररोज पाणी मिळू शकत नाही. यातच पाईपलाईनमधून पाणी येताना कचरा वा माती येण्याचे कुठलेच कारण नाही. असे असताना गावातील अनेकांचे वैयक्तिक नळ बुजतात. परिणामी, त्यातून पाणी येत नाही. हे दोष दुरूस्ती करण्याची जबाबदारी ग्रा.पं. प्रशासनावर असते; पण अलीकडे दोष दुरूस्तीबाबत ग्रा.पं. दुर्लक्ष करीत असल्याने नळधारकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाणी पुरवठा योजनेतील दोष दूर करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लावला जातो. कर्मचारी, पदाधिकारी यांना माहिती देऊनही फारशी दखल घेतली जात नाही. एका नळधारकाच्या नळात दोन महिन्यांपूर्वी दोष निर्माण झाला होता. तो दोष दुरूस्त करून एक महिना होत नाही तर पुन्हा दोष निर्माण होऊन पाणी येणे बंद झाले. सदर दोषाबाबत ग्रा.पं. माहिती देऊन एक महिन्याचा काळ लोटत असताना दुरूस्ती झाली नाही. दिवाळीचा सण असताना नळ दुरूस्ती न केल्याने असंतोष पसरला आहे. ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)