शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 22, 2015 03:20 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरक होणे गरजेचे आहे; पण याचा प्रशासनाला विसर

हर्षल तोटे ल्ल पवनारसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरक होणे गरजेचे आहे; पण याचा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते. गणेशोत्सवाचे पाच दिवस लोटले असताना प्रशासनाकडून कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. यावर्षी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला बगल दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून दाखल जनहित याचिकेवर निर्णय देताना मूर्ती, निर्माल्य, काडी-कचरा नदीपात्रात जाऊ न देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली. मागील वर्षी पवनार ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व सेवाग्राम पोलीस ठाण्याने पुढाकार घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचा प्रयत्न केला; पण विसर्जनास येणाऱ्या मूर्तींची संख्या अधिक असल्याने पर्यावरणपूरक विसर्जन करण्यास यंत्रणा अपूरी पडली. स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्य नदी पात्रात टाकण्यास मज्जाव केल्याने सुमारे १७ ट्रॅक्टर ट्राली निर्माल्य पात्राबाहेर जमा करण्यात आले. यानंतर निर्मात्याची विल्हेवाट लावण्यासाठी बराच खर्च करावा लागला.दरवर्षी विसर्जनाच्या तात्पुरत्या व्यवस्थेला लागणारा खर्च ग्रा.पं. प्रशासनाच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी म्हणून विसर्जन कुंडाच्या निर्मितीचा प्रस्ताव ग्रा.पं. ने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शेऱ्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा सात-बारा उताराही दिला होतो. सदर कुंडाच्या निर्मितीकरिता अंदाजे ७० लाख रुपये लागणार आहे. या निधीची तरतूद कशी करायची, या विवंचनेत कुंडाचा प्रस्ताव रखडल्याने यंदाही पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन होणार नसल्याचेच दिसते.धाम नदी तिरावर दरवर्षी साधारणत: लहान-मोठ्या आठ हजार मूर्तींचे विसर्जन होते. दरवर्षी सर्व मूर्ती नदी पात्रात विसर्जित केल्या जातात. बऱ्याच मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरीसच्या असल्याने त्या विरघळत नाही. काही दिवसांनी त्यांचे अवशेष शिल्लक राहतात. सोबतच नदीपात्र दूषित होऊन परिसरात कचरा साचून दुर्गंधी पसरते. आश्रम परिसर व धाम नदीच्या सौदर्यांची पर्यटकांना नेहमी भुरळ पडते. यामुळे दररोज येथे अनेक पर्यटक येतात; पण गणपती व नवरात्र उत्सवानंतर परिसरात फिरणे अवघड होते. याबाबत पवनार ग्रा.पं. ने प्रशासनाला अनेकदा गळ घातली; पण त्याचा उपयोग झाला नाही. खर्चाची बाब आवाक्याबाहेर असल्यानेही यंदा पर्यावरणपूरक विसर्जनासाठी ग्रा.पं. ने हात वर केले तर जि.प. ला पर्यायी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.यावर्षी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन होईल, अशी चिन्हे दिसत नाही. यावर पर्यावरण व निसर्गप्रेमी काय भूमिका घेतात, हे पाहणे औचित्याचे राहणार आहे.पोलीस प्रशासनाने चालविली विसर्जनाची तयारी४कुठलीही जीवित हानी न होता विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी पोलीस प्रशासनाने आपली तयारी केली आहे. दोन्ही तिरांवरील विसर्जनावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे. गणेशाच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ट्रॉलीवरून गणपती नदी पात्रात विसर्जित होईल. पवनार येथील पट्टीचे पोहणारे स्वयंसेवक म्हणून नियुक्त केले असून त्यांना विविध रंगाचे लाईफ गार्डस दिले जाणार आहेत. सेवाग्राम परिसरातील सर्व पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाच्या चमूही तैनात करण्यात येणार आहे. ४अनुचित प्रकार टाळण्यासाठी १०० स्वयंसेवकासह १०० हवालदार व सहा अधिकारी सज्ज राहणार आहेत. विसर्जनादरम्यान लहान पुलावरून येण्याचा मार्ग व मोठ्या पुलावरून परतीचा मार्ग, अशी एकेरी वाहतूक राहणार आहे. विसर्जनासाठी आश्रम परिसरात मूर्तीचा रथ सोडून इतर वाहनांना मज्जाव करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या वेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. भाविकांनी विसर्जनाच्या वेळी खोल पाण्यात जाऊ नये. विसर्जनाकरिता मूर्ती स्वयंसेवकाच्या हाती द्यावी. निर्माल्य नदी पात्रात टाकू नये, असे आवाहनही सेवाग्राम पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस निरीक्षकांनी केले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सेवाग्राम पोलीस दक्ष आहे. वॉच टॉवर, स्लायडींग ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतुकीची योजना आखण्यात आली आहे. निर्माल्य नदीत पात्रात जाऊ न देण्यासाठी निर्माल्य कुंडही तयार करण्यात येणार आहे. परिसरातील संपूर्ण पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलाचीही मदत या कार्यासाठी घेण्यात येणार आहे. - पराग पोटे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, सेवाग्राम.गतवर्षी जि.प. प्रशासनाने सर्व जबाबदारी पवनार ग्रामपंचायतीवर टाकली होती. विसर्जनाच्या कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी कुंड्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता; पण यावर्षी तो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. ग्रामपंचायतीची सामान्य फंडातील आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे जिल्हा परिषदेने निधीची व्यवस्था केल्यास पर्यावरणपूरक मूर्ती विर्सजनाची व्यवस्था करता येईल.- अजय गांडोळेसरपंच, ग्रा.पं. पवनार.