शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

४२ वर्षांपासून सीमा सुरक्षा जवानांची उपेक्षा

By admin | Updated: November 30, 2014 23:10 IST

१ डिसेंबर १९६५ रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. भूदलाला पर्याय म्हणून सीमा सुरक्षा दल कार्यरत आहे. मात्र सीमा सुरक्षा दलातील सैनिकांना भूदल सैनिकांप्रमाणे दर्जा दिला जात नाही.

श्रेया केने - वर्धा१ डिसेंबर १९६५ रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. भूदलाला पर्याय म्हणून सीमा सुरक्षा दल कार्यरत आहे. मात्र सीमा सुरक्षा दलातील सैनिकांना भूदल सैनिकांप्रमाणे दर्जा दिला जात नाही. देशाच्या रक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील सैनिक या दुजाभावाचा गत ४२ वर्षापासून सामना करीत आहेत. सैनिक कल्याण सचिवालयाने हा मुद्दा उचलला. मात्र राज्य शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका या सैनिकांना बसत आहे. त्यामुळे इतक्या वर्षांपासून उपेक्षाच त्यांच्या पदरी पडत आहे.बांग्लादेश मुक्ती युद्धात सीमा सुरक्षा दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बीएसएफ जवानांना माजी निवृत्त सैनिकांचा दर्जा मिळविण्याची शिफारस केली होती. १९७२ पासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. यामुळे माजी सैनिकांप्रमाणे बी.एस.एफ. जवानांना सेवाभरतीत आरक्षण मिळत नाही. त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती नोकरीत संधी, आरोग्यविषयक सुविधा मिळत नाही. शासकीय योजनांचा लाभही मिळत नसल्याची त्यांची खंत आहे. केंद्राने बी.एस.एफ. जवानांना माजी सैनिकांचा दर्जा मिळावा म्हणून राज्याला प्रपत्र दिले होते. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात माजी सीमा प्रहरी संघाने याचिका दाखल केली. सैनिक कल्याण सचिवाला बोलावणी करून निर्देश दिले. तसेच जानेवारी २०१५ पर्यंत मुदत दिली. माजी सैनिकांचा दर्जा मिळत नाही म्हणून कारणे सादर करण्याचे न्यायालयाने बजावले आहे. एवढे सर्व होत असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने सीमा सुरक्षा बलाच्या माजी सौनिकांना भूदल सैनिकांप्रमाणे सोयी सुविधा मिळावी याची प्रतीक्षा आहे. शासनाशी सुरू असलेला या सैनिकांचा लढा न्यायालयात गेला, तरीही त्याचा कुठलाही निकाल लागला नाही. वेळपसंगी देशाकरिता प्राण गमविणाऱ्या या सैनिकांच्या माथी आयुष्याच्या शेवट येणारी ही व्यथा त्यांचे मनोबल तोडणारी आहे.