शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

४२ वर्षांपासून सीमा सुरक्षा जवानांची उपेक्षा

By admin | Updated: November 30, 2014 23:10 IST

१ डिसेंबर १९६५ रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. भूदलाला पर्याय म्हणून सीमा सुरक्षा दल कार्यरत आहे. मात्र सीमा सुरक्षा दलातील सैनिकांना भूदल सैनिकांप्रमाणे दर्जा दिला जात नाही.

श्रेया केने - वर्धा१ डिसेंबर १९६५ रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. भूदलाला पर्याय म्हणून सीमा सुरक्षा दल कार्यरत आहे. मात्र सीमा सुरक्षा दलातील सैनिकांना भूदल सैनिकांप्रमाणे दर्जा दिला जात नाही. देशाच्या रक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील सैनिक या दुजाभावाचा गत ४२ वर्षापासून सामना करीत आहेत. सैनिक कल्याण सचिवालयाने हा मुद्दा उचलला. मात्र राज्य शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका या सैनिकांना बसत आहे. त्यामुळे इतक्या वर्षांपासून उपेक्षाच त्यांच्या पदरी पडत आहे.बांग्लादेश मुक्ती युद्धात सीमा सुरक्षा दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बीएसएफ जवानांना माजी निवृत्त सैनिकांचा दर्जा मिळविण्याची शिफारस केली होती. १९७२ पासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. यामुळे माजी सैनिकांप्रमाणे बी.एस.एफ. जवानांना सेवाभरतीत आरक्षण मिळत नाही. त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती नोकरीत संधी, आरोग्यविषयक सुविधा मिळत नाही. शासकीय योजनांचा लाभही मिळत नसल्याची त्यांची खंत आहे. केंद्राने बी.एस.एफ. जवानांना माजी सैनिकांचा दर्जा मिळावा म्हणून राज्याला प्रपत्र दिले होते. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात माजी सीमा प्रहरी संघाने याचिका दाखल केली. सैनिक कल्याण सचिवाला बोलावणी करून निर्देश दिले. तसेच जानेवारी २०१५ पर्यंत मुदत दिली. माजी सैनिकांचा दर्जा मिळत नाही म्हणून कारणे सादर करण्याचे न्यायालयाने बजावले आहे. एवढे सर्व होत असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने सीमा सुरक्षा बलाच्या माजी सौनिकांना भूदल सैनिकांप्रमाणे सोयी सुविधा मिळावी याची प्रतीक्षा आहे. शासनाशी सुरू असलेला या सैनिकांचा लढा न्यायालयात गेला, तरीही त्याचा कुठलाही निकाल लागला नाही. वेळपसंगी देशाकरिता प्राण गमविणाऱ्या या सैनिकांच्या माथी आयुष्याच्या शेवट येणारी ही व्यथा त्यांचे मनोबल तोडणारी आहे.