शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आचारसंहिता अंमलबजावणीकडे प्रशासनाचीच डोळेझाक

By admin | Updated: February 1, 2017 01:23 IST

कुठल्याही निवडणुका असल्या की निवडणूक विभागाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले

फलक कायमच : अप्रत्यक्षरित्या होतोय प्रचार वर्धा : कुठल्याही निवडणुका असल्या की निवडणूक विभागाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. यात कडक नियम लादले असून कारवाईची तरतूदही करून देण्यात आली आहे; पण प्रशासनच या आचार संहितेच्या अंमलबजावणीकडे डोळेझाक करीत असेल तर दोष कुणाला द्यावा, हा प्रश्नच आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष वा संभाव्य उमेदवारांच्या कामांचे फलक झाकणे गरजेचे असते; पण जि.प., पं.स. निवडणूक तोंडावर असतानाही अनेक ठिकाणी राजकारण्यांचे फलक अप्रत्यक्षरित्या त्यांचा प्रचार करीत असल्याचेच दिसते. १६ फेबु्रवारी रोजी जि.प. व पं.स. साठी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. हा कार्यक्रम लागू होताच निवडणूक विभाग, संबंधित स्वराज्य संस्थांना सर्वप्रथम कुणाचाही प्रचार होईल, असे फलक झाकावे लागतात. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ही कामे चोखपणे होत होती; पण अता प्रशासनच उदासिन तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात नामांकन अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत फलक प्रचार करीत असल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी सेलू तालुक्यातील फलकांबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त उमटताच सदर फलक निवडणूक विभागाकडून झाकले गेले; पण जिल्ह्यात आणखी कुठे राजकारण्यांचे फलक आहेत काय, हे तपासले गेले नाही. मंगळवारीही वायगाव (नि.) येथे विकास कामांबाबतचे फलक कायम होते. विशेष म्हणजे या फलकावर जानेवारी २०१७ असे नमूद केले असून दिनांक दिलेला नाही. या फलकावर विद्यमान खासदार, माजी खासदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार यांची नावे आहेत. वास्तविक, राजकीय पक्षांची विविध कामे, शासनाची कामे, नेत्यांचे फलक झाकणे गरजेचे आहे. आचार संहिता लागू होताच निवडणूक विभागाला ही कामे करावी लागतात. यंदा सार्वत्रिक निवडणूक विभागाची जबाबदारी लोनकर यांच्याकडे आहे. त्यांच्या यंत्रणेकडून ही कामे झाली नसल्याचे दिसून येते. यामुळे निवडणूक विभागच आचार संहितेच्या कठोर अंमलबजावणीबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)