शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

आचारसंहिता अंमलबजावणीकडे प्रशासनाचीच डोळेझाक

By admin | Updated: February 1, 2017 01:23 IST

कुठल्याही निवडणुका असल्या की निवडणूक विभागाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले

फलक कायमच : अप्रत्यक्षरित्या होतोय प्रचार वर्धा : कुठल्याही निवडणुका असल्या की निवडणूक विभागाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. यात कडक नियम लादले असून कारवाईची तरतूदही करून देण्यात आली आहे; पण प्रशासनच या आचार संहितेच्या अंमलबजावणीकडे डोळेझाक करीत असेल तर दोष कुणाला द्यावा, हा प्रश्नच आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष वा संभाव्य उमेदवारांच्या कामांचे फलक झाकणे गरजेचे असते; पण जि.प., पं.स. निवडणूक तोंडावर असतानाही अनेक ठिकाणी राजकारण्यांचे फलक अप्रत्यक्षरित्या त्यांचा प्रचार करीत असल्याचेच दिसते. १६ फेबु्रवारी रोजी जि.प. व पं.स. साठी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. हा कार्यक्रम लागू होताच निवडणूक विभाग, संबंधित स्वराज्य संस्थांना सर्वप्रथम कुणाचाही प्रचार होईल, असे फलक झाकावे लागतात. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ही कामे चोखपणे होत होती; पण अता प्रशासनच उदासिन तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात नामांकन अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत फलक प्रचार करीत असल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी सेलू तालुक्यातील फलकांबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त उमटताच सदर फलक निवडणूक विभागाकडून झाकले गेले; पण जिल्ह्यात आणखी कुठे राजकारण्यांचे फलक आहेत काय, हे तपासले गेले नाही. मंगळवारीही वायगाव (नि.) येथे विकास कामांबाबतचे फलक कायम होते. विशेष म्हणजे या फलकावर जानेवारी २०१७ असे नमूद केले असून दिनांक दिलेला नाही. या फलकावर विद्यमान खासदार, माजी खासदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार यांची नावे आहेत. वास्तविक, राजकीय पक्षांची विविध कामे, शासनाची कामे, नेत्यांचे फलक झाकणे गरजेचे आहे. आचार संहिता लागू होताच निवडणूक विभागाला ही कामे करावी लागतात. यंदा सार्वत्रिक निवडणूक विभागाची जबाबदारी लोनकर यांच्याकडे आहे. त्यांच्या यंत्रणेकडून ही कामे झाली नसल्याचे दिसून येते. यामुळे निवडणूक विभागच आचार संहितेच्या कठोर अंमलबजावणीबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)