शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शांतीभूमीत रंगलीय साहित्यिकांची वैचारिक दंगल; विद्रोहींचाही वाजता बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2023 19:45 IST

Wardha News शुक्रवारी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचेही थाटात उद्घाटन झाले.

ठळक मुद्दे प्रतीकात्मक मानवी मेंदूच्या बेड्या तोडून अनोखे उद्घाटन

कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) : या शांती-अहिंसेच्या भूमीमध्ये एकाचवेळी ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि १७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत असल्याने साहित्यिकांमध्ये उत्सुकता होती. शुक्रवारी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचेही थाटात उद्घाटन झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने या साहित्यनगरीत वैचारिक दंगल सुरू झाली.

१७ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघालेल्या विद्रोही साहित्य संस्कृती विचारयात्रेने झाली. ही विचारयात्रा कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरीत दाखल झाल्यानंतर संमेलनस्थळावरील विविध प्रवेशद्वार, प्रदर्शनांचे व ग्रंथनगरीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे, स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे, राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, उद्घाटक रसिका आगासे-अय्युम, संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, मावळते अध्यक्ष गणेश विसपुते, डॉ. अंजूम कादरी, शैलेश नवडे, निरंजन टकले, दिलीप घावडे, सुभाष खंडारे, ज्ञानेश वाकूडकर आदी विचारपीठावर विराजमान झाले होते. प्रारंभी नंदुरबार येथील कलावृंदांनी महात्मा फुले रचित ‘सत्याचे अखंड’चे गायन, धुळे येथील अमृत भिल्ल व त्यांच्या संचाने पावरी वादन केले. यानंतर यशवंत महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदन मानसाला’ हे गीत सादर केले. सुधीर गिऱ्हेलिखित ‘विद्रोही...विद्रोही...विद्रोही’ या संमेलन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचा सूतमाळ, शाला व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यानंतर या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण उद्घाटन करण्यात आले. मानवी मेंदू काहींच्या अतिक्रमणामुळे कुलूपबंद झाला आहे. त्यामुळे या प्रतीकात्मक मेंदूच्या साखळदंडाचे कुलूप उघडून त्याला मोकळे करण्यात आले. या अनोख्या उद्घाटनाची सभामंडपात चांगलीच चर्चा राहिली. या संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. अशोक चोपडे यांनी करून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी हे संमेलन घेतले जात असून यातून कोणाचा द्वेश नाही, कुणाशी स्पर्धा नाही तर हे विचारांचे संमेलन असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वयाच्या ७८ व्या वर्षानिमित्ताने संमेलनाकरिता ७८ हजारांची मदत करणारे प्राचार्य जनार्दन देवताळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन वनश्री वनकर यांनी केले. आभार गुणवंत डकरे यांनी मानले.

 

संविधान कायम ठेवण्यासाठी लढा : प्रा. नितेश कराळे

या भूमीने देवीदास सोटेंसारखे वऱ्हाडी कवी दिले. महात्मा फुलेंच्या चरित्रावर पहिले पुस्तक वर्ध्यात प्रकाशित झाले. गांधी-आंबेडकरांची भेट येथे झाली. बहुजनांकरिता सर्वांत आधी खुले होणारे लक्ष्मीनारायण मंदिर येथे आहे, तर ब्राह्मणेतर पाक्षिक चालविणारे व्यंकटराव गोडे वर्ध्यातील आहेत. त्यामुळे ही ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीत विद्रोही साहित्य संमेलन होत असल्याने आपण विद्रोही भूमिका घेतलीच पाहिजे. सामान्यांना दडपण्याचे, आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे आपण आपल्या संविधानाला कायम ठेवण्याकरिता विद्रोह केला पाहिजे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे यांनी केले.

पांढरं सोनं पिकविणारी भूमी; पण येथेच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या : प्रा. प्रतिमा परदेशी

विदर्भ ही पांढरं सोनं पिकविणारी भूमी आहे; परंतु सर्वाधिक शेतकरी आत्महत्या येथेच झाल्या, हे मनाला भिडणारं वास्तव आहे. त्यामुळे आपल्याला छळणारी व्यवस्था बदलण्यासाठी विद्रोही भूमिका गरजेची आहे. १९ व्या शतकात सत्यशोधक समाजाचे बीजारोपण झाले असून त्याचा वटवृक्ष बहरत आहे. ज्यांचे स्वातंत्र्यचळवळीत तीळमात्र योगदान नाही, ते आता स्वातंत्र्याच्या बाता हाकत आहेत. संमेलनामध्ये साहित्यिकांना पैसे मोजावे लागत असतील तर ते संमेलन म्हणावे की शेअरबाजार, असा प्रश्नही राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केला.

 

सरकार आता घरातही डोकावयाला लागले : रसिका आगासे-अय्युम

सरकार आता आमच्या घरातही डोकावयाला लागले असून राहणीमान, खानपान आणि कपड्यावरही आक्षेप घ्यायला लागले आहे. आम्हाला १८ व्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला तेव्हाच आम्ही या देशाचे सुज्ञ नागरिक झालोत, याचा विसर कदाचित त्यांना पडला असावा. या सरकारकडून लव्ह जिहादचा आडोसा घेत आंतरधर्मीय विवाह थांबविण्याचा प्रयत्न होत आहे. द्वेश करणं सोपं आहे, प्रेम करणं आणि ते टिकवणं फार कठीण असतं, असे मत उद्घाटक रसिका आगासे-अय्युम यांनी व्यक्त केले.

ही तर ‘द ग्रेट इंडियन साहित्यिक सर्कस’ : गणेश विसपुते

मानवी सभ्यतेवर अरिष्ट आले असून त्यात सर्वांचीच होरपळ होत आहे. एखादा साहित्यिक शासनविरोधी भूमिका मांडणार म्हणून त्याचे संमेलनाचे अध्यक्षपदच रद्द केले जाते. त्यामुळे अ.भा. संमेलनावर बोटं उचलली जातात. पूर्वी मराठी साहित्य संमेलन, नंतर महाराष्ट्र साहित्य संमेलन आणि त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, असा हा प्रवास राहिला आहे. केवळ रेल्वेच्या तिकिटासाठी हा बदल झाल्याने सध्या हे संमेलन म्हणजे ‘द ग्रेट इंडियन साहित्यिक सर्कस झालं आहे’ असे मत मावळते अध्यक्ष गणेश विसपुते यांनी मांडले.

------------------------------------------------------

टॅग्स :literatureसाहित्य