शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

महात्मा गांधींबाबत भ्रम पसरविणाऱ्यांना ओळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:19 IST

महात्मा गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, त्यांनी भगतसिंगला फासावर जाऊ दिले, सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होते, गांधी हे आंबेडकर व त्यांच्या समाजाला न्याय देऊ इच्छित नव्हते, असे गांधींबाबत अनेक भ्रम जाणीवपूर्वक पसरविणारी नथुरामी जमात सातत्याने कार्यरत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयातील व्याख्यानात सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, त्यांनी भगतसिंगला फासावर जाऊ दिले, सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होते, गांधी हे आंबेडकर व त्यांच्या समाजाला न्याय देऊ इच्छित नव्हते, असे गांधींबाबत अनेक भ्रम जाणीवपूर्वक पसरविणारी नथुरामी जमात सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना ओळखून, रोखण्यासाठी आता सर्वांनीच हस्तक्षेप कारायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ इतिहासकार व हिंद स्वराज्य शताब्दी, महाराष्ट्रचे संयोजक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, लातूर यांनी व्यक्त केली.येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात समाजविज्ञान अभ्यास मंडळाच्या वतीने महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष व कस्तुरबा गांधी स्मृतिदिनानिमित्त ‘महात्मा गांधी : समज गैरसमज’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्राचार्य रंभा सोनाये, डॉ.प्रियराज महेशकर, वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे, डॉ. सुधाकर सोनोने, प्रा. दत्तानंद इंगोले उपस्थित होते. डॉ. रोडे म्हणाले, पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचे भांडवल करणारे लोक ते पैसे देण्याच्या करारावर पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वाक्षरी का केली होती आणि पाकिस्तानचा मुद्दा नसण्यापूर्वीच गांधींची हत्या करण्याचे पाच प्रयत्न का झाले होते, या प्रश्नावर मात्र गप्प राहतात. सुभाषचंद्र बोस असोत नाही तर आंबेडकर, त्यांच्यासोबत गांधींचे वैचारिक मतभेद होते, पण मनभेद नव्हते. म्हणूनच बोसांनी गांधींना ‘राष्ट्रपिता’ हे अजरामर संबोधन दिले. तर गांधींनी आग्रहपूर्वक आंबेडकरांचा समावेश स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात करून घेतला. एक कृती, ही हजार शब्दांहून अधिक बोलकी असल्याचे गांधींजी मानत असत. त्यामुळे त्यांच्या उक्ती आणि कृतीत समसमानता होती. म्हणूनच त्यांचा हा आदर्श घेत आता आपण सर्वांनीच बोलके सुधारक न होता कृतिशील कार्यकर्ते व्हायला हवे, असेही ते म्हणाले. गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाºया प्रवृत्तीचा निषेध करीत डॉ.सोनाये यांनी समारोप केला. प्रास्ताविक डॉ. महेशकर तर संचालन व आभार प्रदर्शन डॉ. सोनोने यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता डॉ.अनिता देशमुख, डॉ.मालिनी वडतकर, डॉ. सोनाली शिरभाते, प्रा. अमोल घुमडे, प्रा. दीपक महाजन, विजय चौधरी, विनोद बावणे, दिनेश भगत, नरेश आगलावे, राजू मुंजेवार यांनी सहकार्य केले. पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली वाहून व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी