शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

महात्मा गांधींबाबत भ्रम पसरविणाऱ्यांना ओळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:19 IST

महात्मा गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, त्यांनी भगतसिंगला फासावर जाऊ दिले, सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होते, गांधी हे आंबेडकर व त्यांच्या समाजाला न्याय देऊ इच्छित नव्हते, असे गांधींबाबत अनेक भ्रम जाणीवपूर्वक पसरविणारी नथुरामी जमात सातत्याने कार्यरत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयातील व्याख्यानात सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, त्यांनी भगतसिंगला फासावर जाऊ दिले, सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होते, गांधी हे आंबेडकर व त्यांच्या समाजाला न्याय देऊ इच्छित नव्हते, असे गांधींबाबत अनेक भ्रम जाणीवपूर्वक पसरविणारी नथुरामी जमात सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना ओळखून, रोखण्यासाठी आता सर्वांनीच हस्तक्षेप कारायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ इतिहासकार व हिंद स्वराज्य शताब्दी, महाराष्ट्रचे संयोजक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, लातूर यांनी व्यक्त केली.येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात समाजविज्ञान अभ्यास मंडळाच्या वतीने महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष व कस्तुरबा गांधी स्मृतिदिनानिमित्त ‘महात्मा गांधी : समज गैरसमज’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्राचार्य रंभा सोनाये, डॉ.प्रियराज महेशकर, वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे, डॉ. सुधाकर सोनोने, प्रा. दत्तानंद इंगोले उपस्थित होते. डॉ. रोडे म्हणाले, पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचे भांडवल करणारे लोक ते पैसे देण्याच्या करारावर पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वाक्षरी का केली होती आणि पाकिस्तानचा मुद्दा नसण्यापूर्वीच गांधींची हत्या करण्याचे पाच प्रयत्न का झाले होते, या प्रश्नावर मात्र गप्प राहतात. सुभाषचंद्र बोस असोत नाही तर आंबेडकर, त्यांच्यासोबत गांधींचे वैचारिक मतभेद होते, पण मनभेद नव्हते. म्हणूनच बोसांनी गांधींना ‘राष्ट्रपिता’ हे अजरामर संबोधन दिले. तर गांधींनी आग्रहपूर्वक आंबेडकरांचा समावेश स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात करून घेतला. एक कृती, ही हजार शब्दांहून अधिक बोलकी असल्याचे गांधींजी मानत असत. त्यामुळे त्यांच्या उक्ती आणि कृतीत समसमानता होती. म्हणूनच त्यांचा हा आदर्श घेत आता आपण सर्वांनीच बोलके सुधारक न होता कृतिशील कार्यकर्ते व्हायला हवे, असेही ते म्हणाले. गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाºया प्रवृत्तीचा निषेध करीत डॉ.सोनाये यांनी समारोप केला. प्रास्ताविक डॉ. महेशकर तर संचालन व आभार प्रदर्शन डॉ. सोनोने यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता डॉ.अनिता देशमुख, डॉ.मालिनी वडतकर, डॉ. सोनाली शिरभाते, प्रा. अमोल घुमडे, प्रा. दीपक महाजन, विजय चौधरी, विनोद बावणे, दिनेश भगत, नरेश आगलावे, राजू मुंजेवार यांनी सहकार्य केले. पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली वाहून व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी