शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींबाबत भ्रम पसरविणाऱ्यांना ओळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:19 IST

महात्मा गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, त्यांनी भगतसिंगला फासावर जाऊ दिले, सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होते, गांधी हे आंबेडकर व त्यांच्या समाजाला न्याय देऊ इच्छित नव्हते, असे गांधींबाबत अनेक भ्रम जाणीवपूर्वक पसरविणारी नथुरामी जमात सातत्याने कार्यरत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयातील व्याख्यानात सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, त्यांनी भगतसिंगला फासावर जाऊ दिले, सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होते, गांधी हे आंबेडकर व त्यांच्या समाजाला न्याय देऊ इच्छित नव्हते, असे गांधींबाबत अनेक भ्रम जाणीवपूर्वक पसरविणारी नथुरामी जमात सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना ओळखून, रोखण्यासाठी आता सर्वांनीच हस्तक्षेप कारायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ इतिहासकार व हिंद स्वराज्य शताब्दी, महाराष्ट्रचे संयोजक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, लातूर यांनी व्यक्त केली.येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात समाजविज्ञान अभ्यास मंडळाच्या वतीने महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष व कस्तुरबा गांधी स्मृतिदिनानिमित्त ‘महात्मा गांधी : समज गैरसमज’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्राचार्य रंभा सोनाये, डॉ.प्रियराज महेशकर, वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे, डॉ. सुधाकर सोनोने, प्रा. दत्तानंद इंगोले उपस्थित होते. डॉ. रोडे म्हणाले, पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचे भांडवल करणारे लोक ते पैसे देण्याच्या करारावर पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वाक्षरी का केली होती आणि पाकिस्तानचा मुद्दा नसण्यापूर्वीच गांधींची हत्या करण्याचे पाच प्रयत्न का झाले होते, या प्रश्नावर मात्र गप्प राहतात. सुभाषचंद्र बोस असोत नाही तर आंबेडकर, त्यांच्यासोबत गांधींचे वैचारिक मतभेद होते, पण मनभेद नव्हते. म्हणूनच बोसांनी गांधींना ‘राष्ट्रपिता’ हे अजरामर संबोधन दिले. तर गांधींनी आग्रहपूर्वक आंबेडकरांचा समावेश स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात करून घेतला. एक कृती, ही हजार शब्दांहून अधिक बोलकी असल्याचे गांधींजी मानत असत. त्यामुळे त्यांच्या उक्ती आणि कृतीत समसमानता होती. म्हणूनच त्यांचा हा आदर्श घेत आता आपण सर्वांनीच बोलके सुधारक न होता कृतिशील कार्यकर्ते व्हायला हवे, असेही ते म्हणाले. गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाºया प्रवृत्तीचा निषेध करीत डॉ.सोनाये यांनी समारोप केला. प्रास्ताविक डॉ. महेशकर तर संचालन व आभार प्रदर्शन डॉ. सोनोने यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता डॉ.अनिता देशमुख, डॉ.मालिनी वडतकर, डॉ. सोनाली शिरभाते, प्रा. अमोल घुमडे, प्रा. दीपक महाजन, विजय चौधरी, विनोद बावणे, दिनेश भगत, नरेश आगलावे, राजू मुंजेवार यांनी सहकार्य केले. पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली वाहून व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी