शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वर्धा जिल्ह्यात स्वतंत्र प्रकल्प कार्यालयाचा विचार व्हावा

By admin | Updated: April 14, 2017 02:22 IST

आदिवासींसाठी प्रकल्प कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव होता; पण सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय दिले.

अ.भा. आदिवासी विकास परिषदेची मागणी : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांना निवेदनवर्धा : आदिवासींसाठी प्रकल्प कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव होता; पण सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय दिले. अद्याप नियमित सहायक प्रकल्प अधिकारी दिला नाही. सदर अधिकारी मुख्यालयी राहत नाही. त्यांच्याशी संवाद साधला असता ते उद्धट वागणूक देतात. यामुळे कायम सहायक प्रकल्प अधिकारी द्यावा तथा जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रकल्प कार्यालय देण्याचा विचार व्हावा, अशी मागणी अ.भा. आदिवासी विकास परिषदेने केली. याबाबत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांना निवेदन देण्यात आले.नागपूर येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्याचे विहित अर्ज वर्धा कार्यालयातून पुरविले जात आहे; पण योजना मंजूर करण्याचे काम नागपूर कार्यालयात होत आहे. यामुळे योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. अशा अनेक तक्रारी आदिवासी परिषदेकडे आहेत. यामुळे वर्धा येथेच सर्व योजनांच्या अर्जाची छाणनी करून वर्धा कार्यालयातच मंजुरी द्यावी. २०१५-१६ मध्ये ठक्करबाप्पा योजनेंतर्गत आलेल्या प्रस्तावाची योग्य तपासणी संबंधित अधिकाऱ्यांकडून झाली नसल्याची बाब प्रकल्प अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली. यावर योग्य चौकशी करण्याची मागणी परिषदेने केली होती; पण अद्याप कुठलाही निर्णय घेणत आला नाही. आदिवासी लोकसंख्या ठरलेल्या प्रमाणानुसार नसतानाही तेथील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे बरीच गावे या योजनेपासून वंचित राहिली आहेत. नागपूर प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासींसाठी सबलीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत भूमिहिनांना जमीन देण्याची तरतूद आहे; पण वर्धा जिल्ह्यात हंगाम २०१४-१५ पर्यंत एकाही लाभार्थ्यांस लाभ दिला नाही. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात लोणसावळी येथील जमीन ३१ डिसेंबर २०१५ ला खरेदी करण्यात आली होती; पण अद्याप सदर जमीन प्रकल्प अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे. संबंधित आदिवासी लाभार्थी मंजूर असताना दीड वर्षापासून जमीन त्यांच्या नावे नसल्याने उत्पादनापासून वंचित राहावे लागले. प्रत्येक लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्नाचे नुकसान झाले. याबाबत चौकशी करण्यात यावी.अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत महिला व बाल कल्याण विभागाद्वारे मनोधर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे; पण मागील वर्षापासून अनेक प्रकरणे कार्यालयात प्रलंबित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी मान्यता देऊनही तसेच निधी उपलब्ध असताना संबंधित विभागांनी आलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. सदर प्रकरणात आदिवासीच्या अन्याय व अत्याचाराची प्रकरणे आहेत. या प्रकरणी निधीही परत गेल्याची माहिती आहे. सुवर्ण महोत्सव वर्ष अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांची २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीची शिष्यवृत्ती अद्याप संबंधित विद्यार्थ्यांना मिळाली नाही. सुमारे २.५ कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे असताना वाटपात विलंब होत आहे. याबाबत चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्तीचे वाटप करावे.कारंजा तालुक्यातील येणीदोडका, सेलू येथील गरमसूर, रायपूर, आर्वी येथील माळेगाव (ठेका) ही गावे बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याचा ठराव १०० टक्के लोकांनी ग्रामसभेत मंजूर केला आहे. सदर ठराव जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या गावांतील लोक वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळले असून शेती करणे टाळत आहे. ग्रामस्थांचे हाल होत आहे. याबाबत अद्याप सर्वेक्षण करण्यात आले नाही. गावांचा विचार करून वन विभागाकडून योग्य कार्यवाही व्हावी, आदी मागण्या अ.भा. आदिवासी विकास परिषदेने इवनाते यांना निवेदनातून केल्या आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)