शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

‘मला वेड लागले प्रेमाचे’वर थिरकली तरूणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:35 IST

‘तेजोमय नादब्रह्म’ या गीताने केतकी माटेगावकर यांनी मराठी गीत कार्यक्रमाला सुरूवात केली.

ठळक मुद्देवर्धा कला महोत्सवातील आयोजन : बहारदार गीतांना रसिकांची मनमुराद दाद

आॅनलाईन लोकमतवर्धा : ‘तेजोमय नादब्रह्म’ या गीताने केतकी माटेगावकर यांनी मराठी गीत कार्यक्रमाला सुरूवात केली. या गीताने उपस्थितांची मने जिंकली. हे प्रियकरा, मुड सांभाळ, तुºयाला ग आला आदी गीतांनी तरूणाईला नाचायला भाग पाडले. लग जा गले, बाहो में चले आ आदी जुन्या गाजलेल्या गीतांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. केतकीने गायलेले ‘मला वेड लागले प्रेमाचे’, हे गीत तर तरूणाईने डोक्यावरच घेतले. या गीतावर तरूणाई थिरकली. केतकीला सुप्रसिद्ध गायक अशी वैद्य व मृदूल पांडे यांची साथ लाभली.वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्धा कला महोत्सवामध्ये केतकी माटेगावकर यांचा सदाबहार मराठी गीतांचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर प्रमुख अतिथी म्हणून स्वागताध्यक्ष आ.डॉ. पंकज भोयर, वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष उदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, वर्धा कला महोत्सव अध्यक्ष संदीप चिचाटे, अशोक झाडे, वरुण पांडे, अभिजीत श्रावणे, शीतल भोयर, तपस्या सराफ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे यांनी केले. की बोर्डवर परिमल जोशी, पवन मानवटकर, तबला प्रमोद बावणे, ढोलक अनिकेत दहेकर, आॅक्टोपॅड विशाल दशसहस्त्र, गिटार सचिन मुळे, बासरी अरविंद उपाध्ये यांनी साथ दिली. कार्यक्रमाच्या पूर्वीचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर प्रास्ताविक संदीप चिचाटे यांनी केले.वर्धा कला महोत्सव यशस्वी करण्यासाठी अतुल झाडे, विनोद ताकसांडे, आशिष काळमेघ, अजय वरटकर, सचिन होले, निलेश किटे, नरेंद्र लोणकर, गौरव ओंकार, अजय झाडे, पवन राऊत, रसिक जुमडे, शुभम झाडे, प्रफुल गायकवाड, अनिल कुकुर्डे, गौरव जाधव, अजय ठाकरे, गौरव बन्नगरे, नितीन पोहनकर, पवन तराळे, संघर्ष तेलंग, दत्ता बाहुले, तेजस, श्रेयस काळे, अनिकेत ठाकरे, दिनेश येलोरे, यश बोरीकर आदी सहकार्य करीत आहेत.वर्धेकरांसाठी ठरतेय पर्वणीवर्धा कला महोत्सव समितीद्वारे दरवर्षी वर्धा कला महोत्सवचे आयोजन केले जाते. यात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जातात. शनिवारी पार पडलेल्या केतकी माटेगावकर यांच्या मराठी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वर्धेकर रसिक मंत्रमुग्ध झाले. कला महोत्सव वर्धेकरांसाठी पर्वणीच ठरली आहे.