शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

चक्रीवादळाचा तडाखा

By admin | Updated: May 7, 2016 02:06 IST

तालुक्यातील काही गावांना चक्री वादळाचा गुरूवारी चांगलाच तडाखा बसला. यामध्ये पिंपळगाव (लुटे),

अवकाळी पावसाचा कहर : आर्वी, वर्धा, वायगाव येथे नुकसान देवळी : तालुक्यातील काही गावांना चक्री वादळाचा गुरूवारी चांगलाच तडाखा बसला. यामध्ये पिंपळगाव (लुटे), खर्डा, बोपापूर वाणी, रत्नापूर, हुस्रापूर, भिडी, ईसापूर, देवळी व परिसरातील गावात झाडे उन्मळून पडली. घरावरील छप्पर उडाले, विद्युत पोल खाली पडून तारा विखुरल्या. काही मिनिटांच्या अवधीतच या वादळाने हाहाकार माजविला.पिंपळगाव (लुटे) येथील स्वस्त धान्य दुकानदार भास्कर गायकवाड यांच्या अंगावर शेतातील गोठ्याच्या टिना व दगड पडल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याच गावातील शेषनारायण काठोके यांच्या शेतातील गोठा बैलाचे अंगावर पडल्याने एक बैल जखमी झाला. हुस्रापूर येथे चंद्रभान वड्डे यांच्या घरावर चिंचेचे झाड उन्मळून पडले. खर्डा येथील हिरामन शिवरकर व शंकर गावंडे यांच्या घराचे टिनाचे छप्पर उडाले. गावातील अनेकांचे यामध्ये नुकसान झाले.रत्नापूरचे सरपंच अयुबअली पटेल यांच्या गोठ्याचे छप्पर उडाले. बोपापूर वाणी येथे माणिक कोंबे व अमर अंबरकर यांच्या घराचे व गोठ्याचे छप्पर उडाले. अनेकांच्या घराच्या टिना उडून नुकसान झाले. अनेक गावातील विद्युत पोल उन्मळून पडल्यामुळे कोळोख पसरला आहे. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तहसीलदार तेजस्वीनी जाधव व सहकारी अधिकाऱ्यांनी नुकसानीचा आढावा घेतला.दोन तास विद्युत पुरवठा ठप्पहिंगणघाट- तालुक्यात विजेच्या कडकडाटासह सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ३० घराचे अंशत: व एका घराचे पुर्णत: नुकसान झाले. यात जवळपास ४ लाखांच्या नुकसानीचा अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे. जवळपास एकतास झालेल्या या पावसाची १९.२ मि.ली. नोंद झाली आहे. जवळपास सर्वच ठिकणाचा वीज पुरवठा दोन तास खंडित होता.गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या आकस्मिक आगमनाने अनेकांची तारांबळ उडाली. या वादळी पावसामुळे अनेक गावातील मोठमोठी वृक्ष कोलमडून पडली. अल्लीपूरात झाड कोसळून एका घराचे पूर्णत: नुकसान झाले. येणोरा येथे एक, पारडी एक, हिंगणघाट आठ, भगवा एक, नुरापूर तीन, दोंदुडा सात, गंगापूर तीन, खापरी तीन घरे, बोरखेडी येथे एक गोठ्याचे अंशत: नुकसान झाले. तर सोनेगाव (धोटे) येथे एका घरावर झाड कोसळून एका घराचे अंशत: नुकसान झाले. सदर वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती नायब तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांनी दिली. या वादळी पावसाने कोणतीही जीवहानी झाली नाही. शहरात आजही ढगाळ वातावरण कायम आहे. गिरड परिसराला वादळी पावसाचा तडाखागिरड - गुरूवारी सायंकाळी गिरड व आसपासच्या परिसराला वादळी वारे व पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. यामध्ये अनेकांच्या घरावरील टिना, छपरे उडून गेली. तसेच सायंकाळपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्रभर अंधाराचे साम्राज्य होते. येथील भाऊराव तेलरांधे यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम येथील कन्या विद्यालयाच्या मैदानावर होता. त्यासाठी मोठा मंडप घालण्यात आला होता. परंतु वादळाने हा संपूर्ण मंडप उडून गेला. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.