शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:27 IST

महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली.

ठळक मुद्देदिलीप उटाणे : बोरगावच्या आयटक कार्यालयातील बैठक

आॅनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष म्हणून मंगला इंगोले यांची उपस्थिती होती.राज्यात दोन लाख कर्मचारी शून्य ते ६ वयोगटातील मुले, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांना सेवा पुरवित आहेत. या योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शंभर रुपये मानधनापासून काम केले आहे. शासनाने अंगणवाडी कर्मचऱ्यांची सेवा भरती नियम तयार केले. यावेळी सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे ठेवले होते; परंतु अचानक फडणवीस सरकारने सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केले. यामुळे राज्यातील ३२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागेल. वर्धा जिल्ह्यातील शेकडो महिलांना घरी जावे लागेल.ज्या अंगणवाडी केंद्रात पाच ते दहा लाभार्थी आहेत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्यात येणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या पोषण आहारावर परिणाम होणार आहे.शासनाच्या चुकीच्या निर्णया विरोधात आयटक तिव्र लढा उभा करेल. शासनाने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घेण्यासाठी मंगळवारी (२० फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा समोर धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न व शासनाची भुमिका याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. प्रास्तविकातून जिल्हा सचिव वंदना कोळणकर यांनी सप्टेंबरच्या राज्यव्यापी संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती समितींच्या नेत्यांसोबत चर्चा करून सेवाजेष्ठतेनुसार मानधन वाढ, भाऊबिज दोन हजार, सेवानिवृत्त लाभ दोन लाख देण्यात येईल असे जाहीर केले. परंतु अद्यापपर्यत शासनआदेश काढले नाही.बैठकीत ज्ञानेश्वरी डंभारे, प्रज्ञा ढाले, अर्चना वंजारी, वंदना खोबरागडे, मैना उईके, मनिषा सुरकार, शकुंतला शंभरकर, सुलभा तिरभाने, सुनिता टिपले, अल्का भानसे, शारदा कांबळे यांनी विचार व्यक्त केले. बैठकचे संचालन रंजनी पाटील यांनी केले तर आभार ज्योत्स्ना बोरकुटे यांनी मानले.१२८१ केंद्रात २५१८ सेविकाजिल्ह्यात एकूण १२८१ अंगणवाडी केंद्र आहे. या केंद्रात २५१८ महिला सेविका आहे. यात वर्धा १ मध्ये १२०, वर्धा २ मध्ये १५०, देवळी १५५, आर्वी १४४, आष्टी १०१, कारंजा १४१, सेलू १५३, समुद्रपुर १५४, हिंगणघाट १६३ अंगणवाडी आहेत.बचत गटाकडून आहार पुरविण्यास नकारबचत गटा कडून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे पैसे १२ महिन्यापासून शासनाने दिले नाही. त्यामुळे बचत गट आहार पुरविण्यासाठी नकार देत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर आहार सुरू आहे. याची जबाबदारीही याच सेविकांवर आहे.