शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:27 IST

महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली.

ठळक मुद्देदिलीप उटाणे : बोरगावच्या आयटक कार्यालयातील बैठक

आॅनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष म्हणून मंगला इंगोले यांची उपस्थिती होती.राज्यात दोन लाख कर्मचारी शून्य ते ६ वयोगटातील मुले, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांना सेवा पुरवित आहेत. या योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शंभर रुपये मानधनापासून काम केले आहे. शासनाने अंगणवाडी कर्मचऱ्यांची सेवा भरती नियम तयार केले. यावेळी सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे ठेवले होते; परंतु अचानक फडणवीस सरकारने सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केले. यामुळे राज्यातील ३२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागेल. वर्धा जिल्ह्यातील शेकडो महिलांना घरी जावे लागेल.ज्या अंगणवाडी केंद्रात पाच ते दहा लाभार्थी आहेत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्यात येणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या पोषण आहारावर परिणाम होणार आहे.शासनाच्या चुकीच्या निर्णया विरोधात आयटक तिव्र लढा उभा करेल. शासनाने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घेण्यासाठी मंगळवारी (२० फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा समोर धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न व शासनाची भुमिका याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. प्रास्तविकातून जिल्हा सचिव वंदना कोळणकर यांनी सप्टेंबरच्या राज्यव्यापी संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती समितींच्या नेत्यांसोबत चर्चा करून सेवाजेष्ठतेनुसार मानधन वाढ, भाऊबिज दोन हजार, सेवानिवृत्त लाभ दोन लाख देण्यात येईल असे जाहीर केले. परंतु अद्यापपर्यत शासनआदेश काढले नाही.बैठकीत ज्ञानेश्वरी डंभारे, प्रज्ञा ढाले, अर्चना वंजारी, वंदना खोबरागडे, मैना उईके, मनिषा सुरकार, शकुंतला शंभरकर, सुलभा तिरभाने, सुनिता टिपले, अल्का भानसे, शारदा कांबळे यांनी विचार व्यक्त केले. बैठकचे संचालन रंजनी पाटील यांनी केले तर आभार ज्योत्स्ना बोरकुटे यांनी मानले.१२८१ केंद्रात २५१८ सेविकाजिल्ह्यात एकूण १२८१ अंगणवाडी केंद्र आहे. या केंद्रात २५१८ महिला सेविका आहे. यात वर्धा १ मध्ये १२०, वर्धा २ मध्ये १५०, देवळी १५५, आर्वी १४४, आष्टी १०१, कारंजा १४१, सेलू १५३, समुद्रपुर १५४, हिंगणघाट १६३ अंगणवाडी आहेत.बचत गटाकडून आहार पुरविण्यास नकारबचत गटा कडून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे पैसे १२ महिन्यापासून शासनाने दिले नाही. त्यामुळे बचत गट आहार पुरविण्यासाठी नकार देत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर आहार सुरू आहे. याची जबाबदारीही याच सेविकांवर आहे.