शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पाणीदार हिवरा गावासाठी सरसावले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:45 IST

तालुक्यातील हिवरा या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. श्रमदानातून हिवरा गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी युवक-युवतींसह शेकडो हात सरसावले आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही हिवरा या गावाला सदिच्छा भेट देत श्रमदान केले.

ठळक मुद्देदादाराव केचे यांनी केले श्रमदान : नागरिकांचा प्रचंड उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील हिवरा या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. श्रमदानातून हिवरा गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी युवक-युवतींसह शेकडो हात सरसावले आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही हिवरा या गावाला सदिच्छा भेट देत श्रमदान केले. यामुळे श्रमदान करणाऱ्या हातांना बळ मिळाले आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही वॉटर कप आर्वी विधानसभा मतदार संघातील गावाला मिळावा म्हणून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्रमदानासह तांत्रिक माहिती घेऊन दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी स्पर्धेसाठी सज्ज झालेल्या गावांना यथोचित सहकार्य करण्याचे निर्देश केचे यांनी दिलेत. वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेचे कौतुक करताना वॉटर कप स्पर्धेने गाव एकसंघ झालेले पाहायला मिळाल्याचे म्हटले होते. ते तंतोतंत खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. यंदा या स्पर्धेत तब्बल ७५ तालुके सहभागी झाले आहेत. मागील वर्षी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आर्वी तालुक्यातील काकडदरा या गावाने पटकाविला आहे. यामुळे हा कप टिकवून ठेवण्यासाठी जबाबदारी यंदा वाढली आहे, असेही दादाराव केचे यांनी सांगितले.हिवरा येथील श्रमदानाला माजी आमदार दादाराव केचे यांच्या सोबत भाजयुमो आर्वी तालुका अध्यक्ष जितेंद्र ठाकरे, पं.स. सदस्य हनुमंत चरडे, वाढोणाचे सरपंच अतुल खोडे, नेरी मिर्झापूरचे उपसरपंच बाळा सोनटक्के, राजू उर्फ सचिंद्र कदम, अश्विन शेंडे, मनीष उभाड, मनोज कसर, राजाभाऊ वानखेडे, प्रमोद विसेकर यांच्यासह हिवरा येथील नागरिक उपस्थित होते.राज्याच्या २४ जिल्ह्यांत ७५ तालुक्यांत स्पर्धायंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी १० लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. या पद्धतीने स्पर्धेत विजेत्या गावांना मिळणारी पारितोषिकांची एकूण रक्कम जवळपास १० कोटी रुपये राहणार आहे. यंदा ही स्पर्धा महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांपर्यंत विस्तारली गेली आहे.