शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

‘श्रावण बाळ’ योजनेतील शेकडो प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: August 8, 2014 00:08 IST

निराधार वृद्धांकरिता शासनाद्वारे विविध योजना राबविल्या जातात़ या योजना कुचकामी यंत्रणेमुळे लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नसल्याचे दिसते़ कारंजा तालुक्यात नायब तहसीलदारांच्या

कारंजा (घा़) : निराधार वृद्धांकरिता शासनाद्वारे विविध योजना राबविल्या जातात़ या योजना कुचकामी यंत्रणेमुळे लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नसल्याचे दिसते़ कारंजा तालुक्यात नायब तहसीलदारांच्या डीजीटल स्वाक्षरीकरिता शेकडो प्रकरणी प्रलंबित राहिली आहेत़ यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेतील प्रकरणे वेळेवर सभा न झाल्याने, निवडणूक आचार संहिता वा लिपीक व संबंधित नायब तहसीलदारांच्या कामचुकार वृत्तीमुळे प्रलंबित राहत आहेत़ सुमारे एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून तालुक्यातील शेकडो प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत़ यात लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़ लाभार्थ्यांच्या पाठपुराव्यामुळे जून महिन्यात तहसीलदार बालपांडे यांनी विशेष लक्ष घालून समितीची तातडीची सभा घेतली़ यात शेकडो प्रकरणे मंजूर करून घेण्यात आली; पण यातील उत्पन्नाचा दाखला व तलाठ्याचा अहवाल कालबाह्य झाला़ यामुळे पुन्हा नवीन उत्पन्नाचा दाखल व तलाठी अहवाल मागविण्यात आला. अनेक तलाठ्यांच्या बदल्या झाल्याने नवीन तलाठी प्रमाणपत्र व अहवाल देण्यास तयार नाहीत. विशेष असे की, प्रकरणे मंजूर करण्यास तहसील कार्यालयाने विलंब केला आणि नवीन प्रमाणपत्र आणण्याची शिक्षा मात्र लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. वास्तविक, उत्पन्नाचे नवीन प्रमाणपत्र तहसीलदारांनी तलाठ्याकडून मागवायला हवे होते़ असे केल्यास लाभार्थ्यांना त्रास होणार नाही. नवीन उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या सबबीखाली जून महिन्यात मंजूर शेकडो प्रकरणे खोळंबली आहेत़ बीपीएल अंतर्गत श्रावण बाळ योजनेच्या मंजूर प्रकरणांचा निधी संबंधित बँकेला पाठविण्यासाठी नायब तहसीलदारांची ‘डीजीटल स्वाक्षरी’ मंजूर करून घ्यावी लागते. ही डीजीटल स्वाक्षरी मंजूर करण्याचा प्रस्ताव तहसीलने आतापर्यंत तीन वेळा वरिष्ठ प्रशासनाकडे पाठविला; पण अद्याप मान्यता मिळाली नाही़ यामुळे बिपीएल अंतर्गत श्रावणबाळ योजनेची २०० हून अधिक प्रकरणे मंजूर होऊनही प्रलंबित आहे़ अनेक गरजू लाभार्थ्यांना दैनंदिन गरजा, औषधोपचार आणि उदरनिर्वाहाची अडचण झाली आहे. तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे़(तालुका प्रतिनिधी)