शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कापूस स्वस्त मग, सुती कापड महाग कसे?

By admin | Updated: October 25, 2014 22:45 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात प्रचंड मंदी असल्याची हाकाटी सूत गिरणी मालकांनी सुरू केली़ यामुळे देशांतर्गत कापसाच्या भावातही मोठी मंदी आली आहे़ याच काळात कापसापासून तयार

फनिंद्र रघाटाटे - रोहणाआंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात प्रचंड मंदी असल्याची हाकाटी सूत गिरणी मालकांनी सुरू केली़ यामुळे देशांतर्गत कापसाच्या भावातही मोठी मंदी आली आहे़ याच काळात कापसापासून तयार होणारे कापड मात्र शेतकऱ्यांना व ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करावे लागताना दिसते़ कापूस स्वस्त आहे, मग, कापड महाग का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ १९७२ मध्ये राज्य शासनाने ‘कापूस ते कापड’ अशी कापूस एकाधिकार योजना सुरू केली होती़ या योजनेचा उद्देश कापसापासून होणारा नफा शेतकऱ्यांना वितरित करून कापूस उत्पादकांना आर्थिक दिलासा द्यावा व तोटा झाल्यास तो शासनाने सहन करावा, असा होता़ सन २००० पर्यंत ही योजना सुरळीत सुरू होती़ शेतकऱ्यांना या योजनेमुळे बाजारातील तेजीत हिशेबाअंती चांगला भाव मिळत होता प मंदीमध्ये कमी भावाने खरेदी असल्याने हमीभावाचे संरक्षण मिळत होते़ केंद्र सरकारने डंकेल प्रस्तावासह आंतरराष्ट्रीय बाजार व्यवस्था व जागतिकीकरण तथा आर्थिक उदारीकरण तत्वप्रणाली स्वीकारली. यामुळे राज्य शासनाला आयतेच कारण मिळाले व महाराष्ट्र शासनाने कापूस एकाधिकार योजना बंद केली. शेतकऱ्यांचे तीन टक्के व नंतर एक टक्का कापलेले चढ-उतार निधीचे पैसे परत केले नाही. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये महाराष्ट्र शासन वापरत आहे. कापूस एकाधिकार योजना बंद झाल्यापासून कापूस उत्पादकांना खासगी व्यापारी व सुतगिरणी मालक कापसाच्या भावात लुबाडत आहे. कापसाची आधारभूत किंमत ठरविताना कृषी मूल्य आयोगावर देशातील सूत गिरणी मालकांची लॉबी राजकीय दबाव आणून भाव कमी ठरविण्यास बाध्य करीत असल्याचा आरोप होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव घसरले, हे मान्य केले तर मग, सूती कापडाचे भाव वाढलेले कसे, हलक्यात हलका सुती कापड ८० रुपये मीटरपेक्षा अधिक दराने मिळतो़ कापूस स्वस्तात खरेदी केला जातो तर सुती कापडाचे भावही कमी होणे अपेक्षित असते; पण तसे कधीही होताना दिसत नाही़ यानंतर दरवर्षी कापसाच्या भावात मंदी असल्याचेच वातावरण दिसते़ यावरून कापसाशी खेळले जाणारे राजकारण स्पष्ट होते़ ऐन कापूस बाजारात येत असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव पडणे, हमी भाव अल्प जाहीर होणे आणि कापूस विकल्याशिवाय पर्याय नसलेल्या शेतकऱ्यांना संधी साधून लुटणे, हा प्रकार दरवर्षीचाच झाला आहे़ यामुळे केंद्र व राज्य शासनाने याचा विचार करीत शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे झाले आहे़