शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कापूस स्वस्त मग, सुती कापड महाग कसे?

By admin | Updated: October 25, 2014 22:45 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात प्रचंड मंदी असल्याची हाकाटी सूत गिरणी मालकांनी सुरू केली़ यामुळे देशांतर्गत कापसाच्या भावातही मोठी मंदी आली आहे़ याच काळात कापसापासून तयार

फनिंद्र रघाटाटे - रोहणाआंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात प्रचंड मंदी असल्याची हाकाटी सूत गिरणी मालकांनी सुरू केली़ यामुळे देशांतर्गत कापसाच्या भावातही मोठी मंदी आली आहे़ याच काळात कापसापासून तयार होणारे कापड मात्र शेतकऱ्यांना व ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करावे लागताना दिसते़ कापूस स्वस्त आहे, मग, कापड महाग का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ १९७२ मध्ये राज्य शासनाने ‘कापूस ते कापड’ अशी कापूस एकाधिकार योजना सुरू केली होती़ या योजनेचा उद्देश कापसापासून होणारा नफा शेतकऱ्यांना वितरित करून कापूस उत्पादकांना आर्थिक दिलासा द्यावा व तोटा झाल्यास तो शासनाने सहन करावा, असा होता़ सन २००० पर्यंत ही योजना सुरळीत सुरू होती़ शेतकऱ्यांना या योजनेमुळे बाजारातील तेजीत हिशेबाअंती चांगला भाव मिळत होता प मंदीमध्ये कमी भावाने खरेदी असल्याने हमीभावाचे संरक्षण मिळत होते़ केंद्र सरकारने डंकेल प्रस्तावासह आंतरराष्ट्रीय बाजार व्यवस्था व जागतिकीकरण तथा आर्थिक उदारीकरण तत्वप्रणाली स्वीकारली. यामुळे राज्य शासनाला आयतेच कारण मिळाले व महाराष्ट्र शासनाने कापूस एकाधिकार योजना बंद केली. शेतकऱ्यांचे तीन टक्के व नंतर एक टक्का कापलेले चढ-उतार निधीचे पैसे परत केले नाही. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये महाराष्ट्र शासन वापरत आहे. कापूस एकाधिकार योजना बंद झाल्यापासून कापूस उत्पादकांना खासगी व्यापारी व सुतगिरणी मालक कापसाच्या भावात लुबाडत आहे. कापसाची आधारभूत किंमत ठरविताना कृषी मूल्य आयोगावर देशातील सूत गिरणी मालकांची लॉबी राजकीय दबाव आणून भाव कमी ठरविण्यास बाध्य करीत असल्याचा आरोप होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव घसरले, हे मान्य केले तर मग, सूती कापडाचे भाव वाढलेले कसे, हलक्यात हलका सुती कापड ८० रुपये मीटरपेक्षा अधिक दराने मिळतो़ कापूस स्वस्तात खरेदी केला जातो तर सुती कापडाचे भावही कमी होणे अपेक्षित असते; पण तसे कधीही होताना दिसत नाही़ यानंतर दरवर्षी कापसाच्या भावात मंदी असल्याचेच वातावरण दिसते़ यावरून कापसाशी खेळले जाणारे राजकारण स्पष्ट होते़ ऐन कापूस बाजारात येत असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव पडणे, हमी भाव अल्प जाहीर होणे आणि कापूस विकल्याशिवाय पर्याय नसलेल्या शेतकऱ्यांना संधी साधून लुटणे, हा प्रकार दरवर्षीचाच झाला आहे़ यामुळे केंद्र व राज्य शासनाने याचा विचार करीत शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे झाले आहे़