शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

अवघे गावच प्रतिबंधित शेतीची कामे करायची कशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने शेतकरी, शेतमजुरांसह नागरिकही आता घरातच लॉकडाऊन झाले आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तुच्या सेवा या बाबी वगळता इतर कामाकरिता बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम पडला आहे.

ठळक मुद्देकाकडावासीयांना पडला प्रश्न : दहा रुग्णांमुळे गावकरी घरातच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याच्या टोकावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या काकडा या गावात वेळोवेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवार हिरवेगार झाले आहे. शेतात डोलणारी पिके पाहून शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या. मात्र, गावात एकामागून एक, दहा कोरोना रुग्ण आढळून आल्याने अवघे गावच प्रतिबंधित करण्यात आले. शेतकऱ्यांना घराबाहेर पडता येत नसल्याने शेतातील मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे शेतात सर्वत्र शांतता असून पिकेही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारंजा (घा.) तालुक्यातील काकडा गावात सुरुवातीला दोन रुग्ण आढळून आल्याने गावातील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला होता. पण, नंतर ही रुग्णसंख्या दहावर गेल्याने अवघे गावच प्रतिबंधीत करण्यात आले. गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने शेतकरी, शेतमजुरांसह नागरिकही आता घरातच लॉकडाऊन झाले आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तुच्या सेवा या बाबी वगळता इतर कामाकरिता बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम पडला आहे.सध्या शेतीचा हंगाम असून शेतात डोलणाऱ्या पिकांची वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकडे थोडेही दुर्लक्ष झाले तर वर्षभराचे उत्पन्न हातून जाण्याची भीती असते. पण, सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची निंदण, डवरण, फवारणी, खत देण्याची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी किंवा शेतमजूर शेताकडे फिरकत नसल्याने वन्यप्राण्यांपासूनही धोका निर्माण झाला असून शेतात पिकांच्यावर तण वाढत आहे. गावकऱ्यांना १४ दिवस घरातच राहावे लागले तर पिकांच्यावर तण वाढल्यानंतर शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागेल. त्याकरिता खर्चही वाढणार असल्याने शेतीची कामे करायची कशी, होणाऱ्या नुकसानीचे काय, अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी सध्या चिंतेत आहे. वेळीच योग्य कार्यवाहीची अपेक्षा येथील नागरिकांना आहे.दुग्ध व्यवसायिकांना आर्थिक फटकाकाकडा गावातील ३०८ घरांच्या वस्तीतील लोकसंख्या १ हजार ५०० च्या आसपास आहे. या गावातच आवागमनास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या गावामध्ये दुग्ध उत्पादकांची संख्या मोठी असून दररोज अडीचशे ते तिनशे लिटर दूध काढले जाते. मात्र, संचारबंदी असल्याने ते दूध नदीत फेकावे लागतात किं वा श्वानांना पाजावे लागत असल्याने दुग्धउत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. यासोबतच हजारावर जनावरांच्या चारापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.गावात कोरोना रुग्ण आढळून आल्याने गावच प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीकामे खोळंबली असून पिके धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. सोबतच जनावरांच्या वैरणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन गावकऱ्यांची या समस्यांतून सुटका करावी.- वाल्मिक ठाकरे, उपसरपंच, काकडा.

टॅग्स :agricultureशेती