शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा पारंपरिक चुलीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करुन इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अतिशय त्रास होतो. यामुळे डोळ्याचा व श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

ठळक मुद्देसिलिंडरच्या किंमतीत प्रचंड वाढ : उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुदपूर : केंद्रशासनाच्यावतीने चुलीच्या धुरापासून महिलांची मुक्तता व्हावी, यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअतंर्गत लाखो कुटूंबांना गॅस जोडणी दिली. जिल्ह्यातील ग्रामीण व अतिदूर्गम भागातील कुटुंबांना याचा लाभ मिळाला. मात्र सध्या सिलिंडरच्या किंमती आवाक्याबाहेर असल्याने किंमतीला कंटाळून गृहिणी पुन्हा पारंपरिक चुकीकडेच वळतांना दिसून येत आहे.सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करुन इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अतिशय त्रास होतो. यामुळे डोळ्याचा व श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.त्यामुळे सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी समीक्षा मांडवकर व सुजाता बाभूळकर यांच्यासह गावातील महिलांनी केली आहे.सिलिंडर अडगळीत अन् केरोसिनही बंदशासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस जोडणी योजने अंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली. बहुतांश घरात गॅस जोडणी दिली मात्र, त्यामुळे त्या कुटुंबाचा रेशनकार्डवरील रॉकेलचा पुरवठा बंद झाला.रॉकेल मिळेना, सिलिंडरचे भाव वाढले. त्यामुळे सिलिंडर खरेदी करणे महागात पडत आहे. परिणामी ग्रामीण भागातील अनेक सिलिंडर अडगळीत पडले असल्याचे दिसून येत आहे. भाव वाढल्यामुळे सिलिंडर खरेदी करता येत नाही आणि राशनकार्डवरील रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.