शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा पारंपरिक चुलीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करुन इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अतिशय त्रास होतो. यामुळे डोळ्याचा व श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

ठळक मुद्देसिलिंडरच्या किंमतीत प्रचंड वाढ : उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुदपूर : केंद्रशासनाच्यावतीने चुलीच्या धुरापासून महिलांची मुक्तता व्हावी, यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअतंर्गत लाखो कुटूंबांना गॅस जोडणी दिली. जिल्ह्यातील ग्रामीण व अतिदूर्गम भागातील कुटुंबांना याचा लाभ मिळाला. मात्र सध्या सिलिंडरच्या किंमती आवाक्याबाहेर असल्याने किंमतीला कंटाळून गृहिणी पुन्हा पारंपरिक चुकीकडेच वळतांना दिसून येत आहे.सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करुन इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अतिशय त्रास होतो. यामुळे डोळ्याचा व श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.त्यामुळे सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी समीक्षा मांडवकर व सुजाता बाभूळकर यांच्यासह गावातील महिलांनी केली आहे.सिलिंडर अडगळीत अन् केरोसिनही बंदशासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस जोडणी योजने अंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली. बहुतांश घरात गॅस जोडणी दिली मात्र, त्यामुळे त्या कुटुंबाचा रेशनकार्डवरील रॉकेलचा पुरवठा बंद झाला.रॉकेल मिळेना, सिलिंडरचे भाव वाढले. त्यामुळे सिलिंडर खरेदी करणे महागात पडत आहे. परिणामी ग्रामीण भागातील अनेक सिलिंडर अडगळीत पडले असल्याचे दिसून येत आहे. भाव वाढल्यामुळे सिलिंडर खरेदी करता येत नाही आणि राशनकार्डवरील रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.