शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

घराला आग; कापसासह १७ लाखांचे साहित्य भस्मसात

By admin | Updated: December 28, 2015 02:28 IST

नजीकच्या सावली (वाघ) येथील प्रगतशील शेतकरी दिलीप ढोक यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत ...

सावली (वाघ) येथील घटना : दोन तासांनी आगीवर नियंत्रणहिंगणघाट : नजीकच्या सावली (वाघ) येथील प्रगतशील शेतकरी दिलीप ढोक यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील १७ लाखांच्या फर्निचर, साहित्यासह सुमारे ५० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यावेळी ढोक यांचे संपूर्ण कुटूंब हे नागपूरला होते. रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास काही ग्रामस्थांना ढोक यांच्या घरातून आगीचे लोळ निघत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संपूर्ण गाव निद्रावस्थेत होता. आगीचे लोळ दिसताच आरडाओरड सुरू झाली. गावात काहीतरी अघटीत घडल्याची चाहूल लागताच गाव जागे झाले. आग विझविण्यासाठी ग्रामस्थ घटनास्थळी धावले. बादली, गुंड तसेच विहिरीवरील मोटरपंप सुरू करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण रौद्ररूप धारण केलेली आग आटोक्यात आली नाही. ५ वाजातच्या सुमारास हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आल्यानंतर आग विझविण्यात आली. घटनेची माहिती नागपूरला ढोक यांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आल्यानंतर ते गावात दाखल झाले. या आगीत नव्यानेच बनविलेले घरातील संपूर्ण फर्निचर जळून खाक झाले. दोन टीव्ही, सिलिंग पंखे आदी साहित्य भस्मसात झाले. घरालगतच्या गोदामामध्ये १५० क्विंटल कापूस भरलेला होता. पैकी ५० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तलाठ्याने घटनास्थळाचा पंचनामा केला. १७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी शॉट सर्कीटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)