शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

रुग्णालय झाले; पण सुविधाच नाही

By admin | Updated: April 20, 2016 02:22 IST

राज्य शासनाने बहुतांश तालुका स्थळांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मोडीत काढून रुग्णालये मंजूर केले.

पदभरतीकडे कानाडोळा : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यातआष्टी (शहीद) : राज्य शासनाने बहुतांश तालुका स्थळांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मोडीत काढून रुग्णालये मंजूर केले. इमारतींची बांधकामे हाती घेतली. रुग्णालयाचा दर्जाही बहाल केला; पण अद्याप पदभरती व अन्य सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. यामुळे ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती होऊनही आरोग्य केंद्राचाच कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार केवळ येथेच नव्हे तर जिल्ह्यात अन्य ठिकाणीही होत आहे. परिणामी, रुग्णांची गैरसोय होताना दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.आष्टी शहीदभूमीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले; पण शासनाने कुठल्याही सोयी सुविधा पुरविल्या नाहीत. यामुळे एवढ्या मोठ्या इमारतीमधून प्राथमिक आरोग्य केंद्राचाच कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथे औषधी साठा नाही, डॉक्टर नाही, कुठल्याच प्रकारच्या सुविधा नसल्याने जनावरांच्या गोठ्यासम अवस्था झाली आहे. डॉक्टर सतत गैरहजर राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतोरा येथे हलविण्यात येणार होते; पण ग्रामीण रुग्णालयाला कुठल्याच प्रकारच्या सुविधा नसल्याने नाजुक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तालुक्याच्या स्थळी ग्रामीण भागातून रुग्ण येतात. या रुग्णांना योग्य औषधोपचार व सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधी विकत आणावी लागत आहे. तालुका आरोग्य अधिकारी पद रिक्त असल्याने प्रभारी अधिकारी धुरा सांभाळत आहे. नियमित अधिकारी मिळावे म्हणून जि.प. सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला; पण अधिकाऱ्यांची पदे शासनाकडून भरण्यात न आल्याने नियमित अधिकारी देणे शक्य होत नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाला शासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. येथील रुग्णालयाला दोन वर्षांपूर्वीच या सुविधा मिळणे अपेक्षित होते; पण काहीही झाले नाही. शासनाने ग्रामीण रुग्णालयाचा केवळ दर्जा बहाल केला; पण त्यासाठी लागणारा फौजफाटा अद्याप दिला नाही. यामुळे योग्य रुग्णसेवाच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू ठेवून शासनानेच रुग्णसेवेचा हशा उडविल्याचे दिसून येत आहे. २०११ पासून मंजूर रुग्णालयाचे बांधकाम प्रथम वादाच्या भोवऱ्यात अडकले. कसेबसे बांधकाम पूर्ण झाले तर अद्याप अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नाही. रुग्णालयाला लागणाऱ्या तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. औषधींचाही तुटवडा असल्याने ग्रामस्थांना भुर्दंड सोसावा लागत आहे. याकडे लक्ष देत रुग्णालयाला मूर्तरूप देण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)