शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

रुग्णालय झाले; पण सुविधाच नाही

By admin | Updated: April 20, 2016 02:22 IST

राज्य शासनाने बहुतांश तालुका स्थळांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मोडीत काढून रुग्णालये मंजूर केले.

पदभरतीकडे कानाडोळा : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यातआष्टी (शहीद) : राज्य शासनाने बहुतांश तालुका स्थळांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मोडीत काढून रुग्णालये मंजूर केले. इमारतींची बांधकामे हाती घेतली. रुग्णालयाचा दर्जाही बहाल केला; पण अद्याप पदभरती व अन्य सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. यामुळे ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती होऊनही आरोग्य केंद्राचाच कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार केवळ येथेच नव्हे तर जिल्ह्यात अन्य ठिकाणीही होत आहे. परिणामी, रुग्णांची गैरसोय होताना दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.आष्टी शहीदभूमीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले; पण शासनाने कुठल्याही सोयी सुविधा पुरविल्या नाहीत. यामुळे एवढ्या मोठ्या इमारतीमधून प्राथमिक आरोग्य केंद्राचाच कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथे औषधी साठा नाही, डॉक्टर नाही, कुठल्याच प्रकारच्या सुविधा नसल्याने जनावरांच्या गोठ्यासम अवस्था झाली आहे. डॉक्टर सतत गैरहजर राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतोरा येथे हलविण्यात येणार होते; पण ग्रामीण रुग्णालयाला कुठल्याच प्रकारच्या सुविधा नसल्याने नाजुक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तालुक्याच्या स्थळी ग्रामीण भागातून रुग्ण येतात. या रुग्णांना योग्य औषधोपचार व सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधी विकत आणावी लागत आहे. तालुका आरोग्य अधिकारी पद रिक्त असल्याने प्रभारी अधिकारी धुरा सांभाळत आहे. नियमित अधिकारी मिळावे म्हणून जि.प. सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला; पण अधिकाऱ्यांची पदे शासनाकडून भरण्यात न आल्याने नियमित अधिकारी देणे शक्य होत नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाला शासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. येथील रुग्णालयाला दोन वर्षांपूर्वीच या सुविधा मिळणे अपेक्षित होते; पण काहीही झाले नाही. शासनाने ग्रामीण रुग्णालयाचा केवळ दर्जा बहाल केला; पण त्यासाठी लागणारा फौजफाटा अद्याप दिला नाही. यामुळे योग्य रुग्णसेवाच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू ठेवून शासनानेच रुग्णसेवेचा हशा उडविल्याचे दिसून येत आहे. २०११ पासून मंजूर रुग्णालयाचे बांधकाम प्रथम वादाच्या भोवऱ्यात अडकले. कसेबसे बांधकाम पूर्ण झाले तर अद्याप अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नाही. रुग्णालयाला लागणाऱ्या तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. औषधींचाही तुटवडा असल्याने ग्रामस्थांना भुर्दंड सोसावा लागत आहे. याकडे लक्ष देत रुग्णालयाला मूर्तरूप देण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)