शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ३०० वर फळबागा

By admin | Updated: March 31, 2017 01:55 IST

केळी बागायतदारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलू तालुक्यात केळीच्या बागा नामशेष होत आहे.

शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे : तालुक्यातील केळीच्या बागा मात्र नाममात्रविजय माहुरे   घोराडकेळी बागायतदारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलू तालुक्यात केळीच्या बागा नामशेष होत आहे. असे असले तरी तालुक्यातील शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. परिणामी, मागील पाच वर्षांत ३०० च्या वर फळबागा तालुक्यात बहरल्या आहेत. बारमाही ओलिताची शेती असलेल्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जात होते. महागडा खर्च, १८ महिन्यांचे पीक आणि अल्प भाव पाहता मागील दहा वर्षांमध्ये केळीच्या बागा नामशेष होत आहेत. असे असले तरी पाच वर्षांमध्ये शासनाच्या सिंचन व धडक विहीर योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी बागायती शेती करण्याकडेच वळत असल्याचे दिसते. यामुळेच शासनाने फळबाग योजना सुरू केली. यात निंबु, संत्रा, मोसंबी, डाळींब या फळांचा समावेश होता. २०१२-१३ पासून ही योजना आजही सुरू आहे. यासाठी शासन तीन वर्षांपर्यंत अनुदान देते. फळबागेसाठी रोपटे शेतात लावल्यानंतर ३ ते ५ वर्षांपर्यंत आंतर पीक घेता येत असल्याने शेतकऱ्यांना परवडणारी शेती करता येते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत फळबागा फुलविल्या आहेत. प्रारंभी लावलेल्या फळबागांपासून उत्पन्न मिळण्यास सुरुवातही झाली आहे. शेतकऱ्यांचा कल फळबागांकडे असल्याने पं.स. कृषी विभागात ते योजनांची माहिती घेताना दिसतात. पारंपरिक शेती करणारा शेतकरी खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिक सुबत्तेसाठी जोडधंदा करतात; पण तरी कर्जातच जगतात. यामुळेही तरूण शेतकरी शेती हा व्यवसाय समजून करीत असून फळबाग, फुलशेतीकडे वळलेत. यात शेडनेट व अन्य नव्या तंत्रज्ञानाची भर पडली आहे. केळीच्या बागा नामशेष झाल्या असल्या तरी फळबागांच्या माध्यमातून बागायती तालुका म्हणून गतवैभव प्राप्त होण्यास वाव आहे.