शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे मिळण्याची आशा

By admin | Updated: May 9, 2016 02:03 IST

येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींगच्या मालकाने शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये गत दोन वर्षांपासून थकविले आहे.

कापूस चुकारे प्रकरण : एपीएमसीला कर्ज सेलू : येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींगच्या मालकाने शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये गत दोन वर्षांपासून थकविले आहे. त्याविरूद्ध शेतकऱ्यानी विविध ठिकाणी आंदोलने करीत ही रक्कम कृषी सिंदी (रेल्वे) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने द्यावी, अशी मागणी केली होती. यावर बाजार समितीच्यावतीने राज्याच्या पणन विभागाला बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला पणन मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे थकलेले चुकारे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार सेलू अंतर्गत श्रीकृष्ण जिनींग प्रेसींग कापसाची खरेदी करीत आहेत. या जिनिंगचा मालक सुनील टालाटुले याने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून त्यांचे आठ कोटी रुपयांचे चुकारे थकविले. याविरूद्ध शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर टालाटुलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांनी थकीत चुकाऱ्याकरिता नागपूर पासून दिल्लीपर्यंत आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शासनाने टालाटुलेच्या जिनींगचा व शेतजमिनीचा लिलाव जाहीर केला. हा लिलाव होण्याच्या दिवशीच टालाटुले याने न्यायालयातून स्थगनादेश मिळविला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमचे आठ कोटी बाजार समितीने शासनाकडून कर्ज घेऊन चुकते करावे, अशी मागणी केली. त्यासाठी तातडीने ठराव घेण्यास दबावही आणला. बाजार समितीने आठ कोटी रुपयांचे कर्ज बिनव्याजी शासनाने द्यावे व टालाटुलेची संपत्ती विकून ते परत घ्यावे, असा ठराव पारित करून तो शासनाकडे सादर केला. या ठरावाचा संदर्भ घेत व शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेवून राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई स्थित सह्याद्रीवर शेतकरी प्रतिनिधी, बाजार समिती सभापती व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून चर्चा केली. त्यात बाजार समितीने ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी असा सूर मंत्र्यानीही आवळला; मात्र सभापती विद्याधर वानखेडे यांनी बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने बिनव्याजी कर्ज द्यावे व टालाटुलेची संपत्ती विकून त्याची परतफेड करावी, या ठरावाचा आधार घेत बाजार समितीला कर्ज मंजूर करण्याची मागणी लावून धरली. टालाटुलेची संपत्ती विकून जर कर्ज वसूल केल्या जात नसेल तर बाजार समिती ते कर्ज भरणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. पणनमंत्र्यांची सहमतीमुंबई येथे कापूस चुकाऱ्याच्या थकबाकी प्रकरणात शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ व बाजार समितीची पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली. यावर सकारात्मक तोडगा काढत बाजार समितीला शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यासाठी आठ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याच्या मागणीवर ना. चंद्रकांत पाटील यांनी शिक्का मोर्तब केले. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. या बैठकीला राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही उपस्थिती होती. पणनमंत्र्याशी मुंबईस्थित सह्याद्रीवर चर्चा झाली. बाजार समितीला आठ कोटी बिनव्याजी कर्ज देण्याची चर्चेअंती पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तयारी दर्शविली. बाजार समितीला ही रक्कम प्राप्त होताच शेतकऱ्यांना देण्यात येईल. श्रीकृष्ण जिनिंगचे मालक टालाटुले यांच्याकडून त्या रक्कमेची वसूली शासनाने करून बिनव्याजी घेतलेले कर्ज भरायचे आहे. सद्या शेतकऱ्यांचे चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. - विद्याधर वानखेडे, सभापती, कृउबा समिती, सिंदी (रेल्वे).