शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

हुतात्मादिनी पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली परेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:07 IST

पोलीस मुख्यालय येथे हुतात्मादिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने सकाळी ७.४५ ते ९.१५ वाजताच्या दरम्यान पोलीस मुख्यालय येथे हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देएसपींनी वाहिली आदरांजली : पोलीस अधिकाºयांसह प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस मुख्यालय येथे हुतात्मादिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने सकाळी ७.४५ ते ९.१५ वाजताच्या दरम्यान पोलीस मुख्यालय येथे हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी परेडचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला जिल्ह्यातील २५ पोलीस अधिकारी व १४५ पोलीस कर्मचारी तसेच जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. राखीव पोलीस निरीक्षक उईके यांनी शोक परेडचे संचालन केले. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.२१ आॅक्टोबर १९५९ ला लदाख हद्दीतील भारत तिबेट सिमेवर बसलेल्या हॉट स्प्रिंग येथे सोळा हजार फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० पोलीस शिपायांची तुकडी गस्त घालीत असताना अकस्मात त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लाची चाहूल लागताच मातृभूमीच्या रक्षणार्थ अपूरे मनुष्यबळ व अपूरे शस्त्रास्त्र यांची पर्वा न करता १० पोलीस जवान प्राणपणाने लढले. मातृभूमीच्या रक्षणार्थ या शुरवीरांनी मोठ्या संख्येने असणाºया शत्रुंशी लढा देत आपल्या प्राणांची आहूती दिली. तब्बल २१ दिवसानंतर १३ नोव्हेंबर १९५९ ला चिनने या वीर पोलीस जवानांचे मृतदेह भारताच्या स्वाधीन केले. तेव्हा सारा देश हळहळला होता. आमच्या सुखकर भविष्यकाळासाठी या १० शिलेदारांनी त्यांचा जागृत वर्तमान समर्पित केला. त्या हॉटस्प्रिंगच्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी देशभरात हा दिवस हुतात्मादिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी समस्त भारतात ज्या पोलीस दलातील जवानांनी आपले कर्तव्य पार पाडतांना हुतात्म पत्करले अशा सर्व वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना देशातील पोलीस दल मानवंदना देवून श्रद्धांजली अर्पण करीत असतो. १ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१७ दरम्यानच्या काळात ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा एकूण ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश असून महाराष्ट्रातील एक कर्मचाºयाचा समावेश आहे. त्यांना पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी मानवंदना अर्पण केली.पोलीस मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात वीर शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी सुरूवातीला मानवंदना अर्पण केली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले यांनीही आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनीही मानवंदना देवून स्मारकावर पुष्पगुच्छ अर्पण केले. शोक परेडच्या वेळी शहीदांच्या नावाचे वाचन पोलीस निरीक्षक पराग पोटे व पोलीस उपनिरीक्षक अचल मलकापुरे यांनी केले. संचालन मोहंडळे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.