शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वाढीव हमीभावाची मागणी हिवाळी अधिवेशनात लावून धरा

By admin | Updated: November 17, 2014 23:00 IST

प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान शेतमालाला वाढीव हमीभाव दिले जातील, अशी ग्वाही दिली होती़ असे असले तरी अद्याप वाढीव हमीभाव मिळालेले नाहीत़

वर्धा : प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान शेतमालाला वाढीव हमीभाव दिले जातील, अशी ग्वाही दिली होती़ असे असले तरी अद्याप वाढीव हमीभाव मिळालेले नाहीत़ यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सर्व शेतकऱ्यांच्या संघटनांच्यावतीने सामूहिकरित्या ही मागणी लावून धरावी, असा ठराव घेण्यात आला़विदर्भातील शेतपिकांचा प्रश्न यावर्षी अधिक जटील व बिकट होत आहे़ नवीन स्थानापन्न झालेल्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपाययोजना, आंदोलनाची भूमिका व स्वरूप ठरविण्याच्या दृष्टीने किसान अधिकार अभियानने विदर्भातील शेतकरी आंदोलक-कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ यात दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर सदर ठराव घेण्यात आला़ सरोज सभागृहात पार पडलेल्या बैठकीला विदर्भातील शेती प्रश्नांवर संघर्षरत निवडक कार्यकर्ते उपस्थित होते़ बैठकीत वर्धा, वणी, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर व चंद्रपूर येथील आंदोलक-कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला़ बैठकीला बोलविण्यामागील भूमिका विषद करताना किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी विदर्भात सद्यस्थितीत असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे़ आपण एक-एकट्याने लढत आहोत़ प्रश्नाचे स्वरूप थोडे भिन्न असू शकते; पण प्रश्नाचे मूळ एकच आहे़ अशावेळी आपापल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण एका आंदोलनाच्या विचारपीठावर आणणे गरजेचे आहे़ यावर्षी आंदोलनात युवा पीढीतील शेतकऱ्यांना जोडण्यासह आता शहरी, उत्साही, अभ्यासू, लढाऊ, युवा पीढीतील युवकांना आंदोलीत करण्याची गरज आहे़ वेळ कमी आहे़ म्हणून आपापल्या क्षमतेने सामूहिक सहमतीच्या मुद्यांवर एकवटलो पाहिजे, असे सांगितले़शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी यंदा दुष्काळ व शासनाच्या वचनभंगाचा प्रश्न आहे़ आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडले आहेत़ अशावेळी शासनाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे़ सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून जबाबदारीचे भान करून दिले पाहिजे़ शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे आंदोलनाची भूमिका विषद करताना म्हणाले आम्ही सरकारचे विरोधी नाही तर आम्ही सरकारचे लहान भाऊ आहोत़ आज आमच्या मदतीला शासनाने आले पाहिजे़ शासनाला जबाबदारी कळावी, यासाठी तीव्र आंदोलनाची गरज आहे़ शेतकरी, कार्यकर्त्यांना निराशा झटकून पुन्हा न्यायाच्या लढ्यासाठी संघटीत झाल्याशिवाय पर्याय नाही़ यावेळी गजानन अमदाबादकर, डॉ़ पुरूषोत्तम दानकर, अ‍ॅड़ विनायक काकडे, अ‍ॅड़ विप्लव तेलतुंबडे, नारायण जांभुळे प्रा़ विवेक गावंडे, महेश आडे, बाबाराव किटे, नाना देशमुख आदींनी मार्गदर्शन केले़(कार्यालय प्रतिनिधी)