शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खननामुळे टेकड्या, गढी होताहेत इतिहासजमा

By admin | Updated: June 4, 2014 23:57 IST

शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. ग्रामीण भागातही तुरळक प्रमाणात मातीच्या गढय़ा नजरेस पडतात.

वर्धा : शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे)  भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. ग्रामीण भागातही तुरळक प्रमाणात मातीच्या गढय़ा नजरेस पडतात. पण या टेकड्या आणि गढय़ा जेसीबीच्या सहाय्याने पोखरण्यात येत आहे. या सततच्या माती व मुरुमाच्या उत्खननामुळे येत्या काही वर्षात या टेकड्या इतिहासजमा होतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिक संसाधनावर मानवी वस्तीचे होत असलेले अतिक्रमन वाढतच आहे. कुठलाही परिसर हा सर्वत्र सपाट नसतो. कुठे तो उंचसखल तर कुठे मैदानी भाग असतो. यामुळे भूभागाचे संतुलन कायम रहाते. या उंच भागालाच आपण टेकड्या, जास्त उंच भागाला पर्वत तर केवळ मातीच्या उंच भागाला गढी असे संबोधले जाते. नैसर्गिकदृष्ट्या त्याची निर्मिती झाल्याने त्यामुळे निसर्गाचे संतुलन राखले जाते; परंतु मानवाचा शिरकाव जंगलांपर्यंत झाल्याने मानवी वस्तीबाहेर असलेल्या या टेकडी आणि गढी शहरात, गावांत दाखल झाली. त्यांच्याभोवताल वस्त्यांची संख्या वाढू लागली. घरांच्या बांधकामाकरिता या टेकड्यांना पोखरुन मुरूम आणि गढींमधील माती उपयोगात आणल्या जाऊ लागली. याचे प्रमाण वाढल्याने यावर निर्बंध लादण्यात आले. तसेच यामुळे संबंधित प्रशासनाला महसूलही मिळाला. हे उत्खनन मात्र या टेकड्यांच्या मुळावर उठले असून त्यामुळेही या टेकड्यांचे अतोनात दोहन होत आहे. परीणामी पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा टेकड्या आढळतात. त्यातील अनेक टेकड्यांवर सध्या अशाच प्रकारे अवैध उत्खनन होत असल्याचे दिसते. टेकड्यांपासून मिळत असलेल्या मुरुमाचा उपयोग घराच्या बांधकामात जोत्यात भराईसाठी केला जातो. याप्रकारच्या अवैध उत्खननातून मोठ्या प्रमाणात मुरुम मिळत असल्याने दिवसेंदिवस शहराबाहेरील टेकड्या पोखरण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु संबंधित प्रशासनाला याची माहिती नसल्यागत कारवाई शून्य असून टेकड्या पोखरल्या जात आहेत. (शहर प्रतिनिधी)निसर्गाचेही दोहनटेकड्या व गढय़ांच्या निर्मितीची  प्रक्रिया ही नैसर्गिकरित्या होत असते. त्यामुळे निसर्गाचे संतुलन कायम राहते. गावांतील गढय़ादेखील नद्यांच्या आसपास आढळतात. त्यामुळे गावात नदीच्या पुराचे पाणी शिरत नाहीदिवसेंदिवस या गढय़ांचे दोहन होत असल्याने पूराला अटकाव करणारी ही नैसर्गिक यंत्रणाच नेस्तनाबूत झाली आहे. याचा परिणामही काही काळात ग्रामीण भागातील नागरिक सोसत आहे.टेकड्यांमुळे भूजल पातळी कायम राहते. अवैध उत्खननाने भूजल पातळी खालावत आहे.