शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक भोसलेकालीन विहिरीकडे पुरातत्त्वचे दुर्लक्ष

By admin | Updated: March 10, 2016 02:51 IST

जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ऐतिहासिक वास्तू, अवशेष आढळतात; पण त्याकडे पुरातत्व विभाग व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात.

इतिहास पुसला जाण्याची भीती : घाणीच्या विळख्यात सापडलेल्या विहिरीमुळे आरोग्य धोक्याततळेगाव (श्या.पं.) : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ऐतिहासिक वास्तू, अवशेष आढळतात; पण त्याकडे पुरातत्व विभाग व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. यामुळे इतिहास पुसला जात असल्याचे वास्तव आहे. येथील वॉर्ड क्र. ४ मधील भोसलेकालीन विहीर दुर्लक्षित आहे. पुरातत्व विभागाने याची नोंद घेत इतिहास जपणे गरजेचे झाले आहे.गावात वॉर्ड क्र. ४ मध्ये भोसलेकालीन ऐतिहासिक विहीर आहे. या विहिरीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. अद्याप कुणीही हा विषय गांभीर्याने न घेतल्याने ही विहिरीसदृश्य वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकलेली ही ऐतिहासिक विहीर घाणीच्या विळख्यात सापडली आहे. परिणामी, या विहिरीमुळेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष दिल्यास मुबलक पाणी देणाऱ्या या विहिरीची दुरवस्था थांबवून ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे शक्य आहे. तत्सम मागणी श्यामजी पंत क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळाने संबंधितांना भेटून केली. अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या या भोसलेकालीन विहीर वजा वास्तूला श्यामजी पंत महाराज यांचा इतिहास जुळला आहे. यामुळे श्यामजी पंताचे तळेगाव, अशी ओळख असलेल्या गावातील विहिरीचे जनत होऊन सभोवताल असलेल्या वास्तूचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे आहे. यापूर्वी पं.स. सदस्य माधूरी बुले यांनी निधी दिला होता; पण तो पुरेसा नसल्याने काम रखडले आहे. ग्रा.पं. ने स्वत: पुढाकार घेत ही विहीर व श्यामजीपंत महाराज यांचा इतिहास जतन करावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)१४ व्या वित्त आयोगातून दुरूस्ती शक्य‘आमचा गाव, आमचा विकास’ या संकल्पनेतून आता १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना प्रदान केला जात आहे. या निधीतून गावातील भोसलेकालीन ऐतिहासिक विहिरीचे जतन करणे शक्य आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन विहीरसदृश्य ऐतिहासिक वास्तूची डागडुजी करावी. यातील घाण साफ केल्यास जनतेला पाणी उपलब्ध होऊ शकते. या माध्यमातून इतिहास जतन करण्याचे कार्यही ग्रा.पं. प्रशासनाला करता येणार आहे. शिवाय परिसर स्वच्छ झाल्यास गावाच्या सौंदर्यीकरणातही भर पडणार आहे. या दृष्टीने स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.