शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:45 IST

नांदपूर (धनोडी) येथील इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. गोपालदास चांडक (८०) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्यांची हत्या चोरीच्या प्रयत्नातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देघटनेच्या वेळी गोपालदास घरी एकटेच

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नांदपूर (धनोडी) येथील इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. गोपालदास चांडक (८०) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्यांची हत्या चोरीच्या प्रयत्नातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांच्या हाती काहीच आले नाही.हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता मृतक गोपालदास चांडक यांच्या तोंडात कापड कोंबून असल्याचे दिसून आले आहे. शिवाय त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. गोपालदास त्यांच्या घरी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या दारातून प्रवेश केला. त्यांना पैशाची किंवा तिजोरीच्या चाव्यांची मागणी केली असावी, त्या देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली असावी हे सांगणे अवघड असल्याचेही पोलीस बोलत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास पी.एस.आय. बांडे करीत आहे.पोलिसांना सदर घटनेची माहिती नांदपूर येथील सरपंचाने दिली. घटना माहिती मिळताच आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार एस. कोल्हे, ठाणेदार अशोक चौधरी यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.घटनेच्या वेळी गोपालदास घरी एकटेचगोपालदास घरी एकटेच होते. त्यांची पत्नी मुलीकडे गेली होती. शिवाय नांदपूर येथे असलेले त्यांचे किराणा दुकान चालवणारा त्यांचा मुलगा रात्री दुकान बंद करून आर्वी येथील घरी गेला होता. त्यामुळे रात्री घरी गोपालदास एकटेच होते. याच संधीचा लाभ घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.बोटातील सोन्याच्या अंगठ्या कायमसदर हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र गोपालदास यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या तशाच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामुळे ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली असावी असा संशय व्यक्त होत आहे.श्वान पथकही निकामीघटनेची माहिती होताच सुगावा मिळावा याकरिता पोलिसांकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान पथकालाही काहीच सुगावा लागला नाही.