शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:45 IST

नांदपूर (धनोडी) येथील इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. गोपालदास चांडक (८०) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्यांची हत्या चोरीच्या प्रयत्नातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देघटनेच्या वेळी गोपालदास घरी एकटेच

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नांदपूर (धनोडी) येथील इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. गोपालदास चांडक (८०) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्यांची हत्या चोरीच्या प्रयत्नातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांच्या हाती काहीच आले नाही.हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता मृतक गोपालदास चांडक यांच्या तोंडात कापड कोंबून असल्याचे दिसून आले आहे. शिवाय त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. गोपालदास त्यांच्या घरी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या दारातून प्रवेश केला. त्यांना पैशाची किंवा तिजोरीच्या चाव्यांची मागणी केली असावी, त्या देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली असावी हे सांगणे अवघड असल्याचेही पोलीस बोलत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास पी.एस.आय. बांडे करीत आहे.पोलिसांना सदर घटनेची माहिती नांदपूर येथील सरपंचाने दिली. घटना माहिती मिळताच आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार एस. कोल्हे, ठाणेदार अशोक चौधरी यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.घटनेच्या वेळी गोपालदास घरी एकटेचगोपालदास घरी एकटेच होते. त्यांची पत्नी मुलीकडे गेली होती. शिवाय नांदपूर येथे असलेले त्यांचे किराणा दुकान चालवणारा त्यांचा मुलगा रात्री दुकान बंद करून आर्वी येथील घरी गेला होता. त्यामुळे रात्री घरी गोपालदास एकटेच होते. याच संधीचा लाभ घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.बोटातील सोन्याच्या अंगठ्या कायमसदर हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र गोपालदास यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या तशाच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामुळे ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली असावी असा संशय व्यक्त होत आहे.श्वान पथकही निकामीघटनेची माहिती होताच सुगावा मिळावा याकरिता पोलिसांकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान पथकालाही काहीच सुगावा लागला नाही.