शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणी ते हिंगणा मार्गाची दैना

By admin | Updated: July 1, 2016 02:11 IST

हिंगणी ते हिंगणा हा मार्ग दोन जिल्ह्यांच्या सिमेला जोडणारा कमी अंतराचा रस्ता आहे. मात्र या रत्यावर खड्डेच-खड्डे असल्याने वाहतुकीकरिता गैरसोयीचा ठरत आहे.

अपघाताचा धोका : रस्त्यावर खड्ड्यांची मालिकाबोरधरण : हिंगणी ते हिंगणा हा मार्ग दोन जिल्ह्यांच्या सिमेला जोडणारा कमी अंतराचा रस्ता आहे. मात्र या रत्यावर खड्डेच-खड्डे असल्याने वाहतुकीकरिता गैरसोयीचा ठरत आहे. या रस्त्यावरील नाल्याला पावसाळ्यात पूर येत असल्याने वाहतुकीला अडचण होते. रस्त्याची डागडुजी करून नाल्याचे पक्के बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यावरील नाला अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. बांधकाम विभागाकडून याची कोणतीच डागडुजी केली जात नसल्याचे दिसते. नागपूर व वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना हा रस्ता कमी अंतराचा असून प्रवासाचा वेळ वाचविणारा आहे. हा रस्ता हिंगणी, हिंगणा, वाडी, नागपूर असा जातो; पण या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने वाहन चालक या रस्त्याने जाण्याचे टाळतात. रस्त्यावर खड्डेच आहे. चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. हिंगणी येथून देवनगर, वानरविहरा नंतर २ किमी अंतरावर जिल्ह्याची सीमा आहे. या सिमेपासून तर हिंगणीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. या मार्गाने जडवाहनाची वर्दळ असते. वानरविहरापासून काही अंतरावर नाला आहे. हा नाला वळणरस्त्याला लागून आहे. या नाल्याला पावसाळ्यात पूर येतो. पाण्याच्या प्रवाहाने पुलाच्या खालील माती वाहून जाते. त्यामुळे तेथे भगदाड पडले आहे. दिवसेंदिवस नाल्याची रूंदी वाढत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. रात्रीच्यावेळी वाहन चालकांनी सतर्कता न बाळगल्यास अपघात अटळ आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.(वार्ताहर)पर्यटकांकरिता रस्ता डोकेदुखीचाबोर व्याघ्र प्रकल्पाकरिता बाहेरील जिल्ह्यातील पर्यटक येथे येतात. त्यांना येण्याकरिता हिंगणी मार्ग सोयीस्कर आहे. बोरधरण येथे येण्यासाठी वाडी, नागपूर, हिंगणा हा मार्ग कमी अंतराचा ठरतो. जंगल सफारीसाठी अनेकजण याच मार्गाने जातात. मात्र वाहन चालकांना खड्डेमय रस्त्यावरुन वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्ता खचला असल्याने पावसाळ्यात धोका वाढला आहे. याची दखल घेणे गरजेचे ठरत आहे.