शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमानाची भाषा बनावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:54 IST

देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे.

ठळक मुद्देकेशरीनाथ त्रिपाठी : हिंदी विद्यापीठाचा २० वा स्थापना दिवस

आॅनलाईन लोकमतवर्धा : देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे. हिंदी आमची राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा झाली पाहिजे, असे विचार पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी व्यक्त केले.येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाचा २० व्या स्थापना दिवस सोमवारी विश्वविद्यालयाच्या अनुवाद व निर्र्वाचन विद्यापीठ भवनाच्या प्रांगणात भारतेंदु सभा मंडपात साजरा करण्यात आला. यावेळी अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्व विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र होते. यावेळी अतिथी म्हणून खासदार रामदास तडस तर भारतीय जनसंचार संस्था, नवी दिल्लीचे महानिदेशक डॉ. के.जी. सुरेश मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा, कुलसचिव कादर नवाज खान, प्रो. मनोज कुमार, प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, प्रो. देवराज, प्रो. एल. कारूण्यकरा मंचावर उपस्थित होते.राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी म्हणाले की, विश्वविद्यालयाचा विकास महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी वर्धा येथे एका दृढ निश्चयाने होत आहे. हे विश्वविद्यालय राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख सिध्द करत आहे. वर्धेची भूमि स्वातंत्र्य संग्रामाची असून राष्ट्रपिता महात्मा गांधी, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक व हेगडेवार यांच्या महान विचारांचे सिंचन येथे होत आहे.भारतीय जनसंचार संस्थान दिल्लीचे महानिदेशक प्रो.के. जी. सुरेश यांनी शिक्षा का वैश्विक परिदृश्य और भारतीय शिक्षा प्रणाली या विषयावर विचार मांडले. खासदार रामदास तडस म्हणाले, की २० वर्षाआधी विश्वविद्यालयाचा पाया एका छोट्याशा रोपट्याने झाला जो आज २० वर्षांनी वटवृक्षासमान विस्तारित झाला आहे. विश्वविद्यालयामुळे वर्धेचा गौरव देश-विदेशात वाढत आहे. केंद्रीय विद्यालयाच्या रूपाने एक मोठी उपलब्धी विश्वविद्यालयाची म्हणता येईल, असे ते म्हणाले.कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र म्हणाले की हिंदीला समृध्द करण्यासाठी हे विश्वविद्यालय कार्यरत आहे. विश्वविद्यालय दिवसेंदिवस क्षमता वाढवित आहे. येथील विद्यार्थी देश-दुनियेत स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. यावेळी त्यांनी विश्वविद्यालयाचे अनेक कार्यक्रम आणि उपक्रमांचा उल्लेख केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा यांनी केले.संचालन प्रो. प्रिती सागर यांनी केले तर आभार कुलसचिव कादर नवाज खान यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ आणि समारोप बॅँडवर राष्ट्रगीत वाजवून करण्यात आला. मुख्य कार्यक्रमापुर्वी महामहीम राज्यपालांनी गांधी हिल्सवरील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.विदेशी साहित्यिकांचा सत्कारविश्वविद्यापीठाच्यावतीने मालती जोशी, मध्यप्रदेश, डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र ओरिसा, तेजेंद्र शर्मा लंडन, डॉ. रणजीत साहा दिल्ली, डॉ. तातयाना ओरांसकाइया जर्मनी, प्रो. मिलेना ब्राटोइएवा बल्गारिया, डॉ. पी.के. बालसुब्रमण्यम तामिळनाडु, सुरेश शर्मा महाराष्टÑ यांना राज्यपालांच्या हस्ते हिंदी सेवा सन्मान प्रदान करण्यात आला.