शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वडार झोपडपट्टीत समस्यांचा डोंगर

By admin | Updated: October 11, 2014 02:05 IST

गत ३५ वर्षांपासून आर्वी नाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीधारकांना जागा सोडण्याकरिता धमकावणी केली जात आहे.

वर्धा : गत ३५ वर्षांपासून आर्वी नाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीधारकांना जागा सोडण्याकरिता धमकावणी केली जात आहे. बिल्डर लॉबीकडून रहिवाश्यांना धमक्या देणे सुरू असून येथे अद्याप कोणत्याच सुविधा देण्यात आल्या नाही. यासह आदी समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता वडार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. तसेच प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले.वडार समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून प्रशासनाने त्यांना अजूनही कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत. येथील रहिवाश्यांकडे शिधापत्रिका नाही. येथील रहिवासी मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतात. शिधापत्रिका नसल्याने त्यांना शासकीय सुविधा मिळत नाही. या झोपडपट्टीत परिसरात मूलभूत सोयी सुविधा देण्यात आल्या नाही. येथे वास्तव करणाऱ्यात बहुतांश भटक्या समाजातील लोक आहेत. खोदकाम, दगड फोडणे, बांधकाम इत्यादी कामे करून ते जीवन जगत आहे. येथील युवापिढीच्या हाताला काम नसल्याने विघातक कामांत गुंतण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील युुवकांकरिता एखादा प्रकल्प तयार करुन रोजगार उपलब्ध करुण देण्याची मागणी केली. ज्या जागेवर ही झोपडपट्टी आहे ती जागा मोक्याची असल्याने आता बिल्डर लॉबीकडून नागरिकांना धमकाविण्याचे प्रकार सुरु आहे. जागा सोडा नाही तर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. यावेळी शिष्टमंडळात मनोहर पंचारिया, प्रा. शिवाजी इथापे, नागोराव पवार, नत्थू हराळे यांचा सहभाग होता. मोर्चात सुकू कुराई, रेणूका मुळे, मुक्ता सातपुते, सुशीला देवगण, सुरेखा कुराई, अनिता इडकर, सुनीता कुराडे, मंगला जाधव, कांता कोरे, कविता गायकवाड, चंद्रकला मुळे, जमुना जाधव, शीला इटनकर, ललिता कुराडे, नंदा पवार आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)