शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडार झोपडपट्टीत समस्यांचा डोंगर

By admin | Updated: October 11, 2014 02:05 IST

गत ३५ वर्षांपासून आर्वी नाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीधारकांना जागा सोडण्याकरिता धमकावणी केली जात आहे.

वर्धा : गत ३५ वर्षांपासून आर्वी नाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीधारकांना जागा सोडण्याकरिता धमकावणी केली जात आहे. बिल्डर लॉबीकडून रहिवाश्यांना धमक्या देणे सुरू असून येथे अद्याप कोणत्याच सुविधा देण्यात आल्या नाही. यासह आदी समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता वडार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. तसेच प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले.वडार समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून प्रशासनाने त्यांना अजूनही कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत. येथील रहिवाश्यांकडे शिधापत्रिका नाही. येथील रहिवासी मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतात. शिधापत्रिका नसल्याने त्यांना शासकीय सुविधा मिळत नाही. या झोपडपट्टीत परिसरात मूलभूत सोयी सुविधा देण्यात आल्या नाही. येथे वास्तव करणाऱ्यात बहुतांश भटक्या समाजातील लोक आहेत. खोदकाम, दगड फोडणे, बांधकाम इत्यादी कामे करून ते जीवन जगत आहे. येथील युवापिढीच्या हाताला काम नसल्याने विघातक कामांत गुंतण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील युुवकांकरिता एखादा प्रकल्प तयार करुन रोजगार उपलब्ध करुण देण्याची मागणी केली. ज्या जागेवर ही झोपडपट्टी आहे ती जागा मोक्याची असल्याने आता बिल्डर लॉबीकडून नागरिकांना धमकाविण्याचे प्रकार सुरु आहे. जागा सोडा नाही तर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. यावेळी शिष्टमंडळात मनोहर पंचारिया, प्रा. शिवाजी इथापे, नागोराव पवार, नत्थू हराळे यांचा सहभाग होता. मोर्चात सुकू कुराई, रेणूका मुळे, मुक्ता सातपुते, सुशीला देवगण, सुरेखा कुराई, अनिता इडकर, सुनीता कुराडे, मंगला जाधव, कांता कोरे, कविता गायकवाड, चंद्रकला मुळे, जमुना जाधव, शीला इटनकर, ललिता कुराडे, नंदा पवार आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)