शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

उड्डाण पुलावर पादचारी मार्ग खचला

By admin | Updated: January 11, 2016 01:59 IST

वर्धा ते सेवाग्राम दरम्यान असलेल्या इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील पादचारी मार्गाला भेगा व खड्डे पडले आहेत.

मॉर्निंग वॉक धोक्यात : बांधकाम विभागाने दुरूस्ती करणे गरजेचेसेवाग्राम : वर्धा ते सेवाग्राम दरम्यान असलेल्या इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील पादचारी मार्गाला भेगा व खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत पादचारी मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.सेवाग्राम ते वर्धा मार्गावर उड्डाण पूल आहे. या पुलावरूनच एक मार्ग बरबडी व पूढे गोजीकडे गेलेला आहे. या मार्गावर रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. शिवाय सर्व प्रकारची वाहने सारखी धावत असतात. आपले आरोग्य सुदृढ राहावे म्हणून अनेक महिला, पुरूष पहाटे व सायंकाळी सेवाग्राम, बरबडी मार्गाकडे फिरायला जातात. सर्वांनाच पुलावरून जावे लागत असल्याने पादचारी मार्गाचा वापर होतो; पण दोन्ही बाजूचा पादचारी मार्ग मोठ्या प्रमाणात फुटल्याने धोका निर्माण झाला आहे. रात्री वाहनांच्या प्रकाशामुळे खड्डा दिसत नाही. परिणामी, पाय अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्धा शहरातील इंदिरा गांधी आणि आचार्य विनोबा भावे हे दोन्ही उड्डाण पूल रेल्वे लाईन असल्यामुळे बांधण्यात आलेले आहेत. गत कित्येक वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या पुलांवरील रस्त्यांची केवळ डागडुजी होते; पण त्यातील पादचारी मार्गांची दुरूस्ती केली जात नाही. यामुळेच इंदिरा उड्डाण पुलावरील पादचारी मार्ग अनेक ठिकाणी खचला असल्याचे दिसून येते. या पुलावरून सेवाग्राम तसेच बरबडीकडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करावी लागते. शिवाय त्या परिसरातील नागरिक या पुलावर सकाळी तसेच सायंकाळी फिरायला येतात. या नागरिकांना खचलेला भाग न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. काही दिवसांपूर्वी उड्डाण पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली; पण पादचारी मार्गाच्या दुरूस्तीकडे कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी, अपघाताचा धोका कायम आहे. रात्रीला काही युवक पुलावर गप्पा करतानाही दिसतात. अनावधानाने मोठे संकट येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)