शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

उड्डाण पुलावर पादचारी मार्ग खचला

By admin | Updated: January 11, 2016 01:59 IST

वर्धा ते सेवाग्राम दरम्यान असलेल्या इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील पादचारी मार्गाला भेगा व खड्डे पडले आहेत.

मॉर्निंग वॉक धोक्यात : बांधकाम विभागाने दुरूस्ती करणे गरजेचेसेवाग्राम : वर्धा ते सेवाग्राम दरम्यान असलेल्या इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील पादचारी मार्गाला भेगा व खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत पादचारी मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.सेवाग्राम ते वर्धा मार्गावर उड्डाण पूल आहे. या पुलावरूनच एक मार्ग बरबडी व पूढे गोजीकडे गेलेला आहे. या मार्गावर रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. शिवाय सर्व प्रकारची वाहने सारखी धावत असतात. आपले आरोग्य सुदृढ राहावे म्हणून अनेक महिला, पुरूष पहाटे व सायंकाळी सेवाग्राम, बरबडी मार्गाकडे फिरायला जातात. सर्वांनाच पुलावरून जावे लागत असल्याने पादचारी मार्गाचा वापर होतो; पण दोन्ही बाजूचा पादचारी मार्ग मोठ्या प्रमाणात फुटल्याने धोका निर्माण झाला आहे. रात्री वाहनांच्या प्रकाशामुळे खड्डा दिसत नाही. परिणामी, पाय अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्धा शहरातील इंदिरा गांधी आणि आचार्य विनोबा भावे हे दोन्ही उड्डाण पूल रेल्वे लाईन असल्यामुळे बांधण्यात आलेले आहेत. गत कित्येक वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या पुलांवरील रस्त्यांची केवळ डागडुजी होते; पण त्यातील पादचारी मार्गांची दुरूस्ती केली जात नाही. यामुळेच इंदिरा उड्डाण पुलावरील पादचारी मार्ग अनेक ठिकाणी खचला असल्याचे दिसून येते. या पुलावरून सेवाग्राम तसेच बरबडीकडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करावी लागते. शिवाय त्या परिसरातील नागरिक या पुलावर सकाळी तसेच सायंकाळी फिरायला येतात. या नागरिकांना खचलेला भाग न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. काही दिवसांपूर्वी उड्डाण पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली; पण पादचारी मार्गाच्या दुरूस्तीकडे कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी, अपघाताचा धोका कायम आहे. रात्रीला काही युवक पुलावर गप्पा करतानाही दिसतात. अनावधानाने मोठे संकट येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)