शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

उड्डाण पुलावर पादचारी मार्ग खचला

By admin | Updated: January 11, 2016 01:59 IST

वर्धा ते सेवाग्राम दरम्यान असलेल्या इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील पादचारी मार्गाला भेगा व खड्डे पडले आहेत.

मॉर्निंग वॉक धोक्यात : बांधकाम विभागाने दुरूस्ती करणे गरजेचेसेवाग्राम : वर्धा ते सेवाग्राम दरम्यान असलेल्या इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील पादचारी मार्गाला भेगा व खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत पादचारी मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.सेवाग्राम ते वर्धा मार्गावर उड्डाण पूल आहे. या पुलावरूनच एक मार्ग बरबडी व पूढे गोजीकडे गेलेला आहे. या मार्गावर रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. शिवाय सर्व प्रकारची वाहने सारखी धावत असतात. आपले आरोग्य सुदृढ राहावे म्हणून अनेक महिला, पुरूष पहाटे व सायंकाळी सेवाग्राम, बरबडी मार्गाकडे फिरायला जातात. सर्वांनाच पुलावरून जावे लागत असल्याने पादचारी मार्गाचा वापर होतो; पण दोन्ही बाजूचा पादचारी मार्ग मोठ्या प्रमाणात फुटल्याने धोका निर्माण झाला आहे. रात्री वाहनांच्या प्रकाशामुळे खड्डा दिसत नाही. परिणामी, पाय अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्धा शहरातील इंदिरा गांधी आणि आचार्य विनोबा भावे हे दोन्ही उड्डाण पूल रेल्वे लाईन असल्यामुळे बांधण्यात आलेले आहेत. गत कित्येक वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या पुलांवरील रस्त्यांची केवळ डागडुजी होते; पण त्यातील पादचारी मार्गांची दुरूस्ती केली जात नाही. यामुळेच इंदिरा उड्डाण पुलावरील पादचारी मार्ग अनेक ठिकाणी खचला असल्याचे दिसून येते. या पुलावरून सेवाग्राम तसेच बरबडीकडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करावी लागते. शिवाय त्या परिसरातील नागरिक या पुलावर सकाळी तसेच सायंकाळी फिरायला येतात. या नागरिकांना खचलेला भाग न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. काही दिवसांपूर्वी उड्डाण पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली; पण पादचारी मार्गाच्या दुरूस्तीकडे कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी, अपघाताचा धोका कायम आहे. रात्रीला काही युवक पुलावर गप्पा करतानाही दिसतात. अनावधानाने मोठे संकट येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)