शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

हिगणघाटची ऋतिका जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:17 IST

शैक्षणिक जीवनात महत्त्वाची तथा टर्निंग पॉर्इंट मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला असून मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी घट झाली आहे. हिंगणघाट येथील जीबीएमएम विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतिका रामनरेश साहु हिने ६५० पैकी ६३७ गुण (९८ टक्के) प्राप्त करीत जिल्ह्यात पहिली येण्याचा मान पटकाविला आहे.

ठळक मुद्देबारावीचा जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के : १७ हजार ५४० पैकी १७ हजार ५२८ विद्यार्थी उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक जीवनात महत्त्वाची तथा टर्निंग पॉर्इंट मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला असून मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी घट झाली आहे. हिंगणघाट येथील जीबीएमएम विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतिका रामनरेश साहु हिने ६५० पैकी ६३७ गुण (९८ टक्के) प्राप्त करीत जिल्ह्यात पहिली येण्याचा मान पटकाविला आहे. सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेनेच दिला आहे.जिल्ह्यात द्वितीय स्थानावर दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात न्यू इंग्लीश हायस्कूल वर्धा येथील विज्ञान शाखेची श्रूती संतोष मुरारका तथा आर.के. कनिष्ठ महाविद्यालय पुलगाव येथील प्रज्वल यशवंत घाटे यांनी ६२४ (९६ टक्के) गुण प्राप्त केले आहेत. तृतीय स्थानावर जे.बी. विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेत्रा विजय कडू हिने ६२३ (९५.८४ टक्के) गुण प्राप्त करीत तृतीय स्थान प्राप्त केले आहे.यंदा जिल्ह्यातील १२४ उच्च माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील १७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. यातील १७ हजार ५२८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे गेले होते. यापैकी १४ हजार ४९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला आहे. हा निकाल मागील वर्षीपेक्षा कमी असल्याने निकालाची टक्केवारी घटल्याचेच दिसून येत आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने बुधवारी दुपारी १ वाजता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर केला. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्याने शेवटून दुसरा क्रमांक राखला आहे. सर्वात कमी निकाल गडचिरोली जिल्ह्याचा लागला असून त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा क्रमांक लागतो. वर्धा जिल्ह्यातील १७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यात ८ हजार ८२३ मुले तर ७ हजार ७१७ मुलींचा समावेश होता. पैकी ८ हजार ८१८ मुले व ८ हजार ७१० मुली अशा १७ हजार ५२८ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. यात ६ हजार ७९३ मुले आणि ७ हजार ७०० मुली असे १४ हजार ४९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा निकाल एकूण ८२.६८ टक्के लागला असून मुलींच्या निकाली टक्केवारी ८८.४० तर मुलांची ७७.०४ आहे. यावरून इयत्ता बारावीच्या परीक्षेतही मुलींनीच भरारी घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमानही मुलींनीच पटकाविल्याचे निकालावरून दिसून येत आहे.इयत्ता बारावीमध्ये सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागलेला आहे. विज्ञान शाखेतील ९५.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्या पाठोपाठ वाणिज्य शाखेचा निकाल ८८.२९ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा (एमसीव्हीसी) निकाल ७४.११ टक्के तर सर्वात कमी निकाल कला शाखेचा ७०.९४ टक्के लागलेला आहे.सीए होण्यासाठी अभ्यासाला केला प्रारंभनागपूर बोर्डातून, राज्यात मुलींतून तथा वर्धा जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ऋतिकाला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रात १०० गुण आहेत. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व अथक परिश्रमातून हे यश प्राप्त केल्याचे तिने सांगितले. भविष्यात सी.ए. होण्याची महत्त्वाकांक्षा असून त्या दृष्टीने बारावीची परीक्षा होताच सी.ए. ची तयारी सुरू केल्याचे सांगितले. विविध विषयाची पुस्तके वाचण्याचा छंद तिला बालपणापासून आहे. दहावीत तिला ९४ टक्के गुण होते. तिच्या वडिलांचे येथील इंदिरा गांधी वॉर्डात किराणा दुकान असून आई माधुरी गृहिणी आहे. तिची मोठी बहीण अंजली नागपूर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेते आहे तर लहान भाऊ अनुज प्राथमिक शाळेत शिकत आहे. फारशी शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने यश प्राप्त केल्याचा आनंद तिच्या कुटुंबीयांच्या चेहºयावर विलसत होता. रितिकाने यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्य विष्णू इटनकर व शिक्षकांना दिले.